Mrs.Manjusha ....
ShareChat
click to see wallet page
@manjusha148
manjusha148
Mrs.Manjusha ....
@manjusha148
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
काल संध्याकाळी एका विलक्षण अनुभवाला सामोरं जावं लागलं. मला विमाननगरहून भांडारकर मध्ये भैरप्पांवरच्या कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी चारच्या सुमाराला उबर वरून गाडी बुक करायचा प्रयत्न करत होते, पण काल संप असल्यामुळे गाडी मिळत नव्हती. लांब जायचं असेल तर मी सहसा प्रदूषणाचा त्रास होतो म्हणून रिक्षा घेत नाही, पण काल गाडीच मिळेना म्हणून शेवटी उबर ऑटो केली. ऑटो चालवणारा मुलगा अगदी तरुण आणि किरकोळ शरीराचा होता. घरापासून निघून आम्ही येरवड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोचलो, जेमतेम एक किलोमीटर अंतर पार केलं असेल. दुपारी चारची वेळ असल्यामुळे फार रहदारी नव्हती. अचानक चालकाने एक गचका घेत ऑटो रस्त्याच्या बाजूला नेली आणि धाडकन डोकं स्टीयरिंगवर टेकलं, कसाबसा मला म्हणाला की त्याला बरं वाटत नाही. तेवढ्यात त्याचे हात आकसून येऊ लागले. काही क्षण मी तशीच थांबले, नेमकं काय घडत आहे हे मला समजेना, पण त्याला बरं वाटत नाहीये हे स्पष्ट दिसत होतं. क्षणभर वाटलं, कदाचित अपस्माराचा झटका असेल. पण त्याचं अंग थरथरत नव्हतं ना त्याच्या तोंडातून फेस येत होता, पण हात मात्र आखडले होते. मी रिक्षातून उतरून जवळच्या पाण्याच्या बाटलीतून त्याच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडलं आणि त्याचा हात धरून त्याला मागच्या सीटवर नेलं आणि झोपायला सांगितलं. तो नीट बोलूही शकत नव्हता. तुटक शब्दांत त्यानं मला सांगितलं की त्याने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, फक्त एक कप चहा आणि एक टोस्टवर तो रिक्षा चालवत होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला, त्याच्या रक्तातली साखर एकदम उतरली होती आणि त्याला तात्काळ काहीतरी गोड खावं लागणार होत. बहुधा माझ्या पर्समध्ये एखादी टॉफी किंवा सुका मेवा असं काहीतरी असतं, पण आज नेमकं माझ्याजवळ गोड काहीच नव्हतं. आम्ही थांबलो होतो तो रस्ता एअरफोर्सचा होता, आजूबाजूला ना कसलं दुकान, ना फेरीवाला, ना कुणाचं घर. फक्त रस्ता आणि तुरळक रहदारी. क्षणभर वाटलं, पोलीसांना फोन करावा. तेवढ्यात थोड्या अंतरावर एक विवांता हॉटेलची इनोव्हा उभी दिसली. एकदम मला सुचलं. हॉटेलच्या गाड्यांमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही चॉकलेट वगैरे ठेवलेले असतात. मी धावतच रस्ता क्रॉस करून पलीकडे गेले. त्या गाडीचा ड्रायव्हर काचा वर करून झोपला होता, काचेवर टकटक करुन त्याला उठवलं आणि विचारलं त्याच्याकडे काहीतरी गोड आहे का त्या रिक्षावाल्याला देण्यासाठी. तोही तरुणच होता. त्याच्याकडे एका बाटलीत आठ-दहा मेंटोस होत्या. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माणुसकी होती! त्यानं फक्त मेंटोस दिल्या नाहीत, तर माझी कळकळ बघून माझ्याबरोबर येऊन मदतही केली. आम्ही त्या मुलाला बसवलं, एका मागोमाग एक अश्या सहा-सात मेंटोस खायला दिल्या आणि पाणी प्यायला दिलं. हळूहळू, अगदी हळूहळू, त्याचे आखडलेले हात सैल झाले. तो सावरून बसला, थोडं बोलू लागला. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या फोनवरून नंबर घेऊन मी त्याच्या दोन मित्रांना फोन केले. अनोळखी नंबर म्हणून असेल, त्यांनी उचलले नाहीत. शेवटी त्याने एका डॉक्टरांचा नंबर दिला. त्यांनी सुदैवाने उचलला. मी परिस्थिती आणि त्या मुलाचं नाव सांगितल्यावर त्यांनीही मला तेच सांगितलं की त्याची साखर अचानक कमी झाली असावी, त्याला काहीतरी गोड खायला द्या. मग मी त्यांना आमचं लोकेशन पाठवलं. नंतर त्याच्या बहिणीला त्याच्या फोनवरून कॉल केला व तिलाही लोकेशन पाठवलं. हे सगळं होईपर्यंत त्याला थोडी हुशारी आली होती, पण अजून ऑटो चालवण्याइतकी ताकद त्याच्यात नव्हती. शेवटी त्याची बहीण येते आहे याची खात्री झाल्यावर मी दुसऱ्या ऑटोने निघाले. निघण्याआधी त्याला विचारलं, ‘मी जाऊ का तुझी बहीण येईपर्यंत थांबू?’ तर तो म्हणाला ‘जा’. ‘काहीतरी खायचं ना राव, असं उपाशीपोटी नाही चालवायचं’ असं कळकळीने सांगून तो इनोव्हा वालाही एअरपोर्ट कडे निघाला. हे सारं मी माझी भलावण करण्यासाठी लिहीत नाहीये, पण अश्या परिस्थितीत तातडीने मदत मिळणं महत्वाचं असतं आणि अशी वेळ कोणावरही येऊ शकते. तो मुलगा फक्त बावीस वर्षांचा होता, माझ्या लेकरांपेक्षा एक-दोन वर्षांनीच मोठा! तिथून निघताना एकच विचार माझ्या मनात घोळत होता, उद्या कधी माझी मुलं जगाच्या कुठल्याही काना कोपऱ्यात अशी अडचणीत असली, एकटी पडली, तर कुणातरी सहृदय व्यक्तीने असंच घटकाभर थांबून त्यांची मदत करावी. कारण कधी कधी इतकंच पुरेसं असतं, घटकाभर थांबणं आणि अश्या परिस्थितीत ‘मला काय त्याचे‘ असे म्हणून निघून जाण्याऐवजी आपल्याला शक्य ती मदत करण्याचा निर्णय घेणं. रात्री फोन करून तो मुलगा सुखरूप घरी पोहोचला आहे याची खात्री करून घेतली तेव्हाच माझा जीव भांड्यात पडला. — शेफाली वैद्य #🎭Whatsapp status
एपस्टीन: कोवळ्या मुलींवरचे बलात्कार कसे सहन करायचे? अमेरिकन सत्तेच्या काळ्याकुट्ट प्रकाशात काळोखाचेच साम्राज्य उभे राहते, तेव्हा काळोखानेच डोळे दिपतात. एवढेच नव्हे, तर आत्म्यालाही भोवळ येते. आपण एका अशा भयंकर जीवघेण्या अनैतिक युगात अडकलो आहोत जिथे विज्ञानाने प्रगतीची शिखरे तर पादाक्रांत केली असली, तरी नैतिकता संपलेली आहे. अलीकडे आपण मंगळावर वस्त्या वसवण्याच्या गप्पा मारतो आहोत. काय करायची आहे असली प्रगती? माणूस म्हणून तुम्ही वागू शकत नसाल आणि जर राक्षसी जनावर होत असाल, तर ही प्रगती कोणासाठी सुखदायी ठरणार आहे? आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर जग मुठीत धरण्याचे स्वप्न पाहतो आहोत; पण माणसाचे माणूसपणच संपले आहे.... या झगमगत्या जगाच्या पडद्यामागे जेव्हा नीच जेफ्री एपस्टीनसारखी भयावह प्रकरणे उघड होतात, तेव्हा लक्षात येते की, आपण सुसंस्कृतपणाचा केवळ मुखवटाच चढवलेला आहे, तो आता टराटरा फाटला आहे. आपल्यातले पशुत्व जराही मेलेले नाही, तर ते अधिक क्रूर आणि अधिक राक्षसी आणि आपल्या दुर्दैवाने ते अधिक संघटित झाले आहे. एखादा माणूस जेव्हा स्वतःला जगाचा उद्धारकर्ता मानू लागतो, जेव्हा लोक त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहतात, तेव्हा त्याच्या चारित्र्यावर पडलेला संशयाचा एक साधा डागही संपूर्ण समाजाचा विश्वास डळमळीत करतो. एलन मस्क किंवा तत्सम व्यक्तींकडे आपण जेव्हा उद्याच्या जगाचे निर्माते म्हणून पाहतो, तेव्हा त्यांच्या नावाचा संबंध अशा अघोरी प्रकरणांशी जोडला जाणे हे मनाला क्लेशदायक वाटते. हा केवळ एकाच व्यक्तीचा पराभव नाही, तर मानवी मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा हा अपेक्षाभंग आहे. त्या लिटल सेंट जेम्स नावाच्या बेटावर जे काही घडले, ते वाचतानाही रडू आवरत नाहीत. उलट्या था़ंबत नाहीत. हे लिहीताना अंग आणि हात थरथर कापत आहेत. समुद्राच्या लाटांच्या आवाजात तिथल्या निष्पाप बालकांच्या किंकाळ्या दाबून टाकल्या गेल्यात. ज्या वयात आईच्या घट्ट मिठीतून एक क्षणभरसुद्धा ते मूल बाजूला व्हायला तयार होत नाहीत, ज्या हातामध्ये खेळणी असायला हवीत, ज्या मुलीचे फारतर आई आणि बाहुली हेच विश्व होते अशा हजारो मुलींवर ज्यांना आपण राजकीय नेते आणि उद्योगपती समजतो जगातल्या सर्व आर्थिक नाड्या ज्यांच्या हातामधे आहेत, जे अतिशय प्रभावशाली लोक आहेत त्यांनी या छोट्या छोट्या कोवळ्या जीवांवर बलात्कार केलेले आहेत. ज्या वयात डोळ्यांमध्ये केवळ परीराणी आणि चिऊ काऊची स्वप्ने असायला हवीत, त्या वयात त्या कोवळ्या जिवांना सत्तांध आणि वासनांध नराधमांच्या तावडीत मनसोक्त बलात्कार करण्यासाठी दिले गेले. हे केवळ लैंगिक शोषणाचेच प्रकरण नाही, तर हे मानवी तस्करीचे एक अक्राळविक्राळ जाळे आहे. या जाळ्यात केवळ गुन्हेगार नाहीत, तर जगातील सर्वात प्रभावशाली म्हणवणारे राजकारणी, उद्योगपती आणि विचारवंतही सामील आहेत. जेव्हा सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर बसलेली माणसे अशा विकृत कर्मात गुंतलेली असतात, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था नावाच्या संकल्पना केवळ कागदावरच उरतात. हे लोक स्वतःला कायद्याच्या वर सर्व सत्ताधीश समजतात कारण त्यांच्याकडे सत्तेचे आणि संपत्तीचे खरोखरीचे बळ आहे. पण ही संपत्ती कुणाच्या रक्तावर आणि कुणाच्या आसवांवर उभी राहिली आहे, याचा विचार समाज म्हणून आपण कधी करणार आहोत? आज भारतातून दरवर्षी लक्षावधी महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. त्यांची आकडेवारी केवळ सरकारी कागदावर दिसत राहते; पण त्यामागील मानवी, कौटुंबिक शोकांतिका, वेदना आपण विसरतो. ज्या मुली गायब होतात, त्या कुठे जातात? त्या या असल्या एपस्टीन विकृतीसारख्या जागतिक स्तरावर चालणाऱ्या अमानवीय व्यापाराचा भाग तर बनत नाहीत ना? आपण गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या विषयावर लिहीत आलो आहोत. पण या प्रश्नांचा आवाज पोहचत नाही. मग अशा प्रश्नांकडे लक्ष कोण देणार? आपल्या देशात मुलीला देवीचे रूप मानले जाते, ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण इथेही जर लक्षावधी मुली सुरक्षित नसतील, तर आपल्या प्रगतीला काय अर्थ उरतो? जगाच्या व्यासपीठावर काही राजकारणी निव्वळ सत्तांध झाले आहेत, त्यांना केवळ खुर्ची टिकवण्याची काळजी आहे. समाजही कुठेतरी भलताच निद्रिस्त झाला आहे. जग अशा लोकांना आपले नेते मानत आहे, जे नैतिकतेच्या निकषावर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जे लोक लहान मुलांच्या जीवावर उठले आहेत, ज्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे, त्यांना हे जग समाज म्हणून पाठीशी कसे काय घालू शकते? या जगाच्या स्थितीकडे पाहताना आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे गरजेचे झाले आहे. अध्यात्म आपल्याला शिकवते की, प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश असतो; पण जेव्हा माणसाला या तत्त्वाचा विसर पडतो, तेव्हाच अशा राक्षसी प्रवृत्ती जन्माला येतात. सध्याच्या स्थितीचे वर्णन कसे करावे समजत नाही. तरीही करतो. नराकारं परं पापं सत्तामदविमोहितम् । अज्ञानतमसाच्छन्नं विस्मृतं मानवीकुलम् ।। क्रन्दन्ति शिशवस्तत्र पीडिताः स्वार्थसिद्धये । जागृहि त्वं समाजेऽस्मिन् धर्मरक्षणतत्परः ।। -गीताव्रत सत्तेच्या नशेने मद्यधुंद झालेले हे नराधम प्रत्यक्ष पापाचे स्वरूप आहेत. यांनी नरक निर्माण केले आहेत. अज्ञानाच्या आणि भोगाच्या लालसी अंधारात बुडून त्यांना त्यांच्या मानवी कुळाचा विसर पडलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी जिथे पाच- सहा -सात वर्षाच्या छोट्या छोट्या हजारो मुलींवर सामूहिक बलात्कार केलेले आहेत. त्यांचे जीव घेतलेले आहेत. इथे सगळे शब्द संपतात आणि थांबतात. तेव्हा आधी हे अमेरिकन समाजा, तूच आता जागृत हो आणि मानवधर्माच्या रक्षणासाठी तत्परतेने उभा राहा. अर्थात हे आव्हान आता प्रत्येक देशाला आहे. कोणताही धर्म म्हणजे पूजापाठ नव्हे, तर माणुसकी आणि नैतिकतेचे रक्षण होय. जर आपण सर्व भारतीयांनी आजच त्या राजकारण्यांना आणि प्रभावशाली लोकांना जाब विचारला नाही, तर आपणही त्यांच्या पापाचे वाटेकरी झालो आहोत हे समजून घ्यावे लागेल. अमेरिकेन नागरिकांनी ज्या क्रूर, नीच हातांना सत्ता दिली गेली, ते हात जर हजारो मुलींच्या रक्ताने माखलेले असतील, तर ती सत्ता उखडून टाकणे हेच तुमचे पहिले कर्तव्य ठरेल. एपस्टीनच्या त्या बेटाचा इतिहास हा विकृत गुन्हेगारीचा इतिहास आहे, हा इतिहास आपल्या, तुमच्या माझ्या इतिहासातला सर्वात मोठ्या नैतिक अध:पतनाचा साक्षीदार आहे. एपस्टीन तिथे जाणारे लोक केवळ करमणुकीसाठी जात नव्हते, तर ते एका अशा व्यवस्थेचा भाग होते जिथे जाऊन लहान लहान बाळांवर, मुलींवर जाऊन बलात्कार करायचा आहे हे त्यांना अगोदर ठाऊक होते. या अनेक देशातल्या विकृत पुढार्‍यांनी गरीब आणि असहाय्य मुलींना केवळ भोगवस्तू मानले होते. त्यांनी ज्या मुलींवर बलात्कार केले त्या वयाची तेवढी लहान मुलं त्यांच्या घरात निश्चितच कधीतरी असतील. या एपस्टीन फाईल्समध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांनी केवळ कायदेशीर गुन्हाच केलेला नाही, तर त्यांनी निसर्गाच्या सगळ्या नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा लोकांना समाजाने ताबडतोब वाळीत टाकले पाहिजे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळवणे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा दंड असेल. जोपर्यंत आपण अशा नराधमांचे उदात्तीकरण थांबवत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही. आपण केवळ बातम्या पाहून हळहळलो आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही विसरून गेलो, तर हे चक्र असेच सुरू राहील. या एपस्टीन प्रकरणाचा आपल्याला वस्तुनिष्ठपणे विचार करावाच लागेल. हे केवळ परदेशातील प्रकरण आहे असे मानून दुर्लक्ष करणे ही आपली सर्वात मोठी चूक ठरेल. आधी लक्षात घ्यायला हवंय की, हे जाळे संपूर्ण जगात पसरलेले आहे. आपल्या आजूबाजूलाही अशाच प्रवृत्ती काम करत आहेत. जेव्हा आपण एखादा प्रभावशाली माणूस पाहतो, तेव्हा त्याच्या संपत्तीकडे, वरवरच्या रूपाकडे पाहून भारावून न जाता, आधी त्याच्या चारित्र्याचा आणि कर्माचा विचार आपण खोलवर केला पाहिजे. ज्यांचे पाय गलिच्छ बरबटलेले आहेत आणि ज्यांचे मन किळसवाण्या काळोखाने भरलेले आहे, त्यांना अजूनही आपण आपले आदर्श का मानतोय? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. यावर चर्चा झालीच पाहिजे . हे सगळे व्हिडिओ आणि ईमेल्स प्रसिद्ध करण्यामागे न्यायालयाची हीच भूमिका आहे. न्यायालयाला वाटते की, समाजाच्या विवेकाला टोचणी लावणे गरजेचे आहे.जोपर्यंत सामान्य माणूस संघटित होऊन या सत्तेच्या माजाला उत्तर देत नाही, तोपर्यंत आपल्या मुली आणि मुले सुरक्षित राहणार नाहीत. याची खात्री न्यायालयाला सुद्धा आहे. हे लेखन भावनेच्या भरात केलेले नसून, आपण कोणत्या परिस्थितीत अडकलो आहोत याची जाणीव आता होते आहे. एपस्टीन एका क्रूर विकृत अमानवी वास्तवाचे दर्शन आहे. जेव्हा आपण माणुसकीच्या प्रश्नासंदर्भात विचार करतो, तेव्हा लक्षात येतेय की, कदाचित आपण आणि आपलाही देश किती मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर आहे. हे एपस्टीनची हजारो सामूहिक बलात्कारांची प्रकरणे म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. त्याखाली दडलेले सत्य अजूनही खूप काही बाहेर येणे बाकी आहे; पण न्यायालयाकडून जितके बाहेर आले आहे, तितकेच आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे आहे. आता वेळ आली आहे की, या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्या सत्तांध लोकांना समाजाबाहेर हाकलून दिले पाहिजे. त्यांना मिळणारी प्रतिष्ठा आणि सन्मान काढून घेतला पाहिजे. कदाचित परदेशातल्या प्रत्येक नागरिकाची हीच प्रतिक्रिया असेल. ज्यांच्या मनात दया नाही, ज्यांच्या कर्मात शुचिता नाही, ते समाजाचे नेतृत्व कसे करू शकतात? हा प्रश्न आता जागतिक स्तरावर नेला पाहिजे. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर हा लढा सत्याचा असत्याशी आणि प्रकाशाचा अंधाराशी आहे. आपण सत्याच्या बाजूने उभे राहू या आणि या अघोरी प्रथेचा अंत करण्यासाठी कंबर कसू या! आता थोडी हिंमत उसनी तरी आणावीच लागेल. नक्की घेऊ या! - ©® लेखक~ #🎭Whatsapp status
#🎭Whatsapp status #✍️सुविचार
🎭Whatsapp status - ख़ामोशी ईँगो नहीं , ख़ामोशी सब्र है। ig | @Apanidaayri] ख़ामोशी ईँगो नहीं , ख़ामोशी सब्र है। ig | @Apanidaayri] - ShareChat
"सोलापूर-अक्कलकोट हायवे आणि रात्रीचे १२ लुटारू" ही घटना आहे प्रकाश आणि त्याच्या कुटुंबाची. प्रकाश मुंबईहून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी निघाला होता. सोबत त्याची पत्नी मेघा आणि ७ वर्षांचा मुलगा आर्यन होता. प्रवासात उशीर झाल्यामुळे सोलापूर ओलांडायला त्यांना रात्रीचे १:३० वाजले. अक्कलकोट अजून ४० किलोमीटर दूर होते. रस्ता एकदम सामसूम आणि काळोखात बुडालेला होता. आजूबाजूला फक्त काटेरी झुडपे आणि ओसाड रान होतं. गाडी वेगात होती. अचानक एका वळणावर, प्रकाशला रस्त्याच्या मधोमध मोठे दगड मांडून ठेवलेले दिसले. त्याने जोरात ब्रेक दाबला. कर्रर्रर्र......! गाडी दगडांच्या अगदी जवळ जाऊन थांबली. प्रकाशला संशय आला. ही नक्कीच लुटारूंची पद्धत होती. त्याने रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण... गाडीच्या मागच्या काचेवर जोरात फटका बसला! धडाम! प्रकाशने आरशात पाहिलं. गाडीला चारही बाजूंनी ८-१० भयानक माणसांनी घेरलं होतं. त्यांच्या हातात कोयते, सळ्या आणि लाकडी दांडके होते. त्यांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते, फक्त क्रूर डोळे दिसत होते. एकाने ड्रायव्हर सीटची काच फोडली. काचांचे तुकडे प्रकाशच्या अंगावर पडले. "दरवाजा उघड! नाहीतर सगळ्यांना कापून टाकेन!" तो लुटारू ओरडला. मेघा आणि आर्यन भीतीने रडू लागले. प्रकाशने हात जोडले, "भाऊ, पैसे घ्या, दागिने घ्या, पण आम्हाला मारू नका." पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकाने प्रकाशला कॉलर पकडून बाहेर खेचलं आणि जमिनीवर पाडलं. दुसऱ्याने मेघाच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढायला सुरुवात केली. प्रकाश हतबल झाला होता. डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. त्याच्याकडे प्रतिकार करायला काहीच नव्हतं. त्याने जमिनीवर पडल्या पडल्या, रक्ताळलेल्या हातांनी माती पकडली आणि डोळे मिटून आर्त हाक मारली: "स्वामी... तुमच्या दर्शनाला आलो होतो, आता तुम्हीच बघा काय ते! अनन्यभावे शरण तुला..." त्या लुटारूंनी प्रकाशवर वार करण्यासाठी कोयता उगारलाच होता. तेवढ्यात... त्या काळोखात, गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक विचित्र गोष्ट घडली. जो लुटारू प्रकाशवर वार करणार होता, त्याचा हात हवेतच थिजला. त्याचे डोळे फाटले. तो प्रकाशच्या मागे बघत होता. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तो फक्त "बा... बा... बाप रे!" एवढंच ओरडला. बाकीच्या लुटारूंनीही प्रकाशच्या मागे पाहिलं आणि त्यांच्याही हातातले कोयते गळून पडले. जे क्रूर लुटारू मगाशी जीवाची पर्वा करत नव्हते, ते आता लहान मुलासारखे किंचाळत सैरावैरा पळू लागले! काहीजण काटेरी झुडपात पडले, काहीजण गाडीला धडकले, पण कोणालाच मागे वळून बघायची हिंमत नव्हती. अवघ्या १० सेकंदात सगळे लुटारू गायब झाले! प्रकाशला काहीच कळलं नाही. त्याने मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. फक्त ओसाड रस्ता आणि वारा वाहत होता. प्रकाशने घाईघाईने गाडीत बसून गाडी सुसाट पळवली आणि थेट अक्कलकोट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी प्रकाशची तक्रार नोंदवून घेतली आणि लगेच त्या स्पॉटवर टीम पाठवली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांचा प्रकाशला फोन आला. "साहेब, तुम्ही नशीबवान आहात! आम्ही त्या टोळीतल्या दोघांना पकडलं आहे. ते अट्टल गुन्हेगार आहेत, त्यांनी अनेक खून केले आहेत." प्रकाशने विचारलं, "पण साहेब, ते पळून का गेले? माझ्याकडे तर काहीच हत्यार नव्हतं." पोलिसांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून प्रकाशच्या पायाखालची जमीन सरकली. इन्स्पेक्टर म्हणाले: "आम्ही त्यांना हेच विचारलं. तर ते थरथर कापत म्हणाले की, जेव्हा ते तुमच्यावर वार करणार होते, तेव्हा तुमच्या गाडीच्या छतावर त्यांना एक १० फुटांचा, धिप्पाड, जटाधारी माणूस उभा असलेला दिसला! त्याचे डोळे आगीसारखे लाल होते आणि हातात एक प्रचंड त्रिशूळ होतं. त्याने फक्त एकदा हुंकार भरली, तर त्या लुटारूंचे कान बधीर झाले. त्यांना वाटलं तो 'राक्षस' त्यांना खाऊन टाकेल, म्हणून ते जीव वाचवून पळाले." प्रकाशला आठवलं, त्या क्षणी तिथे कोणीच नव्हतं... पण तरीही तिथे 'कोणीतरी' होतं. ज्या मातीवर प्रकाशने डोकं टेकलं होतं, ती साधी माती नव्हती, तर ती भक्ताच्या रक्षणासाठी आलेली स्वामींची साक्ष होती. तुम्ही एकटे आहात, असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुमची सर्वात मोठी चूक असते. कारण स्वामींची 'सावली' नेहमीच तुमच्या डोक्यावर असते, फक्त ती संकटाच्या वेळीच 'दृष्टी'स पडते. || अशक्य ही शक्य करतील स्वामी || #श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 - EHN5JNT 5665  Amel Salnkhe amol selvueha)१% "सोलापूर-अक्कलकोट हायवे आणि रात्रीचे १२ लुटारू" अंगावर काटा आणणारा अनुभव ! "रात्री १:३० वाजता हायवेवर हातात कोयते घेऊन आलेले ते १२ लुटारू अचानक लहान मुलासारखे रडत का पळाले? पोलिसांनी जेव्हा त्यांना कारण विचारलं , तेव्हा ऐकून इन्स्पेक्टरही सुन्न झाले! " EHN5JNT 5665  Amel Salnkhe amol selvueha)१% "सोलापूर-अक्कलकोट हायवे आणि रात्रीचे १२ लुटारू" अंगावर काटा आणणारा अनुभव ! "रात्री १:३० वाजता हायवेवर हातात कोयते घेऊन आलेले ते १२ लुटारू अचानक लहान मुलासारखे रडत का पळाले? पोलिसांनी जेव्हा त्यांना कारण विचारलं , तेव्हा ऐकून इन्स्पेक्टरही सुन्न झाले! " - ShareChat
