
Dr Ramdas Athawale
@rathawale
MOS S&J GOI
REPUBLICAN PARTY OF INDIA ATHAWALE
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*अंधेरीतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली सदिच्छा भेट*
मुंबई दि. 28 - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. विजय जाधव यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र ही संस्था स्थापन केली. ही संस्था त्यांनी मोठया कष्टाने मोठी केली. या संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी निमीत्त जन्मशताब्दी भवन म्हणून चांगली इमारत म्हणून अंधेरीत सातबंगला येथे उभारण्यात आलेली आहे. त्यात अनेक हॉल आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. आंबेडकरी चळवळीतील हे अग्रगण्य संस्था आहे. विजय जाधव यांनी ही संस्था वाढवली आहे. विजय जाधव यांची वयोमानाने प्रकृती अस्वस्थ असल्याचे कळल्यानंतर आज ना. रामदास आठवले यांनी विजय जाधव यांची सदिच्छा भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्र आणि विजय जाधव यांच्या पाठीशी आपण आणि आपला रिपब्लिकन पक्ष कायम राहील. असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी विजय जाधव यांना दिले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #Politics.... #follow ##Breakingnews
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई दि. 28 - येत्या एप्रिल मे महिन्यात आसाम, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडु, आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक यंदाच्या वर्षी होत आहेत.या आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणुक आयोगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाला गन्ना किसान ( ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष नोंदणीकृत असल्याने निवडणुका लढणे हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणुक चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपला रिपब्लिकन पक्षाचे समर्थन राहणार आहे. मात्र काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार गन्ना किसान या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढतील अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपालिका, सर्व स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 80 पेक्षा जास्त उमेदवार राज्यात निवडुन आलेले आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाचे कुठेही नाव या निकालांमध्ये दिसले नाही. त्याचे कारण असे आहे की, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढविल्याने, निवडणुक निकालामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नांव आढळुन आले नाही. महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मित्रपक्षाच्या निवडणूक चिन्हांवर निवडुन आलेले आहेत. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा मित्र पक्षाला पाठिंबा निश्चित देईल. मात्र मित्र पक्षाशी युती करुन निवडणुका लढतांना मित्रपक्षाचे निवडणुक चिन्ह रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वापरु नये, असा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय आहे.
मी स्वत लोकसभेच्या 3 निवडणुका लढलो. तीन्ही निवडणुका हया कॉग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करुन लढलो. मात्र त्या तीनही निवडणुकामध्ये मी कॉग्रेस किवा राष्ट्रवादी कॉग्रेस मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह कधीच वापरले नव्हते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्यांनी मित्र पक्षांशी युती करुन निवडणुका लढतांना मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह वापरु नये, रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वासाठी रिपब्लिकन पक्षाच्याच गन्ना किसान या चिन्हांवर निवडणुक लढली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुक चिन्हांवरच रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवडणुक लढावी हाच रिपब्लिकन पक्षाचा निर्णय असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूर्वी भारतीय दलित पँथरच्या काळात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडुन येत होते. नुकतीच पुर्णा शहराला भेट दिली. त्या शहरात भारतीय दलित पँथरचे 7 नगरसेवक निवडुन येत होते. नंतरच्या काळातही रिपब्लिकन पक्षाचेही नगरसेवक निवडुन येत होते. मात्र जेव्हापासुन राज्यात प्रभाग पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होवु लागल्या तेव्हापासुन रिपब्लिकन पक्षा सारख्या छोटया पक्षांचे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडुन येणे कठीण झालेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने येणारी निवडणुक ही छोटया पक्षांवर अन्याय करणारी पध्दत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने निवडणुक ही तात्काळ रद्द झाली पाहिजे. या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूढे प्रभाग पध्दतीने निवडणुक घेणे बंद केले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE #🙏महामानव डॉ. आंबेडकर #Politics.... #follow ##Breakingnews
#🙏महामानव डॉ. आंबेडकर ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #Politics....
