#🔴PM मोदींच्या 5 आर्थिक आव्हाने देशात खळबळ➡️ : 'पुढील एक वर्ष सोने खरेदी करु नका', पंतप्रधान मोदींचं आवाहन....................
आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला पुढचे एक वर्ष सोने खरेदी करु नये असं आवाहन केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हैदराबाद येथे सभा पार पडली..
यावेळी त्यांनी देशाच्या नागरिकांना उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे जगात मोठं तेलसंकट ओढावलं आहे. युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम पडला आहे. आता या तेलसंकटाचे धग भारतालाही बसत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकट काळात पुढचे एक वर्ष सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच खाद्य तेलाचा देखील वापर कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
#😭प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघातात दुःखद निधन💐 : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा...............................
वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास.....
मनोरंजन विश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास आऊटर रिंग रोडवरील (ORR) एक्झिट १२ जवळील बेंगलुरु येथे एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्याचा आणि एका कॅमेरामनचा समावेश आहे. ते प्रवास करत असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
#👩🦰मातृदिनाच्या शुभेच्छा🌹 #🧚♀️माझी आई #🤱मदर्स डे स्टेटस🥰 #👩👧👦 आई आणि बाळ #👩👧👦 आई आणि बाळ #🤱आईची शिकवण🥰
#📢दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलीच अव्वल😍 दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!.........................
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यातून एकूण १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. विभागांनुसार विचार केला असता, कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.४१ टक्के) लागला आहे.
राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, ४ लाख २२ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीसह प्राविण्य मिळवले आहे.
#😥कलिंगडामुळे नाही ‘या’मुळे झाला मृत्यू; धक्कादायक खुलासा : कलिंगड खाल्ल्याने नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू..............................
मुंबईतील पायधूनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूचा छडा 11 दिवसांनंतर लागला आहे. या चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने नाही, तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
फॉरेन्सिक अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडाच्या नमुन्यांमध्येही 'झिंक फॉस्फाईड' या घातक रसायनाचे अंश आढळल्याने वैद्यकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
#🚩 जय जय महाराष्ट्र माझा #🚩महाराष्ट्र दिन स्पेशन गाणी🎵