पुण्यातील सदाशिव पेठेतल्या एका मोठ्या मेडिकल स्टोअरमध्ये संध्याकाळी खूप गर्दी होती. तरुण मुले-मुली, वयस्क लोक औषधे घ्यायला उभे होते. तिथेच काचेच्या दारात एक ५०-५५ वर्षांचा माणूस येऊन उभा राहिला. नाव त्याचं 'बापू'. बापूची अवस्था बघण्यासारखी नव्हती. अंगावर फाटका शर्ट, ज्याला ५-६ ठिकाणी गाठी मारलेल्या होत्या. वाढलेली दाढी, विस्कटलेले केस आणि अंगाला एक प्रकारचा कुबट वास येत होता. तो एक कचरा वेचणारा (Ragpicker) होता. तो घाबरत घाबरत काऊंटरच्या पुढे आला. तिथे उभ्या असलेल्या एका कॉलेजच्या मुलाने नाकाला रुमाल लावला आणि म्हणाला, "ए काका, लांब उभा राहा ना. वास येतोय. आंघोळ करत जा कधीतरी." बापूने मान खाली घातली, थोडा मागे सरकला. गर्दी कमी झाल्यावर त्याने खिशातून चुरगळलेल्या १०-२० रुपयांच्या नोटा आणि काही चिल्लर काऊंटरवर ठेवली. आणि अतिशय बारीक आवाजात मेडिकलवाल्याला म्हणाला, "साहेब, एक... ते... सॅनिटरी पॅड्सचं (Sanitary Pads) पाकीट द्या हो." हे ऐकताच दुकानात पिन-ड्रॉप सायलन्स पसरला. मेडिकलवाल्याने रागाने विचारलं, "काय पाहिजे?" बापू पुन्हा म्हणाला, "ते बायांचं... पॅड द्या." बाजूला उभ्या असलेल्या ३-४ तरुण पोरांनी एकमेकांकडे बघून फिदीफिदी हसायला सुरुवात केली. एकाने टोमणा मारला, "काय ओ काका? या वयात? गर्लफ्रेंड तरुण आहे वाटतं? का स्वतःसाठीच वापरणार आहात?" दुकानात हशा पिकला. मेडिकलवाला ओरडला, "ए बाबा, इथे मस्करी चालू आहे का? तुला कशाला हवंय ते? खायला अन्न मिळत नाही आणि हे विकत घ्यायला पैसे कुठून आले? नक्कीच दारू पिऊन आला असशील. चल निघ इथून." बापूचे डोळे पाण्याने भरले. तो हात जोडून म्हणाला, "साहेब, मस्करी नका करू. खूप गरज आहे. हे घ्या पैसे, पूर्ण आहेत." मेडिकलवाल्याने नाईलाजाने रागाच्या भरात एक पॅकेट काऊंटरवर फेकून मारलं. "घे आणि मर तिकडे." बापूने ते पॅकेट आपल्या मळक्या पिशवीत लपवलं आणि चोरासारखा मान खाली घालून तिथून पळाला. दुकानातला हा प्रकार तिथेच उभ्या असलेल्या 'सागर' नावाच्या एका पत्रकाराने पाहिला. सागरला त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आणि वेदना बघून शंका आली. 'एखादा भिकारी हे का विकत घेईल?' सागरने आपली गाडी काढली आणि गुपचूप बापूचा पाठलाग सुरू केला. बापू शहराबाहेरच्या पुलाखालच्या एका झोपडपट्टीत गेला. तिथे खूप घाण होती, डुकरांचा सुळसुळाट होता. एका पत्र्याच्या शेडजवळ बापू थांबला. सागर लांबून बघत होता. त्या शेडमध्ये एक २५-२६ वर्षांची 'मनोरुग्ण' (Mental) तरुणी बसली होती. तिचे कपडे फाटके होते, केसांना जटा झाल्या होत्या आणि ती स्वतःच्याच धुंदीत शून्यात बघत होती. तिला स्वतःच्या शरीराचे भान नव्हते. बापू तिथे गेला. त्याने आजूबाजूला पाहिलं. तिथे शेजारी राहणाऱ्या एका बाईला त्याने हाक मारली. "तायी... ओ तायी... इकडे या ना." ती बाई आली. बापूने आपल्या पिशवीतून ते 'पॅड्सचं पाकीट' आणि एक वडापाव काढला. तो त्या बाईला म्हणाला, "तायी, या पोरगीला आज ४ दिवस झालेत... कपडे खराब झालेत तिचे. तिला कळत नाही ग काही. लोक हसतात, दगड मारतात. हे पॅड घे, तिला नेऊन साफ कर आणि हे लावून दे. आणि हा वडापाव तिला खाऊ घाल. मी इकडे बाहेर थांबतो." ती बाई त्या मुलीला घेऊन आडोशाला गेली. बापू तिथेच बाहेर एका दगडावर बसून पहारा देऊ लागला, जेणेकरून कोणी त्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघू नये. हे दृश्य बघून झाडामागे लपलेल्या सागरच्या अंगावर काटा आला. त्याला मगाशी मेडिकलमध्ये त्या मुलांनी मारलेले टोमणे आठवले. सागर बापू जवळ गेला. "काका..." बापू दचकला. सागरला बघून घाबरला. सागरने विचारलं, "कोण आहे ही मुलगी? तुमची कोण लागते?" बापूने डोळे पुसले आणि एक खोल श्वास घेऊन म्हणाला: *"कोण कुठली मला माहित नाही साहेब. ६ महिन्यांपूर्वी मला ही कचराकुंडीजवळ सापडली. लोक तिला वेडी म्हणून दगड मारत होते. काही नराधम कुत्रे रात्री तिच्यावर झडप घालायच्या तयारीत होते. मला बायको नाही, पोरं-बाळं नाहीत. मला वाटलं, जर मी हिच्याकडे दुर्लक्ष केलं, तर हे जग हिचे लचके तोडून खायील. ती वेडी आहे साहेब, तिला माहित नाही 'ते' दिवस काय असतात. रक्ताने कपडे भरले की माश्या बसतात, इन्फेक्शन होतं. लोक म्हणतात, तू भिकारी आहेस, तुला काय करायचंय? अरे, पण मी 'बाप' तर होऊ शकतो ना? लोक हसतात जेव्हा मी मेडिकलमध्ये जातो. हसू दे. जोपर्यंत हा 'बापू' जिवंत आहे, तोपर्यंत या पोरीची इज्जत रस्त्यावर जाऊ देणार नाही."