
Dr Ramdas Athawale
@rathawale
MOS S&J GOI
REPUBLICAN PARTY OF INDIA ATHAWALE
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*एकेकाळी 12 नगरसेवक निवडुन आणणारा रिपब्लिकन पक्ष मुंबईत कुठे आहे ? - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनावले कार्यकर्त्यांना खडे बोल*
मुंबई दि. 30 - रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्ड सारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्र पक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवुन तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समजाला सोबत घेवुन मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबुत पुर्नबांधणी करा. असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.
चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हयाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्म गुरु डॉ. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडुन आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडुन आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागुन मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन , आदिवासी सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणुन मी दिल्लीचे तख्त गाठु शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकटयाला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे. तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार,
म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कार
माझ्या आयुष्यात मी कधी मानली नाही हार
कारण मी दुश्मनांवर करीत आलो वार
सर्वांसाठी माझे उघडे असते दार
कारण देशभरात जागी केली दलित नार
अशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली. यावेळी या सत्कार सोहळयाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग, फुलाबाई सोनवणे, अॅड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख, अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदि अनेक मान्यंवर यावेळी उपस्थित होते. यावेळी फाईन आर्ट सभागृह गर्दीने फुलुन गेले होते.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख ###Politics ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #follow
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन*
*पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश*
*राष्ट्रवादी चे नेते जीवन जाधव यांचा ही रिपब्लिकन पक्षात प्रवेश*
मुंबई दि.27- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या पक्षांनी ; विविध रिपब्लिकन गट, विविध संघटनांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे; त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
आंबेडकरी चळवळीतील विविध विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात सामील झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष अधिक बलशाली करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनीही रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा हाती घेतला पाहिजे. रिपब्लिकन पक्षात सामील होऊन रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट केला पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र चे अध्यक्ष मिलिंद सुर्वे;मुंबई अध्यक्ष मंगेश पगारे; राज्य महासचिव डॉ उमेश पवार; राज्य उपाध्यक्ष अशोक तांबे; शशिकांत शिंदे; मोहन बोदडे; नरसिम मुच्छा कट्टा; भीमसेन जाधव; रोहिदास वाघमारे; अनिल लागाडे ; गोविंद साळवी; विक्रम बमना; विजय पंडागळे; तुकाराम हेगडे; चंद्रकांत रुपेकर; कविताताई निकम; फिरोझ शेख; राजू पांचाळ; जोनभाई सांडेवाल; सारिकताई सकपाळ ; राजू कवंदर; लक्ष्मी अम्मा देवेंद्र; माधव कट्टार यांच्यासह शेकडो पीपल्स रिपब्लिकन महाराष्ट्र च्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडून मिलिंद सुर्वे यांनी आपल्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगळा गट स्थापन केला होता. त्यांच्या नेतृत्वात मुंबई आणि राज्यातील अनेक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कार्य करीत होते. पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे प्रमुख असणारे मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज रिपब्लिकन पक्षामध्ये ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशिर्वाद घेऊन रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाची घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी केली. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अनेक छोटे मोठे गट आहेत. अनेक संघटना आहेत, अनेक आंबेडकरी विचारवंत चळवळीत कार्य करीत आहेत. आपले स्वतंत्रपणे आणि वेगवेगळे कार्य करणाऱ्या या छोट्या मोठ्या संघटना, गटांनी आणि पक्षांनी रिपब्लिकन पक्षामध्ये सामील होऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष देशभर मजबूत होत आहे.
