*अंधश्रद्धेच्या सीमा ओलांडून श्रद्धेने जीवन जगा*
*जगात अतिशय भावनिक समाज तर कुठे वास्तव्यात असेल तर तो फक्त " भारत देशात " परंपरा संस्कृती व विविध धर्म,पंथ जाती बोलीभाषेने नटलेला हा देश अतिपुरातन संस्कृतीचे प्रतीक म्हणून जगभरात मानला जातो! इसवी सन पूर्वीपासून भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध संस्कृतींपैकी एक आहे, जिचे मूळ सिंधू संस्कृती हडप्पा-मोहेंजोदारो आणि वैदिक काळापर्यंत जाते, सिंधू-सरस्वती संस्कृती नावाने ओळखली जाते, जी प्रगत शहरी नियोजन, व्यापार आणि कलेसाठी ओळखली जाते, ही संस्कृती धर्म, अध्यात्म, योग, वेद आणि वैविध्यपूर्ण भाषांचा एक अनोखा संगम मानले जाते. भारत देशासारखा देश या विश्वात सुद्धा शोधून मिळायचा नाय! श्रद्धे आणि विश्वासाचा प्रतीक असलेला देश काही बांडगुळांमुळे दिशाहीन होत आहे. भावनेचा खेळ करत आसाराम बापू, राम रहीम तर आता कृष्णाचा अवतार सांगणारा खरात, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडूर गावचा रहिवासी तलवार बाबा उर्फ ज्ञानेश्वर बाबा स्वतःला देवाचा अवतार सांगत तलवारीच्या धाकाने महिलांचे, नागरिकांचे आर्थिक शोषण तर स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार वसईतीलभोंदू बाबा ऋषिकेश सारख्या माणसांमुळे फक्त श्रद्धेला धक्का लागला नाही. तर माणुसकीला काळीमा लागला आहे. खरं पाहिलं तर अनेक भोंदू बाबांमुळे तर नुस्कान होत आहे. त्यात अती उच्चभ्रू लोकांचा समावेश सर्वसामान्यांना भाग पाडत आहे. आयुष्यात सर्व काही सुख सुविधा असून सुद्धा बुवा बाबांच्या आश्रमात रांगा लावणाऱ्या उच्चशिक्षित, उच्चप्रोफाइल असलेल्या काही स्त्रिया,माणसे आपल्याला अनेक भोंदू बाबा चे प्रकरणात दिसून आले आहेत! सर्वसामान्यांच्या जीवनात नवीन विचार जर पेरले जात असतील तर ते उच्चभ्रू लोकांकडून; खरंतर येत असतात. याचे उदाहरण आपल्याला अनेक देता येतील जसे अभिनेते, मोठेनेते, व इतर उच्चभ्रू लोक त्यांचे आंतरजातीय लग्न, प्रेम विवाह, व मोठ्या प्रमाणात खर्च, दान तसंच टीव्ही सिरीयल मधून पिक्चर मधून खूप काही घेऊन एका प्रकारे बराबरी करण्याचं काम सर्वसामान्य करत आयुष्याच्या वाटोळ करताना दिसत आहे.*
*समाजातील सामाजिक,राजकीय, आर्थिकदृष्ट्या सशक्त असलेल्या लोकांकडून श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेत डुक्की मारणाऱ्यांना सर्वच आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत, घरी पाच पिढ्यांच आर्थिक प्रबळ वातावरण असून सुद्धा मनशांतीच्या नावाखाली व मनातील वाढत्या संशयाला व मनस्तापाला कुठेतरी श्रद्धेच्या नावाने पानफुल वाहण्यासाठी हे होतं का? पाहण्याचा उचित ठरेल. तर खरंच असंच होत आहे. यातमात्र शंका नाही. सर्व काही असून सुद्धा बुवा बाबांकडे आणखीन काय पाहिजे! कशासाठी जावं याचा विचार आता केला पाहिजे. समाज जीवनात जीवन जगत असताना आपल्यापेक्षा खालच्याकडे पाहून खरंतर मोठेपणाने जीवन जगले पाहिजे! आपल्याकडे सर्व काही सुख सुविधा असतांना व खालच्या कडे दोन वेळच्या भाकरीची सोय नसणाऱ्या व आपल्या मुलांचे भविष्य अतिशय शून्यात असणाऱ्या, बेरोजगार कुटुंबाकडे काही खरं नसून सुद्धा स्वाभिमानाने सन्मानाने जीवन जगणाऱ्यांकडून जीवन सांभाळून