#🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ मंगेश साबळे यांच्या आक्रमक आंदोलनामुळे प्रलंबित ग्रामपंचायत बिलाचा चेक अवघ्या २४ तासांत मंजूर झाला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या ग्रामपंचायतीचे ₹१० लाख रुपयांचे बिल गेल्या ६ महिन्यांपासून जिल्हा परिषदेत प्रलंबित होते. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने त्यांनी जून २०२६ मध्ये थेट जिल्हा परिषद गाठून आक्रमक पाऊल उचलले.या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:सीईओंची गाडी अडवली: बिल मंजूर होत नसल्याने संतप्त झालेल्या मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पी. एम. मिन्नू यांची गाडी अडवली. "सीईओ भेटले नाहीत तर गाडी फोडेन," असा थेट इशारा त्यांनी दिला, ज्यामुळे जिल्हा परिषद परिसरात मोठी खळबळ उडाली.आमदारांची मध्यस्थी: हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू असताना आमदार प्रशांत बंब यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.एका दिवसात चेक हस्तगत: या आक्रमक आंदोलनाचा प्रशासनावर एवढा मोठा दबाव आला की, ६ महिन्यांपासून अडकलेले काम अवघ्या २४ तासांत पूर्ण झाले.चेक दाखवून प्रशासनाचा पर्दाफाश: आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीच्या बीडीओ (BDO) यांच्या नावाचा ₹१० लाखांचा चेक कॅमेऱ्यासमोर दाखवला. "आवाज उठवल्याशिवाय न्याय मिळत नाही," असे म्हणत त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासकीय दिरंगाईवर जोरदार टीका केली.
#राजकारण
मंत्री छगन भुजबळ नाराज #🏛️राजकारण #👉शरद पवार #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🙏 प्रेरणादायक बॅनर #🤣चला हवा येऊ द्या व्हिडीओ😍
आमदार विनय कोरे #🏛️राजकारण #✨गुरुवार स्पेशल✨ #🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
सरकारने कर्जमाफी दिलेली नाही तर अटी शर्ती टाकून छुप्या मार्गाने कर्जवसुली सुरू केली आहे. सरकारच्या या छुप्या सावकारकीमुळे बुलढाणा जिल्ह्यात किडनी घ्या पण कर्जमाफी द्या अस म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. सत्ताधाऱ्यांसाठी ही शरमेची बाब नाही का? सत्तेत येण्यासाठी 7/12 कोरा कोरा कोरा करण्याचे आश्वासन दिले आणि सत्ता मिळाल्यावर अटी-शर्तींसह फसव्या कर्जमाफीच्या नावाखाली कर्जवसुली करताना सरकारला जनाची नाहीतर मनाची तरी वाटायला हवी होती.
शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी हवीय सरकार अटी शर्ती टाकून करत असलेली वसूली नकोय. सरकारने विनाकारण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल, हे सरकारने विसरू नये.
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
#कर्जमाफी_हवी_कर्जवसुली_नको
#MaharashtraFarmers
#कर्जमाफी #शेतकरी
#✨गुरुवार स्पेशल✨
राज्यातील प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक मोहीम राबवत २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त केला असून १०२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई केली. तसेच ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत १३० आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक : १८००२२२३६५
ई-मेल : jc-foodhq@nic.in
तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि कोणत्या अन्नपदार्थात भेसळ होत असल्याची माहिती नमूद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.।
#✨गुरुवार स्पेशल✨
नाना फडणीस यांच्या, ऐतिहासिक तासगांव भेटीस २४० वर्षे पूर्ण -
सन - १७८५ मधील, टिपू सुलतान विरुद्धच्या पहिल्या स्वारीत, मराठे-निजाम यांच्या संयुक्त फौजा सहभागी झाल्या होत्या. यावेळी मराठा साम्राज्याचे धुरंधर कारभारी "बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस'' हे सुद्धा यात होते. सदर मोहिमेतून परत येतेवेळी नाना फडणीसांनी, मराठा साम्राज्याचे सेनापती "श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन" निर्मित तासगांव येथील श्रीगणपती पंचायतन देवस्थानाला ०२ जून १७८६ रोजी भेट दिली होती. यावर्षी या ऐतिहासिक भेटीस २४० वर्षे पूर्ण होत आहेत.
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻
आम्ही मराठा समाजाबरोबरच आहे व मराठा समाजाला न्याय देणारच मुख्यमंत्री #🙏 प्रेरणादायक बॅनर #🏛️राजकारण #💥राज ठाकरे
राज्य सरकारकडून प्रसारित #💥राज ठाकरे #🏛️राजकारण #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #✨सोमवार स्पेशल✨