नागालँड आणि मणिपूर या दोन राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मान्यता आहे. आता आणखी दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळाल्यास एकुण 4 राज्यात रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळेल. 4 राज्यात मान्यता असणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. भाजप, काँग्रेस, बसपा, आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून लवकरच मान्यता मिळेल. त्या दृष्टीने आपले काम सुरू असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
सद्या देशात 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने गन्ना किसान हे निवडणूक चिन्ह दिलेले आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांत रिपब्लिकन पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. पाँडिचेरी आणि पश्चीम बंगाल या दोन राज्यात रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे भाजपला पाठिंबा आहे. आसाम, तामिळनाडू आणि केरळ मधील काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवणार असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील.असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला मान्यता दिल्याने विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुका लढणे हे रिपब्लिकन पक्षाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काहीं जागांवर रिपब्लिकन पक्षाने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहणार आहे. असे ना. रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पु कागदे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दी प्रमुख ##Breakingnews #follow #☸️जय भीम #RAMDASATHAWALE ###Politics
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा - केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*
मुंबई दि. 26 - व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात. व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे, असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सन 2020 ते 2025 या पाच वर्षातील राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.रामदास आठवले म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. देशाचे भविष्य तरुणाईच्या हातात आहे. ही तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडने ही गंभीर समस्या आहे. व्यसन ही सामाजिक आणि राष्ट्रीय समस्या आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी सरकार कडून कठोर पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन देखील ना.रामदास आठवले केले.
व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्वीकारून एकत्रित प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.
व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजातील अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखी भूमिका बजावली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र या क्षेत्रात कार्य करणारे लोक समाजासाठी आशेचा किरण आहेत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात काय करावे आणि काय टाळावे हे स्वतः ठरवायचे असते, पण व्यसनाच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींना योग्य दिशेला आणणे हे अत्यंत कठीण आणि महत्त्वाचे काम आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून कार्यकर्त्यांच्या कष्टांची दखल आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. एखादे कुटुंब वाचविणे हेच मोठे यश असून त्यातून मिळणारा आशीर्वाद हा खरा ठेवा आहे, असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
पुरस्कारांतर्गत व्यक्तीगत पुरस्कारासाठी 15 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, साडी, खण आणि श्रीफळ तसेच संस्था पुरस्कारासाठी 30 हजार रुपये सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले या 5 वर्षांच्या पुरस्कार निवडीमध्ये एकूण 100 व्यक्ती व 13 संस्थांचा समावेश आहे. या 100 व्यक्तींपैकी 88 पुरुष व 12 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणि संस्थांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाषणाच्या सुरुवातीला ना. रामदास आठवले यांनी व्यसनमुक्तीवर काही कविता सादर केल्या.....
जर केली तुम्ही रोज नशा;
तर समाजात होईल तुमचा हशा ;
तुम्ही आहात आमची फार मोठी आशा,
आणि मराठी आहे आमची भाषा !
मग का करता तुम्ही नशा?
मी करतो नशा...
पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा !!
म्हणुन आहे माझ्या जीवनात फार मोठी आशा !!!
होईल जर व्यसनमुक्ती;
तर वाढेल महाराष्ट्राची शक्ती !
भेंदुबाबाची करु नका भक्ती,
असं केल तर कधी होणार नाही तुमची मुक्ती !
ना.रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत या कविता सादर करताच सभागृहात प्रचंड टाळया आणि हशांनी प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #follow #☸️जय भीम #Politics.... #RAMDASATHAWALE ##Breakingnews
#follow #☸️जय भीम #RAMDASATHAWALE #Politics.... ##Breakingnews
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट*
नवि दिल्ली दि. 24 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सलग तिस-यांदा आपली राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक आभार मानले. यावेळी ना.रामदास आठवले यांनी निळी शाल आणि पुष्पगुच्छ देवुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला.