जगण्याची नैतिकता शिकली पाहिजे! असे मला वाटते. खरंतर पृथ्वीतलावर ईश्वराने तयार केलेला कोणतीही श्रद्धा ही वाईट नाही! पण श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा करणारी काहीच वृत्ती समाजाने आज ओळखण्याची गरज आहे. नक्की आपल्याला कायपाहिजे! ते ठरवलं पाहिजे. आपल्याला येणाऱ्या पिढीला नक्की काय द्यायचं कसं घडवायचं हे आता ठरवून शक्य होऊ शकते! वेळ ही थांबत नाही. त्याचं सोनं करण्याची शक्ती मानवी जीवनात नक्कीच आहे.*
*खरंतर समाजातील माणसं सशक्त करायची का, अशक्त हे एकदा प्रतिष्ठित लोकांनी ठरवून घ्यायला पाहिजे? का फक्त गुलामांची फौज तयार करायची ? डॉ. नरेंद्र दाभोलकर (अंनिस), कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी कोण होते, तर ते आपल्याच समाज, धर्मातील विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून समाजातील अंधश्रद्धा दूर करून लोकांच्या जीवनात प्रकाश पाडण्यासाठी काम करत होते! मात्र त्यांना विरोध करून त्यांच्या हत्या करण्यात आली ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी तीनशे साडेतीनशे वर्षापुर्वी भोदुगीरी लोकांबद्दल एक अभंग लिहिले होते. ते आज खरे ठरत आहे.*
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका म्हणे सांगों किती । जळो तयांसी संगती ॥४॥
*जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज कोण होते. तर आपल्याच धर्मातील चुकीचं वागणाऱ्या, समाजाचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा व अंधश्रद्धेवर प्रहार करून मानवी जीवनासाठीच काम करत होते. तरीसुद्धा त्यांनाही विरोध झाला, खरंच आपली माणसं अंधश्रद्धा मुक्त होऊन त्यांच्या बौद्धिक, मानसिक ,आर्थिक, सामाजिक विकास झाला पाहिजे की नाही. असा सवाल अनेक प्रकरणातून पुढे येते आहे. सर्व काही चालत असताना मात्र आसाराम बापू , राम रहीम सारखे माणसं आज अनेक आरोपाखालीच कारागृहात असताना सुद्धा आजही त्यांचे हजारो भक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळतात! तर खरात बाबा सुद्धा बाहेर आल्यावर त्याचे भक्त मोठ्या उत्साहाने परत एकदा कामाला लागतील यात वाईट वाटण्यासारखं काही नसेल!*
*भारतीय समाजात अंधश्रद्धा सर्वाधिक जर कुठे पाहायला मिळत असेल तर ती छाती ठोकून आपण सांगू शकतो श्रीमंत, उच्चशिक्षित, मोठ्या पदावर अधिकारी, राजकारणी, काळी माया जमवणारे दोन नंबरे, उच्च दर्जाच्या लोकांमध्ये अधिकाधिक दिसून येते! जेवढी जास्त प्रगती झाली तेवढा अंधश्रद्धे मोठी डुबकी! भीती कशाची वाटते? भीती तर वाटते पण पेशा सुद्धा झाला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समस्या असतात पण आपण सुशिक्षित अर्थपूर्ण असल्यामुळे समस्येवर मात करू शकतो विनाकारण भोंदू बाबाच्या जाळ्यात अटकून स्वतःचे नुकसान करून समाजाला वेगळ्या वळणावर न्यायचं काम बंद केलं पाहिजे. ज्याठिकाणाहून आपलं राज्य देश चालतो कायदा बनतो माणसाला दोरीत कसं चालावं यावर मार्गदर्शन तत्त्व निर्माण होतात! असे लोक सुद्धा या बाबाबुवांच्या नादी लागून देशाच, समाजाचा वाटोळ करायला निघाले आहेत, हे एक लाजिरवाणी आहे. पालावर राहणारे, झोपडीत राहणाऱ्या लोकांकडे रोज सूर्य उगवतो तस्या हजारो समस्या घेऊन