Dr Ramdas Athawale
ShareChat
click to see wallet page
@rathawale
rathawale
Dr Ramdas Athawale
@rathawale
MOS S&J GOI REPUBLICAN PARTY OF INDIA ATHAWALE
*काश्मीर मध्ये रिपब्लिकन पक्षाची नदीपात्रात सभा* केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी जम्मू काश्मीर दौऱ्यात काश्मीर मधील श्रीनगर; कुलगाम; अनंतनाग या जिल्ह्यांत तीन मोठ्या सभांना संबोधित केले.या भागात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे; रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय भीम चे निळे मफलर घालून काश्मीर मध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक वातावरण दिसत होते.कुलगाम मधील येशो नदीपात्रात रिपब्लिकन पक्षाच्या सभेला मोठी गर्दी जमली होती.नदीच्या दुतर्फा गाव असून रहदारी साठी नदीवर पूल नाही.नदीवर पूल बांधावा.जम्मू काश्मीर च्या राज्य सरकार पेक्षा आमचा केंद्र सरकार वर अधिक विश्वास असल्याचे सांगत येथील स्थानिकांनी नदीवर पूल बांधण्याचे निवेदन ना. रामदास आठवले यांना दिले.यावेळी रिपब्लिक पक्षाचे जम्मू काश्मीरचे प्रमुख नेते मन्सूर खान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow #Politics....
#Breakingnews - ؟ 1S75855 __9 | १ Dr Lam त {~ಘಲನಲು   Vommabto ( ؟ 1S75855 __9 | १ Dr Lam त {~ಘಲನಲು   Vommabto ( - ShareChat
#☸️जय भीम #RAMDASATHAWALE #follow
☸️जय भीम - ShareChat
01:00
#☸️जय भीम ##Breakingnews #RAMDASATHAWALE #follow
☸️जय भीम - ShareChat
00:09
#RAMDASATHAWALE ###Politics #follow ##Breakingnews #Politics....
RAMDASATHAWALE - ShareChat
##Breakingnews #follow ###Politics #RAMDASATHAWALE #Politics....
#Breakingnews - ShareChat
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *द्रमुक सरकार उलथवुन टाका - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* *तामिळनाडुत रिपब्लिकन पक्षाचे 18 उमेदवार निवडणुक रिंगणात* कोईमतुर/मुंबई दि. 09 - तामिळनाडु विधानसभेच्या एकुण 234 जागांपैकी 18 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले असून उर्वरित 216 जागांवर एनडीएला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाचा दृष्टीकोन दक्षिणेतील जनतेलाही पटलेला आहे. एनडीए सरकारने देशाचा वेगाने केलेला विकास पाहुन दक्षिणेतही एनडीएचा महाविजय होणार आहे. अभिनेते विजय यांनी तामिळनाडुत सर्व जागांवर उमेदवार उतरविल्याने मतविभागणीचा लाभ भाजप आणि एनडीएला मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तामिळनाडुतील स्टॅलिन यांचे द्रमुक सरकार उलथवुन टाका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. कोईमतुर जिल्हयातील त्रिपुर नॉर्थ विधानसभा मतदारसंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला उमेदवार के. कार्तिकादेवी यांच्या निवडणुक प्रचार रॅलीला संबोधीत करतांना ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर एन सुसाईआणि अनेक रिपब्लिक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दोन दिवसांच्या तामिळनाडु दौ-यांवर आले असून आज त्यांनी कोईमतुर आणि नामक्कल जिल्हयातील विविध मतदार संघात रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा तसेच भाजप प्रणित एनडीए उमेदवारांचा प्रचार केला. रिपब्लिकन पक्षाच्या तामिळनाडुमध्ये 18 उमेदवारांमध्ये 5 उमेदवार हे अनुसुचित जातीचे 11 उमेदवार हे इतर मागास वर्गातील असुन 2 उमेदवार हे मुस्लिम आहेत. तामिळनाडु हे दक्षिणेतील महत्वाचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए यंदा तामिळनाडु, पाँडेचेरी आणि केरळ या सर्व राज्यांवर विजय मिळवुन एनडीएचा दक्षिण विजय निश्चत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने 57 कोटी लोकांचे बँक खाते खोललेले आहे. 50 कोटी लोकांना मुद्रा योजनेचा लाभ दिला आहे. 6 कोटी लोकांना उज्वला योजनेद्वारे सिलेंडर गॅस दिलेला आहे. 