Dr Ramdas Athawale
ShareChat
click to see wallet page
@rathawale
rathawale
Dr Ramdas Athawale
@rathawale
MOS S&J GOI REPUBLICAN PARTY OF INDIA ATHAWALE
#RAMDAS ATHAWALE# कृपया प्रसिध्दीसाठी *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या राज्यसभेतील हॅट्रीकमुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह* *केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे देशभरात सत्काराचे सत्र सुरू* मुंबई दि. 04 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची राज्यसभेत सलग तिस-यांदा निवड झाल्यामुळे राज्यसभेत त्यांनी केलेल्या हॅट्रीकचा देशभरातील आंबेडकरी जनतेत प्रचंड आनंद आणि उत्साह आहे. महाराष्ट्रातील गावागावात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या राज्यमंत्री आणि राज्यसभेतील सदस्यत्वाच्या हॅट्रीकबद्दल प्रचंड आनंद साजरा होत आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सलग तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये रिपब्लिकन कार्यकर्त्यांसोबतच विविध दलित, बहुजन सामाजिक संघटनांच्या वतीनेही ना.रामदास आठवले यांचा अनेक ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. दिल्ली, कर्नाटक ; हरियाणा, गुजरात, उत्तरप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडु, मध्यप्रदेश आदि अनेक राज्यात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची तिस-यांदा राज्यसभेत निवड झाल्याबद्दल अनेक जिल्हा आणि तालुक्यामध्ये भव्य जाहीर सत्कार सोहळे आयोजित करण्यात आलेले आहेत.अनेक गावांत ना. रामदास आठवले यांचा वाजत गाजत मिरवणूक काढून भव्य सत्कार केला जात आहे. ना. रामदास आठवले यांनी लोकसभेत त्या पाठोपाठ राज्यसभेत तिस-यांदा निवड होण्याची हॅट्रीक केलेली आहे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर भारत सरकारमध्ये सलग तिस-यांदा केंद्रीय राज्यमंत्री होण्याचा बहुमान ना.रामदास आठवले यांना लाभलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री पदाची त्यांनी हॅट्रीक केलेली आहे. याबद्दल त्यांचा महाराष्ट्रात अनेक जिल्हयात भव्य सत्कार करण्यात आलेला आहे. नुकताच नागपुर येथे मित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारात ओबीसी नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी ना. रामदास आठवले यांचा गौरव करतांना म्हटले होते की, इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळवुन देण्यात आंबेडकरी चळवळीचा आणि विशेषतः रिपब्लिकन पक्षाचा केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात म्हणून रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेने प्रचंड आंदोलने करुन ओबीसींच्या झोळीत आरक्षण आणि सवलती मिळवुन दिल्या आहेत. यामध्ये ख-या अर्थाने आंबेडकरी जनतेचे, रिपब्लिकन चळवळीचे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचे ओबीसी नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी सांगितले. विदर्भातील नागपुर, यवतमाळ, उत्तर महाराष्ट्रातील शिर्डी, राहाता, अहिल्यानगर, नाशिक, चांदवड, मनमाड, धुळे, मालेगांव, नाशिकमधील सटाणा येथील नामपुर आदि ठिकाणी ना.रामदास आठवले यांचा भव्य सत्कार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापुर, सोलापुर, सांगली, सातारा आदि ठिकाणी ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. मराठवाडयात छत्रपती संभाजीनगर, लातुर, बीड, धाराशीव आदी ठिकाणी ना. रामदास आठवले यांचे भव्य सत्कार आयोजित करण्यात आले होते. गावागावात ना. रामदास आठवले यांचे भव्य स्वागत आणि सत्कार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात ना.