दिवस हिमतीने जगतो, जीवनात सर्व काही समृद्धी असून सुद्धा भोंदू बाबांच्या मागे लागतात! खर तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. कौटुंबिक वादविवाद, भविष्याची चिंताअडचणी, वैवाहिक तणाव, आरोग्याची समस्या, व्यसन, महागाई, बेरोजगारी यात एकटेपणाच्या भावना या सर्व गोष्टीचा व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम होऊन तो कुठेतरी आधार शोधतो. याचाच पुरेपूर फायदा घेऊन खरात सारखे (स्वयंघोषित ) भोंदू बाबा यांच्या मानसिकतेवर विजय मिळवून त्यांचे शोषण करतात! यासाठीच म्हणतो महाराष्ट्र असंख्य संत विचाराने प्रेरित असलेल्या समृद्धीच्या विचाराने जीवन जगा, संतविचाराकडे चला...! काहीच कमी पडणार नाही. माणूस हा परग्रहावर पोचला पण आपण अजूनही अंधश्रद्धेच्या सीमा ओलांडून श्रद्धेने जीवन जगण्याची तत्व स्वीकारत नाही! हे वास्तववादी सत्य जर आपण स्वीकारून श्रद्धेने जीवन जगण्याचा मोह पकडला! तर प्रत्येकाचं कल्याण होऊन देशाचं ही उज्वल भविष्य निर्माण होईल याच शंका नाही.*
*प्रल्हाद भिसे पाटील*
*पत्रकार मेहकर*
*9511345111* #🙏भक्ती सुविचार📝 #😇भक्तांचा शनिदेव #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🙏आई एकविरा 🙏 #🙏प्रेरणादायक / सुविचार
*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही*
*गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्या गेल्या होत्या, मात्र मा. न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वप्रथम नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र अनेक ठिकाणी आरक्षणाचे वाद व उमेदवाराची छाननी, सदस्य अपात्रतिशी संबंधित न्यायालयीन याचिका प्रलंबित होत्या, त्यामुळे या प्रकरणातील काही मतदारसंघातील निवडणुका २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आल्या; त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावरच निकाल जाहीर करणे आवश्यक असल्यामुळे दोन्ही टप्प्यांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला पार पडली, मात्र यावेळी मतदारांची व उमेदवारांची अनैतिकता जगासमोर आली तर घराणेशाहिच्या मर्यदेचा बांध फुटला, नागरिकांनी आपली चन-चन मोठ्या प्रमाणावर दूर करून घेतली तर उमेदवारांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर पूर्ण करून दिली. यामुळेच देणारे व घेणाऱ्यांच्या अनैतिकतेने लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.*
*निवडणुकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीत चालणारी म्हणणाऱ्यांना चपरा, देवाणघेवाण आता उच्च,शिक्षित, प्रतिष्ठेची अंमलबजावणी करण्याच्या ( काही सोडलेतर ) घराघरा पर्यंत पोहचली तर झोपडपट्टी फक्त बदनाम आहे? खरतर गेल्या तीन-चार वर्षांपासून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,जिल्हापरिषद, पंचायत समित्यावर प्रशासक कार्यरत आहे, मात्र या काळात नागरिकांच्या प्रत्यक कामे झाली, तर विकास थांबला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर लोकशाही आणणे, जनतेच्या गरजा " शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते " पूर्ण करणे स्थानिक भागात विकासाची गंगा आणून लोकशाहीत जगण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एक माध्यम आहे, मात्र आता या निवडणुकीत परिस्थिती हळू हळु बदलून या नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवकांची फळी धाब्यावर नंगा नाच, तर गल्लीबोळ्यात मद्यपेय व देवाण-घेवाण आचारसहितेत लोकशाही धिंडवडे उडवत, तर मतदानदिनी सुद्धा मतदान केंद्राच्या बाजूला देवाण-घेवानीचे अड्डे लोकशाहीला जिवंतपणी मरण यातना देत होते.*