4 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळालेला आहे. देशभरातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेली आहे. देशभरातील अनेक रस्ते चांगले करण्यात आलेले असून देशाची आर्थिक व्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आलेली आहे. देशात विकास झपाटयाने होत आहे. भारताचे उपराष्ट्रपती असणारे सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडुचे सुपुत्र आहेत. तामिळनाडुच्या जनतेला तामिळनाडुचे सुपुत्र उपराष्ट्रपती झाल्याचा अभिमान आहे. तामिळनाडुच्या यंदाच्या निवडणुकीत विजय या सुपरस्टार अभिनेत्याने आपल्या पक्षाचे उमेदवार सर्व जागांवर उभे केले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात मताची विभागणी होणार आहे. याचा लाभ एनडीए ला होणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. मोदींनी अनेक चांगल्या योजना राबविल्यामुळे देशाचा विकास होत आहे. देशाच्या विकासाचे राजकारण जनतेला आवडणारे असल्याने तामिळनाडुत जनता यंदा एनडीएला महाविजय मिळवुन देईल. असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. महिलांना संसदेत राजकीय आरक्षण देणारे महिला विधेयक संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंजुर करणार असून महिलांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे हे विधेयक आहे. त्यामुळे देशभरातील महिला या विधेयकावर खुष आहेत. तामिळनाडुतील महिला सुध्दा या विधेयकामुळे आपल्या मतांचे दान एनडीए उमेदवारांना देतील. त्यामुळे तामिळनाडुमध्ये एनडीएचा महाविजय होईल.यंदाच्या निवडणुकीत द्रमुक चा निश्चित पराभव होईल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow #RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #Politics....
follow - ~ Ganna | Ii ~ Ganna | Ii - ShareChat
#RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम #Politics.... #follow
RAMDASATHAWALE - ShareChat
00:49
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ* मुंबई दि. 05 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या तिस-या टर्मच्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातुन राज्यसभेवर 7 खासदार बिनविरोध निवडुन गेलेले आहेत. त्यात ना. रामदास आठवले यांचा समावेश आहे. राज्यसभेवर सलग तिस-यांदा बिनविरोध निवड होवून ना. रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार म्हणून हॅट्रीक केलेली आहे. आपल्या राज्यसभेच्या तिस-या टर्मची सुरुवात ना. रामदास आठवले उद्या दिनांक 6 एप्रिल2026 पासुन करणार आहे. ना. रामदास आठवले यांची एप्रिल 2014 ला सर्वप्रथम राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये दुस-यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत त्यांच्या दुस-या टर्मची मुदत होती. उद्या दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत ना. रामदास आठवले आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दिनांक 6 एप्रिल 2026 पासुन राज्यसभेच्या त्यांच्या तिस-या टर्मला सुरुवात होणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2026 ते एप्रिल 2032 पर्यत ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत तिसरी टर्म राहणार आहे. तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे देशभरातील दलित, बहुजनांनी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन केले आहे. देशभर ना. रामदास आठवले यांचे सत्कार आणि स्वागत होत आहे. नारामदास आठवले यांना तिस-यांदा राज्यसभेवर निवडुन दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यभरातील आंबेडकरी रिपब्लकन जनतेतर्फे हार्दिक आभार मानले जात आहे. आपल्या तिस-या राज्यसभा सदस्यत्वाची ना. रामदास आठवले उद्या सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी संसदेत शपथ घेणार आहेत. त्यांना देशभरातील आंबेडकरी जनतेने शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख ##Breakingnews #follow #Politics.... #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
#Breakingnews - ShareChat