रामदास आठवले यांनी दौरे केले. या दौ-यामध्ये आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि प्रचंड उत्साह दिसत आहे. गावागावात ना. रामदास आठवले यांचे प्रचंड स्वागत आणि सत्कार होत आहेत. आपल्या नेत्याला सलग तिस-यांदा राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली. संसदेतला हॅट्रीकवीर म्हणून ना. रामदास आठवले यांचा आंबेडकरी जनतेतुन आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांतुन प्रचंड अभिमान आनंद मानला जात आहे. देशभरात ना. रामदास आठवलेंचे स्वागत आणि सत्कार होत आहे. यामध्ये आंबेडकरी दलित आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते हे रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावुन ना. रामदास आठवले यांच्या सत्कार सोहळयात अग्रेसर राहत आहेत. विविध जाती धर्माचे लोक, विविध संघटना ना. रामदास आठवले यांच्या प्रती प्रेम आणि आपुलकी दाखवुन ना. रामदास आठवले यांच्या सत्कार सोहळयास गर्दी करीत आहेत. ना. रामदास आठवले यांचे स्वागत आणि सत्कार देशभरात गावागावात, सर्व जाती धर्मीयांची गर्दी वाढत आहे. एकंदर ना. रामदास आठवले यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात आणि राज्यसभेत तिस-यांदा संधी देवून आंबेडकरी जनतेमध्ये आणि बहुजन जनतेमध्ये चांगला संदेश दिलेला आहे. त्यामुळे ना. रामदास आठवले यांच्या संसदेतील हॅट्रीकमुळे देशभरात रिपब्लिकन पक्षामध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. हेमंत रणपिसे प्रसिध्दीप्रमुख #follow ##Breakingnews ###Politics #🏛️राजकारण #RAMDASATHAWALE
follow - 7 مام ممم FLTuauroane  सत्कार 7 مام ممم FLTuauroane  सत्कार - ShareChat
अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेबांचे भव्य स्वागत केले. ##Breakingnews ###Politics #🏛️राजकारण #RAMDASATHAWALE #follow
#Breakingnews - ShareChat
00:40
###Politics ##Breakingnews #follow
##Politics - ShareChat
00:30
##Breakingnews #RAMDASATHAWALE #🏛️राजकारण ###Politics #follow
#Breakingnews - ShareChat
01:14
###Politics #follow #🏛️राजकारण #RAMDASATHAWALE ##Breakingnews
##Politics - ShareChat
00:23
###Politics #follow #🏛️राजकारण #RAMDASATHAWALE ##Breakingnews
##Politics - ShareChat
01:28
#RAMDASATHAWALE #follow ###Politics ##Breakingnews
RAMDASATHAWALE - ShareChat
00:30
#RAMDASATHAWALE #follow ##Breakingnews
RAMDASATHAWALE - ShareChat
00:48
#RAMDAS ATHAWALE # कृपया प्रसिद्धीसाठी *भीषण अपघातात 13 वऱ्हाडींचा मृत्यू* *पालघरच्या बापूगावातील 13 मृतांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट* मुंबई दि.27 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.. रामदास आठवले यांनी आज पालघर जिल्ह्यातील बापूगाव (लाखनपाडा) येथे जाऊन धानिवरी येथील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बापूगावातील लाखनपाडावर काळाने भीषण घाला घातला असून या अपघाताने संपूर्ण पालघर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या टेम्पोला कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून बापूगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील १२ मृतांवर मंगळवारी अत्यंत दुःखद वातावरणात एकाच चितेवर आणि एकाच रांगेत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील वातावरण भावनिक झाले होते. आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी गावात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांना धीर दिला. “या दुःखद प्रसंगी आपण एकटे नाही, शासन आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच जखमींना योग्य उपचार आणि पीडित कुटुंबांना तातडीची मदत मिळावी, यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्याचं सोबत रिपब्लिकन पक्षाचे सचिव सुरेश दादा बारर्शीग, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; एम एस नंदा,, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, देवेंद्र राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख ##Breakingnews ###Politics #follow #RAMDASATHAWALE #🏛️राजकारण
#Breakingnews - ShareChat