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*भगवान बुध्दांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीचा उगम - केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले*
*छत्रपती संभाजी नगर येथील जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन*
छत्रपती संभाजी नगर/मुंबई दि.. 27 - महाकारुणीक भगवान बुध्दांनी भिख्खु संघाला दिलेला बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीचा उगम आहे. भिख्खु संघात जेव्हा जेव्हा एखाद्या विषयांवर वाद होत होता तेव्हा भिख्खु संघातील बहुमताचा निर्णय भिख्खु संघ मान्य करीत होता. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या संकल्पनेनुसारच भिख्खु संघ काम करीत होता आणि भगवान बुध्दांनी दिलेल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उपदेशातुनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही समृध्द केली आहे आणि जगाला अडीच वर्षापुर्वी बौध्द धम्मानेच लोकशाहीचा उपदेश दिलेला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथील भिमटेकडी येथे आयोजित केलेल्या जागतिक धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
छत्रपती संभाजी नगर येथे भारतीय विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केद्राच्या वतीने जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या आयोजन भिमटेकडी छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात आले होते. या धम्म परिषदेचे उद्घाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या धम्म परिषदेचे आयोजन पुज्य भिख्खुनी प्राध्यापिका धम्म दर्शना महाथेरी यांनी केले होते. या धम्म परिषदेत 30 देशातील व भारतातील प्रमुख भिख्खु आणि भिख्खुनी उपस्थित होते. कल्याण काळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी म्यानमारचे पुज्य भदंत डॉ. आशिन उत्तमतारा सयाडु उपस्थित होते. तसेच डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो हे जागतिक धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते. यावेळी पुज्य भदंत हर्षबोधी महाथेरो (बुध्दगया) भदंत सिमादा पुशी महाथेरो (जपान) भदंत अजान अमनाथ महाथेरो (बॅकॉक) धम्म परिषदेच्या संयोजन समितीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड, तसेच भदंत सुगद शांती (बुध्दगया) मास्तर झेन (व्हिएतनाम) धम्म परिषदेच्या कोअर कमिटीचे उपाध्यक्ष अनिलकुमार बस्ते, अनिकेत ओवा, जोगेंद्र तायडे, दत्ता बनसोडे, तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम,, मिलींद शेळके, विजय मगरे लक्षणभाऊ हिवराळे, दिलीप पाडमुख, बाळकृष्ण इंगळे, शरद शेगांवकर आदि मान्यंवर उपस्थित होते. या धम्म परिषदेस मराठवाडयातील आणि छत्रपती संभाजी नगरमधील मोठया प्रमाणात धम्म उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या.
भगवान बुध्दांनी दिलेला जगाला दिलेला बौध्द धम्म हा अखिल मानव जातीसाठी आदर्श जीवन मार्ग आहे. बौध्द धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी प्रज्ञा शिल करुणा, अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार देणारा धम्म आहे असे गौरद्गार ना. रामदास आठवले यांनी काढले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा देवुन भारतात पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तीत केले. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे भारताची लोकशाही मजबुत केली. बौध्द धम्मातल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय समता, बंधुता या तत्वावर आधारलेली आहे. जगाला सर्वप्रथम बौध्द धम्मानेच लोकशाहीचा विचार दिलेला आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले. भिमटेकडी येथील विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केंद्राला आपल्या खासदार निधीतुन 75 लाख रुपये टप्प्याटप्याने देणार असल्याची घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #follow #RAMDASATHAWALE #☸️जय भीम ##Breakingnews #🙏महामानव डॉ. आंबेडकर
छत्रपती संभाजी नगर विमानतळावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे आज सकाळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. ##Breakingnews #RAMDASATHAWALE #Politics.... #follow ###Politics
छत्रपती संभाजी नगर विमानतळावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे आज सकाळी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. ###Politics #RAMDASATHAWALE ##Breakingnews #☸️जय भीम