*यासर्व घडामोडीत घराणेशाहीच पूर्वीपासून भारतीय राजकारणात सुरू असलेले राजकारण टीका टिप्पणी ; सरकार बदली, परंतु आताच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले, एक व्यक्ती जास्त काळ राजकारणात टिकून राहणे कठीण असल्याने, घरातील एक मोठ्या पदांवर तर घरातील दुसऱ्यासदस्यांनी आमदार, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती,बँक, ठेकेदारी, कारखानदारी असा क्रम सुरू झाला, यातून स्थानिक पातळीवरील पाठीराख्यांची साखळी विणली गेली आणि कौटुंबिक राजकारण सोयीस्कर होत गेले, आज सुद्धा हेच सुरू आहे, मुळात मोह सत्तेचा नाही, संपत्तीचा आहे. संपत्तीचा मोह भागवण्यासाठी सत्ता हवी, सत्ता हे सेवेचे साधन नसून ते भोगाचे साधन झाल्यामुळे त्यात घराणेशाही सुरूच् आहे, आता झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये सर्वच पक्षाची घराणेशाही यावेळी दिसून आली आहे, जवळपास ७० टक्के एवढे नगराध्यक्ष व सदस्यपदाच्या उमेदवाऱ्या नेत्यांनी आपल्या घरच्यांना दिल्याचे दिसून आले आहे.*
*यावेळी मात्र सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा का? असा सवाल निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून, या प्रक्रिये सहभागी होण्यासाठी समजल्या जाणाऱ्या या निवडणुकात जीवाचं रान करणारे कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्याकडून उमेदवारी मागते वेळेस बजेट विचारले जात आहे. मग त्यांच्याकडे बजेट नसेल तर त्यांनी फक्त झेंडेच उचलावे का? हुकूमशाहीत राजाचा मुलगा राजा होत होता. मात्र आता लोकशाहीला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. अतिशय उच्चांक गाठलेल्याया निवडणूक प्रक्रियेत देवाण-घेवाण आसमानी टेकली आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने होत असलेल्या या प्रक्रियेला काही अर्थ उरला नसल्याचे चित्र समाजात बोलल्याजात आहे. काही दिवसांनी तर घरी बसून मोठ्या प्रमाणात देवाण - घेवाण केल्यास प्रचार सुद्धा करायचं काम पडणार नाही. अशी शंका निर्माण झाली आहे. गरीब असो का श्रीमंत प्रत्येकाच्या मताचा प्रभाव समान आहे. मात्र असे चाललेतर गुलामी जवळ आली समजून घ्यावे का?*
*उच्च शिक्षित, युवा पिढीने राजकारणात यावे अशी वाक्य समाजात ऐकायला मिळते, परंतु घराणेशाहीने व अडाणी डेरिंगबाज माणसांनी राजकारणात धबधबा निर्माण केल्याने सरळ मार्गाने व मोठ्या विचाराने राजकारणात पाठबळ मिळणे शक्य नाही, त्यामध्ये आर्थिक पाठबळ ही नाही. त्यामुळेच म्हणतात की.. एकतर नंगाटाने राजकारण करावे अन्यथा उच्चभ्रू लोकांनी? यामुळेच सुशिक्षित,सरळ माणूस या प्रक्रियेत टिकू शकत नाही. ही दगडावरची रेष आहे. यासर्व गोष्टीत नागरिकांकडून पाहिजेत तेव्हाडी साथ मिळतांनी दिसत नाही. याला कारणीभूत वरच्या लेवलचे राजकारणच