आपल्याला सलग तिस-यांदा राज्यसभेवर संधी देवुन केंद्रीयमंत्रिमंडळात सामाजिक न्यायराज्यमंत्री पदाची संधी कायम ठेवल्याबद्दल देशभरातील आंबेडकरी जनतेत, बहुजन समाजात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. राज्यसभेवर तिस-यांदा आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरी जनतेत आनंद साजरा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी यावेळी अनेक विषयांवर ना.रामदास आठवले चर्चा केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ना.रामदास आठवले यांना आता आपण राज्यसभेत 6 वर्ष रहा आपल्याला कोणतीही अडचण राहणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशात जणगणना सुरु आहे त्यात धर्मांतरीत बौध्दांच्या जनगणनेविषयी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दिवंगत प्रधानमंत्री व्हि पी सिंग यांच्या काळात महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांना सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. बौध्दांच्या धर्म या रकान्यात बौद्ध आणि जात या रकान्यामध्ये पुर्वाश्रमीच्या जातीच्या अनुक्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. पुर्वाश्रमीच्या महार जातीने महाराष्ट्रात बौध्द धम्मात धर्मांतर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मातरीत बौध्दांच्या जनगणनेचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ जातीचा उल्लेख न करता धर्माच्या रकान्यात बौध्द आणि जातीच्या रकान्यात पुर्वाश्रमीच्या अनुसूचित जातीचा अनुक्रमांक 59 हा क्रमांक लिहीण्यात आला पाहिजे. भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अनुसुचित जातीच्या यादीत महाराष्ट्रातील महार ही जात 59 क्रमांकावर आहे. जातीचे नाव न लिहीता जातीचा अनुक्रमांक जातीच्या रकान्यात लिहीला पाहिजे अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव आहे. पूर्वी या स्कॉलरशिपमध्ये केवळ भारत सरकारची 10 टक्के रक्कम आणि राज्य सरकारची 90 टक्के रक्कम दिली जात होती. 10 टक्के केंद्र सरकारचा निधी असताना या स्कॉलरशिपला गव्हरमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप हे नाव दिले होते. त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुधारणा करुन भारत सरकारच्या वतींने देण्यात येणारी स्कॉलरशिप मधील 10 टक्के रक्कम वाढवून 60 टक्के करण्यातआली . त्या स्कॉलरशिप मध्ये आता भारत सरकारचा वाटा 60 टक्के आणि राज्य सरकारचा वाटा 40 टक्के या अशा पध्दतीने भारत सरकार च्या स्कॉलरशिपची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मागील 15 वर्षापासुन या स्कॉलरशिपच्या रक्कम मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. तेव्हा अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या स्कॉलरशिपमध्ये महागाईच्या निर्देशाप्रमाणे वाढ झाली पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी सुचना आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयावर आपण विचार करु असे आश्वासन ना.रामदास आठवले यांना दिले.
प्रधानमंत्र्यांनी सदाबहार असा माझा संसदेत गौरवाने उल्लेख केला. तुम्ही मला म्हणत आहात सदाबहार, कारण मी करतो कॉग्रेसवर प्रहार अशी ना.रामदास आठवले यांनी प्रधानमंत्र्यांना आपली शिघ्र कविता यावेळी ऐकवली.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #RAMDASATHAWALE ##Breakingnews #Politics.... #☸️जय भीम #follow
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे समर्थन*
मुंबई दि. 23 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचे समर्थन केले असून, " रिपब्लिकन पक्ष" हा केवळ एका समाजाचा पक्ष राहू नये, अशी भूमिका मांडली आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी या उपवर्गीकरणाला समर्थन दिले आहे. रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वच घटकांचा समावेश पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही तशी अपेक्षा होती. विरोध केल्यास रिपब्लिकन पक्ष फक्त महार, बौद्धांचा पक्ष आहे, असा संदेश जाईल. पूर्वी रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते. ते सर्व बौद्ध समाजाचे आहे, असे म्हणत होते. इतरही समाजातील लोक रिपब्लिकन पक्षासोबत आले पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
सर्वच जातीच्या लोकांना न्याय मिळाला पाहिते. परंतु ते करताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली गेली पोहिजे. आरक्षणामुळे बौद्ध समाजाने शिक्षणाचा लाभ घेतला. ते शिकल्याने फायदा झाला. तसाच इतरांचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे उपवर्गीकरण योग्य आहे. बदर समितीचा अहवाल आला असून सरकार योग्य निर्णय घेईल, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. उपवर्गीकरणाचे त्यांनी समर्थन केले. तर व्हीजेएनटी समाजातील घटक मागास आहे. त्यांना वेगळे आरक्षण दिले गेले पाहिजे. त्यांना राजकीय आरक्षणही मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जात वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० च्या पुराव्याची अट जाचक समजल्या जाते. परंतु हा केंद्राने नियम केला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
दलितांवर आजही अत्याचाराच्या घटना होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा करण्यात आला. परंतु त्याचा गैरवापर होता कामा नये. ज्यांनी अत्याचार केला, त्याच्यावरच हा कायदा लावल्या गेला पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात चौकशी झाल्यावरच अटक करता येईल, असे सांगितले होते. त्यावर ना. रामदास आठवले म्हणाले की, अॅट्रॉसिटी हा केंद्राने केलेला कायदा आहे. त्यात राज्याला बदल करण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष- आठवले पक्षाला दोन राज्यात मान्यता आहे. त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पोर्टब्लेअरला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १७ मे महिन्यात होणार आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरीत निवडणुका लढविण्यात येतील. पश्चिम बंगालमध्ये भाजपला समर्थन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकरांनी याचे नेतृत्त्व करावे असेही ते म्हणाले.