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *मी कुठल्याही बाबाकडे जात नाही तरीही मला मंत्रीपद मिळते - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* पुणे / मुंबई दि. 04 - नाशिकचे खरात, त्याच्या चुकीमुळे गेले आहेत जेलच्या दारात, अशा ओळी सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले. माझा कुठल्याही बाबावर विश्वास नाही, कुठल्याही बाबाकडे मी जात नाही. तरीही मला माझे पद, मंत्रीपद मिळत आहे. कोणीही भोंदू बाबांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. खरातबरोबर अनेकांची नावे जोडली गेली असली, त्याच्याबरोबरचे फोटो असले, त्याच्या गैरप्रकाराशी त्यांचा संबंध असेल असे नाही. त्यामुळे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी भूमिकाही ना. रामदास आठवले यांनी मांडली. रिपब्लिकन पक्षाची कार्यकारणी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ना. रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सत्याग्रह केला होता. त्या घटनेचे शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार आहे. सामाजिक समता परिषद आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी नेते, विचारवंत यांना बोलवण्यात येणार आहे. जाती व्यवस्था बदलली पाहिजे. त्यासाठी अनेक शहरात परिषद होणार आहे. तसेच समता परिवर्तन यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरला सातारा येथून ही यात्रा सुरू करून त्याचा समारोप पुण्यात होईल. वेगवेगळे जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी यात्रा जाणार आहे, असे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. आमचे उपमहापौर यांच्यावर अन्याय होता कामा नये. महत्त्वाच्या बैठकीला आमच्या उपमहापौर यांना बोलावले पाहिजे. या बाबत केंद्रीय मंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्याशी या बाबत चर्चा केली जाईल. कोणताही वाद राहू नये. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विषय घातला जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ना. रामदास आठवले यांनी नमूद केले. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE #☸️जय भीम
follow - 187!!4 807 कीस राजाभारु उ्नोत्सुक  రగరగా महा 31.ೈ7ವ 60 45 ) 187!!4 807 कीस राजाभारु उ्नोत्सुक  రగరగా महा 31.ೈ7ವ 60 45 ) - ShareChat
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 02 - आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चार उमेद‌वार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित 122 जागांवर भाजप प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला असल्याचे अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली. गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील 7 राज्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टीकोन देशभरातील जनतेला आणि आसाममधील जनतेलाही पटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंता बिसवा यानी आसामचा सर्वांगीण विकास केला आहे. पायाभूत सुविधा उभारुन आसामचा वेगवान विकास होत आहे. त्यामुळे आसामची जनता भाजप प्रणित एनडीएला बहुमताने विजयी करेल. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनीही भाजप उमेद‌वाराना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. आसाममधील धींग या विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे हिरक ज्योती बोरा तसेच किंगसुकीया विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे इजराईल नंदा, मोरीगाव विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे चेनीराम कोनवार, आणि गौरीपुर विधानसभा मतदारसंघात सैदुर रहमान सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे चारही उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढत आहेत. या चार उमेद‌वारामधुन जे उमेदवार निवडून येतील ते रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपप्रणित एनडीएला देतील. रिपब्लिकन पक्षाचे जिंकून येणारे उमेदवार सरकार स्थापन करण्यास भाजपला समर्थन देतील अशी अधिकृत घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. ना. रामदास आठवले हे आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या रिपब्लिकन पक्षाच्या चारही उमेद‌वारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. तसेच भाजपच्याही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. आज त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य भारतातील पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, त्रिपरा, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपुर या सातही राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. | हेमत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #follow ##Breakingnews ###Politics #RAMDASATHAWALE
☸️जय भीम - _ Rrs _ Rrs - ShareChat