जबाबदार आहे, वरच्या स्तरावर निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावरील देवाण-घेवाण, आता सोशलमिडियाच्या काळात सर्वांना कळत आहे, त्यामुळे जनताही आता लाभ घेत असल्याचे चित्र आहे, निव्वळ देवाण-घेवाण, दारू, यामुळे धाब्यावर खराब होणाऱ्या हा युवापिढीला व खराब होत चाललेल्या लोकशाहीतील मूल्यांना घेणारे मतदार व देणारे उमेदवार यांच्यातील नैतिकता संपत चाललेली आहे. येणाऱ्या पिढीच स्वतंत्र टिकून ठेवाच असेल तर हे प्रकार बंद करण्याची प्रत्येकाची गरज आहे.*
*अन्यथाअश्या दूषित राजकारणाला प्रभावित होऊन राजकीय, आर्थिकभक्कम लोकशाहीत गुंडांची टोळी अधिक बनून याचा परिणाम येणाऱ्या आपल्याच भविष्याला बाधक ठरेल, ज्यांच्यासाठी आपण जीवाचरान करत आहोत त्यांना आर्थिक, राजकीय व मानसिक गुलामीत जीवन व्यतित करावे लागेल. व त्याला आपण सर्वच जबाबदार असू यात शंका नाही. मात्र तेव्हा वेळ निघुन गेलेली असेल. "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या एका प्रसिद्ध अभंगवाणीतून कोणत्याही कार्याचे फळ हे त्याच्या मुळावर अवलंबून असते. जर कामाची सुरुवात प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केली, तर त्याचे फळ नक्कीच गोड मिळते. अन्यथा परिमाण आपल्या सांगण्याची गरज वाटत नाही. लोकशाहीचे नीतिमूल्ये जपून पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पाडणे व उचशिक्षित युवा नेत्यांची फळी निर्माण करून देशाला जागतिक स्तरावर सामाजिक,राजकीय, आर्थिक स्तरावर भक्कम उभे करणे, आपले प्रत्येक नागरिकाचे सामाजिक दायित्व आहे, असे मला वाटते.*
*प्रल्हाद भिसे पाटील*
*पत्रकार, मेहकर*
*९५११३४५१११* #🙏भक्ती सुविचार📝 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😇भक्तांचा शनिदेव #😊Feeling happy #🙂Positive Thought
*मुलीनसाठी आधुनिक युगात सुवर्णयोग* ; एक वैचारिक मंथन
_________________________
*मुलगी म्हटलं की परिवाराचा आनंद, कौतुक, काळजी, सोनेरी पहाट, सुख समाधान, गोडवा, पिढ्यान पिढ्या चालत आलेला विश्वास, अनेक कुटुंबात मुली नसल्याने देवाधिकांना साकडे घालून, नवस बोलून मुलगी व्हावी म्हणून प्रयत्न करणारी मंडळी दिसते, तर संपूर्ण कुटुंबात एक जरी मुलगी असली तरी तिला संपूर्ण कुटुंब अतिशय मोठ्या प्रमाणावर जीव लावतो, काहींना बहिण तर काहींना भाऊ नसेल परंतु मुलींना सख्ख्या बहिणी प्रमाणे दर्जा देऊन तिची बोळवण करणारा भाऊ तिला समाजात मिळत असतो. पूर्व काळापासून मुलींना पुरुषप्रधान संस्कृतीत पारंपारिक दुय्यम दर्जा जरी असला तरी तिच्या बद्दलचे स्नेह प्रेम आपले जन्मदात्या आई-बाबाच्या नजरेत देवा घरचे गिफ्ट मानले जाते. लाडकी परी ती, एक वेळ मुलापेक्षाही तिला जास्त प्रेम मिळते, यात शंका नाही. आई वडिलांचा तिच्यावर जास्त विश्वास तर आई-वडील कितीही श्रीमंत व कितीही गरीब असले तरी लेकीला कधीही, काही कमी पडू नये म्हणून आयुष्यभर धडपड करणारे आई बाबा पोटाला खाणार नाही, मात्र काही कमी पडून देणार नाहीत.*