* सागरला बोलायला शब्दच सुचत नव्हते. ज्या माणसाला मेडिकलमध्ये लोकांनी 'चरित्रहीन' आणि 'वेडा' समजून हुसकावलं होतं, तो माणूस एका बेवारस, मनोरुग्ण मुलीचा 'बाप' बनून तिची लज्जा रक्षत होता. समाजातल्या तथाकथित 'सभ्य' माणसांपेक्षा या कचरा वेचणाऱ्या बापूचं मन कितीतरी पटीने स्वच्छ होतं. सागरने खिशातले सगळे पैसे काढले आणि बापूच्या हातात दिले. पण बापूने ते घेतले नाहीत. तो हसून म्हणाला, "साहेब, पैसे नको. फक्त जेव्हा कधी मी दुकानात हे मागायला येईल, तेव्हा लोकांना सांगा की हसू नका. कारण एका बापाला आपल्या मुलीसाठी हे मागायला खूप हिंमत लागते." कोणाच्या बाह्य रूपावरून किंवा तो काय विकत घेतोय, यावरून त्याची चेष्टा करू नका. जगात अशी अनेक नाती आहेत जी रक्ताची नसतात, पण माणुसकीची असतात. एका स्त्रीचा सन्मान जपण्यासाठी श्रीमंत असावं लागत नाही, फक्त 'पुरुष' असून चालत नाही, 'माणूस' असावं लागतं. #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - udl u೩le_ ٤١١٢٢٢٢ LLDEa त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याने मेडिकलमध्ये जेव्हा सॅनिटरी पॅड्स' (Pads ) मागितले... तेव्हा लोकांनी त्याची खूप चेष्टा केली! दुकानदाराने पॅकेट फेकून मारले. गेला, पण तो ते पॅकेट घेऊन 'कुणाकडे हे बघून पाठलाग करणाऱ्या पत्रकाराने भर रस्त्यात त्याचे पाय धरले! udl u೩le_ ٤١١٢٢٢٢ LLDEa त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याने मेडिकलमध्ये जेव्हा सॅनिटरी पॅड्स' (Pads ) मागितले... तेव्हा लोकांनी त्याची खूप चेष्टा केली! दुकानदाराने पॅकेट फेकून मारले. गेला, पण तो ते पॅकेट घेऊन 'कुणाकडे हे बघून पाठलाग करणाऱ्या पत्रकाराने भर रस्त्यात त्याचे पाय धरले! - ShareChat
#🎥भक्ती Video #शेगाव श्री गजानन महाराज #🌹श्री गजानन महाराज प्रसन्न...🌹
🎥भक्ती Video - ShareChat
01:57
#श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा💐💐 #🌺शेगावीचा योगीराणा संत श्री गजानन महाराज
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा💐💐 - a बतपणात चात ঠিসানন|  महाराज प्रकटदिना निमित्त  যবলা মগলময शुभेच्छा ! ! a बतपणात चात ঠিসানন|  महाराज प्रकटदिना निमित्त  যবলা মগলময शुभेच्छा ! ! - ShareChat
ही घटना मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घडली. डॉ. समीर हे एक प्रख्यात न्यूरोसर्जन (Neurosurgeon) होते. ते देवाला मानत नव्हते. त्यांच्यासाठी 'विज्ञान' हेच अंतिम सत्य होतं. रात्रीचे २ वाजले होते. ICU मध्ये 'अद्वैत' नावाचा ७ वर्षांचा मुलगा ॲडमिट होता. त्याचा ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) झाला होता आणि जगण्याची शक्यता फक्त १% होती. अचानक मॉनिटरवरची रेष सरळ झाली... 'बीप........' अद्वैतचं हृदय बंद पडलं. डॉ. समीर आणि त्यांच्या टीमने खूप प्रयत्न केले, शॉक दिले, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी, रात्री २:१५ वाजता डॉ. समीर यांनी अद्वैतला 'Dead' (मृत) घोषित केलं. त्यांनी अद्वैतच्या अंगावर पांढरी चादर ओढली आणि ते बाहेर जाऊन पालकांना सांगणार होते. पण अद्वैतची आई, जी एक निस्सीम स्वामी भक्त होती, ती धावत ICU मध्ये घुसली. तिने डॉक्टरांचे पाय धरले. "डॉक्टर, फक्त ५ मिनिटे द्या! त्याला नेऊ नका. माझे स्वामी त्याला काहीच होऊ देणार नाहीत." डॉ. समीर चिडले, "बाई, विज्ञान भावनेवर चालत नाही. तुमचा मुलगा गेलाय. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या." पण त्या मातेचा आक्रोश बघून डॉक्टरांनी फक्त २ मिनिटे थांबायची परवानगी दिली. त्या आईने आपल्या पर्समधून स्वामींची 'उदी' काढली. थरथरत्या हाताने ती उदी अद्वैतच्या कपाळावर लावली आणि त्याच्या कानात जोरात म्हणाली, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! बाळा, ऊठ! स्वामी आलेत!" आणि त्याच क्षणी... ज्या मॉनिटरची रेष सरळ झाली होती (Flatline), त्यावर अचानक एक 'स्पाइक' (Spike) आली. 