अशोक खरातांवर कारवाई झाली पाहिजे, असे ना. रामदास आठवले म्हणाले. लोकांनी श्रद्धा ठेवावी, परंतु अंधश्रद्धा ठेवू नये. दिल्लीत मला अनेक बाबा भेटायला बोलावतात. परंतु, मी जात नाही. बाबाच माझ्याकडे येतात, असे ना. रामदास आठवले म्हणाले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #Politics.... ##Breakingnews #follow ###Politics #RAMDASATHAWALE
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताची उभारणी होत आहे - केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले
मुंबई / नवी दिल्ली दि. 23 - कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे, तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्याबद्दल रिपब्लिकन पक्ष दिल्ली राज्य युनिटतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
ना. रामदास आठवले म्हणाले की, मी यशस्वी पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी गृहमंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ]भाजप अध्यक्ष श्री. नितीन नवीन आणि भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि यापुढेही लोकसेवा, सामाजिक न्याय तसेच दिव्यांग आणि महिलांसह समाजातील दलित, वंचित आणि शोषित घटकांसाठी निष्ठेने काम करत राहीन.
ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्र सरकार, महामानव डॉ. भीमराव आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत असून, या दिशेने माननीय पंतप्रधानांची वचनबद्धता आणि समर्पण अत्यंत प्रशंसनीय आहे. या प्रसंगी ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एनडीए सरकार संविधान निर्माते बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. ना. रामदास आठवले म्हणाले की, ते समाजातील दलित, वंचित, शोषित, अल्पसंख्याक आणि महिलांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी निष्ठेने काम करत राहतील.
ना. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहतील. ना. रामदास आठवले म्हणाले की, तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड हा समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मी पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पात सक्रियपणे सहभागी होईन.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्याने पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #follow ##Breakingnews #RAMDASATHAWALE #☸️जय भीम #Politics....
#RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सव देशभर साजरा करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*
महाड/मुंबई दि. 21 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे केलेल्या पाण्याचा सत्याग्रह हा ऐतिहासीक आणि युगप्रवर्तक सत्याग्रह होता. सामाजिक विषमतेवर मात करुन समतेच्या युगाचा आरंभ करणारा चवदारतळे सत्याग्रह ठरला आहे. हा मानवमुक्तीचा संगर संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
महाड चवदार तळे क्रांतीभूमीतील क्रांतीस्तंभाजवळ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमीत्त आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी राज्यसभेत तीनवेळा बिनविरोध निवड झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, संपर्क प्रमुख राहुल सोनावले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापु गायकवाड, सुमित मोरे ; महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे; विवेक पवार आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आपण कुठेच नसतो . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आपण संसदेमध्ये आणि केंद्रात मंत्री म्हणून पोहचु शकलो. चवदार तळे सत्याग्रहामुळे अस्पृश्यता नष्ट होवून दलितांना मानवतेचे अधिकार मिळाले. त्यामुळे चवदार तळे सत्याग्रह हा जगभरातील मानवी हक्क लढ्यासाठी प्रेरणादायी आहे. समतेच्या हक्कासाठी प्रेरणादायी आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ना.रामदास आठवले यांनी पक्षबांधणी करण्याचे कडू डोस दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे मित्रपक्षाच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढु नये. रिपब्लिकन पक्षाने मोठया प्रयत्नाने रिपब्लिकन पक्षासाठी गन्ना किसान (ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह मिळवले आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह मिळालेले आहे. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर आपण राहु, मात्र मित्रपक्षाच्या भरवशावर निवडणुका जिंकणे हे योग्य नाही. कार्यकर्त्यांना आयते काही मिळणार नाही. त्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतील, कष्ट करुन मतदारसंघ बांधले पाहिजे. स्वबळावर निवडणुका जिंकण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. मित्रपक्षाच्या भरवशावर आणि मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुका लढणे आता कार्यकर्त्यांनी बंद केले पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद दाखवून दिली पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