*जन्मल्यापासून लाडात वागवत या काळात मुलाप्रमाणे पालन पोषण, स्वतंत्र, शिक्षण तर लग्नसाठी तिला आयुष्याचा चांगल्या कुटुंबातील,सुंदर, जबाबदार, आर्थिक सक्षम, उच्च शिक्षित, नोकरी व आयुष्यात तिला मागे फिरून पाहण्याची गरज पडणार नाही. याची काळजी घेत चांगला वर शोधण्यासाठी खेटराचे तळ घासणारा संवेदनशील बाप आपल्या आयुष्याची कमाई लेकीच्या भल्यासाठी लावण्यात मागे पुढे पाहत नाही. तर आपण गेल्यावर सुद्धा तिची आयुष्यभराची बोळवण आपल्या घरून सुरू राहावी यासाठी चिंता करणारे आई-वडील सगळ्या जबाबदाऱ्यापार पाडून सुद्धा काही तुरळक सासरवाडीतील मंडळी सुनेला एटीएम प्रमाणे वापरणाऱ्यांची बराबरी करून देणारे मायबाप सुद्धा समाजात दिसतात. लेकीचा चेहरा पाहून ती सुखी आहे, किंवा दुःखी आहे. त्याचा अंदाज लावून चिंता व्यक्त करणारे तर हेच काय एखाद्या वेळेस मुलीच वाईट पाऊल पडलं तरी सुद्धा मोठ्या मनाने विष पिणारे मायबाप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.*
*चौदा-पंधरा वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मुला मुलीची सरासरी समानता असल्यामुळे सुशिक्षित, सुंदर, होतकरू मुली अतिशय सामान्य घरी पाडल्यात, काही व्यसनी नवऱ्यामुळे बेरोजगारी, आर्थिक कमजोरीचा सामना करत योग्य तो हुंडा देऊन सुद्धा गरीबीत जीवन जगाव लागले परंतु त्यांनीही निभवून नेले, आता या आधुनिक, नव्या डिजिटल युगात मुलीची संख्या कमी झाल्यामुळे गरिबातल्या गरीब मुलींचे सुद्धा लग्न आर्थिक सक्षम असलेल्या व सुशिक्षित सरकारी नोकरदार, व्यवसायिक, जमीनदारासोबत होत आहे. आई-वडिलांवरील आर्थिक भार सुद्धा कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे हुंडा पद्धतीला आळा बसून मुलीला जसा आयुष्यात पाहिजेत तसा सुंदर मुलगा, आर्थिक सक्षम, अपेक्षा पूर्ण करणारा मिळत आहेत. दहा-बारा एकरा वाले सुद्धा मुलाला बायको मिळवण्यासाठी स्वतःच्या पदरातून खर्च करायला तयार आहेत, करत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. आई वडिलांची चिंता ही दूर झाली आहे. त्या सामान्य घरातील आई-वडिलांना जसा स्वप्नातील राजकुमार आपल्या मुलीसाठी मिळण्याची अपेक्षा असायची ती आता पूर्ण होत असतांना. काही तुरळक मुली पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या संस्कृती, जबाबदारी, संयम, विश्वासाने, संस्काराने, स्वाभिमानी कुटुंबाच्या अस्मितेला धक्का पोहोचवण्याचे काम करत आहे.*
*आई-वडिलांनी दिलेलं प्रेम, स्नेह, स्वातंत्र्याचा पुरेपूर गैरफायदा घेऊन टीव्ही, मोबाईलवर चालू असलेल्या प्रेम रुपी तमाशाचे रूपांतर आपल्या आयुष्यात स्वीकारून आयुष्य उध्वस्त करायला निघाल्या आहेत. अनेक प्रकरण आपल्या कानावर पडत असतात, कोणी प्रियसी चे तुकडे करून फ्रीजमध्ये भरतो तर बायको आपल्या प्रेमासाठी नवऱ्याला ड्रम मधे भरते आता दोन-तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश देवास जिल्ह्यात एका प्रियकरांने आपल्या प्रियसीला हात पाय बांधून निळ्या ड्रामात टाकून मारल्याची बातमी कानावर आली खरंच पूर्वीच प्रेम आता राहिलं नाही, असंच म्हणावे लागेल. कवळ्या मनाला फूस लाऊन शारीरिक, आर्थिक स्वार्थ किंवा बायका मिळत नसेल म्हणून तर क्षणिक सुखाचा अर्थ आता प्रेमाचा झाला की काय असे झाले. परिस्थिती आता मुलींसाठी " सुवर्णयोग " घेऊन आली असताना सुद्धा असं वागणं कितपत फायद्याचं ठरत आहे. हे महत्त्वाचे. प्रेम विवाहातून बोटांवर मोजण्या इतक्या मुलींचे संसार सुखी असतील ही मात्र शेकडो मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. आपल्याला नेमकं काय पाहिजेत व आपण काय मिळवत आहोत. तसेच आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्वाभिमानी कुटुंबाच्या संस्काराचा व आई-वडिलांच्या स्नेह प्रेम स्वातंत्र्य,विश्वासाचा मोबदला काय द्यायचा ते प्रत्येकीने आपल ठरवायची वेळ आली आहे. शेवटी ज्याचे त्याचे नशीब कर्माने लिहिली जाते हे सत्य आहे.*
