#😱जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, 6 जणांची हत्या : २५ एकर जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या; खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध निराळे कुटुंबावर काळाचा घाला................
जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खिल्लार बैलांचे संगोपन करणारे आणि 'निराळे सावकार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या निराळे कुटुंबातील सदस्य या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.