आंबेडकरी जनतेची ताकद प्रचंड आहे. सत्ता कुणाची हे ठरवण्याची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन आंबेडकरी जनतेची एकजुट होणं महत्वाच आहे. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन सर्व दलित आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, बहुजन समाजासह सर्व आंबेडकरी जनतेची एकजुट होणं आवश्यक आहे. पुन्हा आपली रिपब्लिकन ऐक्याची ताकद आपण दाखवणं गरजेच आहे. रिपब्लिकन ऐक्यांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढ आले पाहिजे. मी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहायला तयार आहे. आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रतिसाद दिला पाहिजे. असे सांगत ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #☸️जय भीम #RAMDASATHAWALE ###Politics ##Breakingnews #follow
RAMDAS ATHAWALE#
कृपया प्रसिध्दीसाठी
*आंबेडकरी विचार समाज तोडण्याचा नाही तर जोडण्याचा विचार - केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले*
*ऐतिहासिक चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून रामदास आठवले यांचे पुन्हा ऐक्याचे आवाहन*
महाड दि. 20 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन या देशातील सर्व समाज घटकांना; सर्व समाजाला जोडले आहे. त्यामुळे आमचा विचार हा तोडण्याचा नाही तर समाज जोडण्याचा विचार आहे. चवदार तळे ही समतेची क्रांतीभूमी आहे. संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा चवदार तळे सत्याग्रह आहे. या ऐतिहासिक चवदार तळे आणि परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने चवदार तळे विकास प्राधिकरण स्थापन केले पाहिजे. महाड ही क्रांती भूमी आहे या क्रांती भूमीतील 30-40 एकर जागा संपादित करुन भव्य शिवसृष्टी आणि भिमसृष्टी निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 55 कोटी खर्चाच्या चवदार तळे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते.
चवदार तळे सत्याग्रहाचा 99 वा वर्धापन दिन असून चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी महोत्सवाला आजपासुन सुरुवात झाली. चवदारतळे जलशुद्धीकरण प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनिल तटकरे, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, माजी खासदार धैर्यशील पाटील , आमदार प्रविण दरेकर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर, भदंत राहुल बोधी महाथेरो, समाज कल्याण सचिव हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंढे, जिल्हाधिकारी किशन जावळे ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड; प्रकाश मोरे सिद्धार्थ कासारे गोपीनाथ सोनवणे; मोहन खांबे सुमित मोरे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
या सोहळ्यास माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते मात्र त्यांनी या सोहळ्यास पाठ दाखविली. प्रकाश आंबेडकर या सोहळ्यास गैरहजर राहिल्याचे पाहून ना .रामदास आठवले यांनी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचे आवाहन केले.प्रकाश आंबेडकर यांची ताकद आणि माझी ताकद एकत्र आली तर समाजाची राजकीय ताकद वाढेल.समाजाच्या हिता साठी समाजाचे रिपब्लिकन ऐक्य झाले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांच्या केले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख #Politics.... ##Breakingnews #RAMDASATHAWALE #follow #☸️जय भीम
Central Minister Hon.Ramdas Athawale saheb at Jammu Kashmir ###Politics ##Breakingnews #RAMDASATHAWALE #Politics.... #follow




![#Breakingnews - j ஈரணி ஈஸ் मंबई मगठा a ] मुंबई মুনভ मराठी मराठी पत्रकार पत्रकार 7 सघ டIப j ஈரணி ஈஸ் मंबई मगठा a ] मुंबई মুনভ मराठी मराठी पत्रकार पत्रकार 7 सघ டIப - ShareChat #Breakingnews - j ஈரணி ஈஸ் मंबई मगठा a ] मुंबई মুনভ मराठी मराठी पत्रकार पत्रकार 7 सघ டIப j ஈரணி ஈஸ் मंबई मगठा a ] मुंबई মুনভ मराठी मराठी पत्रकार पत्रकार 7 सघ டIப - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_876055_2862c6_1774617874747_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=747_sc.jpg)