*प्रेम नक्कीच एक पवित्र बंधन आहे. मात्र ज्या मायमाऊलीने आपल्याला नऊ महिने पोटात ठेवले व त्या बापाने आपल्या ताटातील घास कमी करत आपल्याला घडवण्यासाठी त्याग केला. त्यापेक्षा मोठं कुठचं प्रेम असेल असं मला वाटत नाही. असेल तरीसुद्धा आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा ते कधीच मोठे होऊ शकत नाही. एका प्रेमासाठी जन्म दात्याच्या पाठीत खंजर घुसून प्रेमाचा स्वीकार होऊ शकत नाही. असे मला वाटते ते तुमचं कधीच वाईट चितनार नाहीत. चार महिन्यात झालेलं प्रेम तुमच्या आयुष्य खराब करू शकते मात्र आई-वडिलांनी दिलेल्या जोडीदार नक्कीच तुमचं प्रेम समाज, कुटुंब, आई-वडिलांप्रती हजारो पटीने वाढवू आपली शकते. आपली चालत आलेली संस्कृती जोपासू शकते. यात मात्र शंका नाही. काल रस्त्यावर जाता जाता गाण्याचा आवाज आला थोडं थांबून बघितलं तर एक छोटीशी चिमुकली एका दोरीवर हातात समतोलासाठी एक बांबूचा तुकडा तर त्या दोरीवर एक रिंग व त्या रिंगेत चिमुकलीचे पाय गरीब मायबापाचा संसाराचा गाडा ओढत होती. तिचे वय अवघे तीन ते चार वर्षाचे असेल तिच्या खांद्यावरची जबाबदारी व कार्य पाहून डोळे पाणावले, मनात विचार आला जर छोटीशी चिमुकली आपल्या गरीब माय बापाचा संसाराचा गाडा चालवण्यासाठी जीवाची पराकाष्टा करू शकते.*
*तर लाडात वाढवलेल्या आपल्या आई वडिलांची लाडकी परी जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलं ती आई वडिलांचे म्हणण्याप्रमाणे का वागू नये. तिच्या आयुष्याच सोनं होण्यासाठी आई-वडिलांनी कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक प्रयत्न आयुष्यभर चालूच ठेवत, नक्कीच आयुष्याच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. खरच या आधुनिक युगात मुलींसाठी " सुवर्णयोग " आला असं म्हणण्यात वावग ठरणार नाही. आज स्त्रीने माणसाच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्रपणे प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केले असले. तरी मात्र अतिशय बिकट अंधारमय काळात माँसाहेब जिजाऊ, महाराणी ताराबाई, सरदार उमाबाई दाभाडे, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू, आनंदीबाई जोशी, संत बहिणाबाई चौधरी, ताराबाई शिंदे यांच्यासहित अनेक महापुरुषांनी मानवी जीवनात प्रकाश ज्योत पेटवण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचाराची समाजाला आज प्रामुख्याने गरज आहे. खरच या,आधुनिक युगात मुलींसाठी ' सुवर्णयोग ' आला आहे.*
*प्रल्हाद भिसे पाटील*
*पत्रकार, मेहकर 9511345111*
#NewsUpdate #न्यूज24 #NewsToday #बातमी #StandWithJournalists #पत्रकार #💪बुद्धांची तत्वे📜 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏भक्ती सुविचार📝 #🌻आध्यात्म 🙏