'बीप... बीप... बीप...' हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले! डॉ. समीर यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे 'मेडिकली इम्पॉसिबल' होतं. मृत घोषित केलेलं शरीर ५ मिनिटांनी पुन्हा कसं जिवंत होऊ शकतं? त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. अद्वैतचा श्वास परत आला होता. पण खरा थरार आणि सस्पेन्स अजून पुढेच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत शुद्धीवर आला. डॉ. समीर त्याला तपासायला गेले. त्यांनी विचारलं, "बाळा, तुला आठवतंय काय झालं होतं?" अद्वैतने जे उत्तर दिलं, ते ऐकून डॉ. समीर यांची झोपच उडाली. अद्वैत म्हणाला, "डॉक्टर, रात्री खूप अंधार होता. मला भीती वाटत होती. तेव्हा तिथे एक आजोबा आले. त्यांची दाढी पांढरी होती आणि हात खूप लांब होते (आजानुबाहू). त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, 'चल उठ, तुला काहीच झालं नाहीये'. डॉक्टर, ते बघा... त्या आजोबांनी मला जाताना हा खडीसाखर खायला दिली." अद्वैतने आपली छोटीशी मूठ उघडली. डॉ. समीर अवाक झाले. ICU मध्ये बाहेरच्या वस्तूंना सक्त मनाई असते (Sterilized Zone). तिथे कोणालाही जाता येत नाही. तरीही... अद्वैतच्या मुठीत एक मोठा खडीसाखरेचा खडा होता! आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे - जेव्हा डॉ. समीर यांनी रात्रीचे CCTV फुटेज चेक केले, तेव्हा त्यांना दिसले की अद्वैतच्या बेडजवळ कोणीच नव्हतं. पण... बरोबर २:१७ वाजता, जेव्हा अद्वैतच्या हृदयाचे ठोके परत सुरू झाले, तेव्हा फुटेजमध्ये अद्वैतच्या डोक्यावरची चादर आपोआप खाली सरकली होती आणि त्याच्या कपाळावर उदी लाल्यासारखा डाग अचानक उमटला होता! कुणीतरी अदृश्य शक्तीने तिथे येऊन 'ऑपरेशन' केलं होतं, जे कॅमेऱ्याला दिसलं नाही, पण त्या चिमुकल्या जीवाच्या मुठीत 'प्रसाद' मात्र नक्कीच सोडून गेलं होतं. त्या दिवसापासून डॉ. समीर यांनी आपल्या केबिनमध्ये स्वामींचा फोटो लावला. जेव्हा विज्ञानाचे दरवाजे बंद होतात, तेव्हा अध्यात्माचा दरवाजा उघडतो. ज्याला डॉक्टर 'मिरॅकल' (चमत्कार) म्हणतात, भक्तांसाठी ती स्वामींची 'कृपा' असते. || अशक्य ही शक्य करतील स्वामी || #श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 - Anel Salunkhe emol salerlsne११9 "ICU नंबर 3 आणि '्तो' अदृश्य डाक्टर" "ICU मध्ये बाहेरच्या वस्तूंना सक्त मनाई होती, तरीही शुद्धीवर आलेल्या त्य़ा मुलाच्या ती' खडीसाखर कुठून आली? मुठीत डॉक्टरांचे धाबे दणाणले! " Anel Salunkhe emol salerlsne११9 "ICU नंबर 3 आणि '्तो' अदृश्य डाक्टर" "ICU मध्ये बाहेरच्या वस्तूंना सक्त मनाई होती, तरीही शुद्धीवर आलेल्या त्य़ा मुलाच्या ती' खडीसाखर कुठून आली? मुठीत डॉक्टरांचे धाबे दणाणले! " - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - वाटणीचा वाद.. वडिलांच्या कष्टांनी उभं राहिलेलं घर जेव्हा वाटणीच्या कागदावर येतं तेव्हा भिंतीपेक्षा आधी नाती तुटतात, लहानपणी एकाच ताटात वाढलेली माणसं अचानक मोजमापाच्या शब्दांत एकमेकांकडे पाहू लागतात, प्रेमाची जागा हिशेब घेतो आणि आठवणींची किंमत चौकटीत अडकते , ज्यांनी छपरासाठी घाम गाळला त्यांची नावे मात्र चर्चेतही राहत नाहीत, भावाच्या नजरेत संशय उतरतो आणि बहिणीच्या डोळ्यात भीती दाटते, आईंच्या स्वयंपाकघरातला सुगंधही कडू वाटू . लागतो , कागदावरची रेषा माणसांच्या मधे भिँत उभी  माणुसकी विसरतो , करते , न्याय मागताना माणूस जिंकण्याच्या हट्टात हरवलेली आपुलकी कुणालाच परत मिळत नाही , थोडं कमी मिळालं तरी चालेल पण नातं शिकवत नाही , वाटणी संपते पण লতামলা মন & ক্তুতী आयुष्यभर जिवंत राहतो , आणि शेवटी मनातला वाद कळतं की मालमत्तेपेक्षा माणूस मोठा असतो , फक्त हे कळायला उशीर होतो, फार उशीर. Herathi Facts वाटणीचा वाद.. वडिलांच्या कष्टांनी उभं राहिलेलं घर जेव्हा वाटणीच्या कागदावर येतं तेव्हा भिंतीपेक्षा आधी नाती तुटतात, लहानपणी एकाच ताटात वाढलेली माणसं अचानक मोजमापाच्या शब्दांत एकमेकांकडे पाहू लागतात, प्रेमाची जागा हिशेब घेतो आणि आठवणींची किंमत चौकटीत अडकते , ज्यांनी छपरासाठी घाम गाळला त्यांची नावे मात्र चर्चेतही राहत नाहीत, भावाच्या नजरेत संशय उतरतो आणि बहिणीच्या डोळ्यात भीती दाटते, आईंच्या स्वयंपाकघरातला सुगंधही कडू वाटू . लागतो , कागदावरची रेषा माणसांच्या मधे भिँत उभी  माणुसकी विसरतो , करते , न्याय मागताना माणूस जिंकण्याच्या हट्टात हरवलेली आपुलकी कुणालाच परत मिळत नाही , थोडं कमी मिळालं तरी चालेल पण नातं शिकवत नाही , वाटणी संपते पण লতামলা মন & ক্তুতী आयुष्यभर जिवंत राहतो , आणि शेवटी मनातला वाद कळतं की मालमत्तेपेक्षा माणूस मोठा असतो , फक्त हे कळायला उशीर होतो, फार उशीर. Herathi Facts - ShareChat