#आईची माया #आईची आठवण #🙏आई👪बाबांची🌍माया🤚 #आई #😎आपला स्टेट्स
कधी कधी एखादा चिमुकला जीव संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतो, कोट्यवधी लोकांची मने जिंकतो! मात्र त्या घटनेमागे एक दास्तान असते; ती कधी सुखाची असते तर कधी दुःखाची! तर कधी असते विलक्षण करुण आर्त कथा!
जपानच्या इचिकावा सिटी झू मधील पंच नावाच्या या आठ महिन्यांच्या मकॉक प्रजातीच्या जपानी माकडाच्या पिलाची कहाणी अशीच आहे – आईच्या नकाराची, एकटेपणाची आणि संघर्षाची.
26 जुलै 2025 रोजी जन्मलेल्या पंचला त्याच्या आईने जन्मताच नाकारले, कारण त्या काळात भयंकर उष्णतेची लाट सक्रिय होती आणि कठीण प्रसूतीमुळे त्याची आई त्याला स्वीकारू शकली नाही.
त्याला आईने झिडकारलेलं प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्याची आबाळ होऊ लागलीय हेही त्यांना कळून चुकले. लवकर उपाय केला नाही तर पिलाच्या जिवावर बेतू शकते हे एव्हाना क्लिअर झालं.
झूच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे एकटेपण संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकली. त्यांनी त्याला हाताने भरवायला सुरुवात केली. त्याला आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. मात्र हे खूप काळ करून चालणार नव्हते.
त्या पिलाला कधी ना कधी समूहात परत नेणे क्रमप्राप्त होते. त्याला त्याच्या समूहात परत करण्याचा प्रयत्न करताच त्याच्या एकटेपणाची नव्याने सुरुवात झाली. झू मधील अन्य माकडांनी त्याला जवळ येऊ देण्यापासून रोखलं. ते त्याला दूर लोटू लागले!
पंच एकटा पडला! त्याचं एकाकी असणं पाहवत नव्हतं कारण, त्याच्या डोळ्यातले आर्त भाव! आईशिवाय वाढणारा तो एकटा जीव कासावीस झाला होता.
त्याच झू मध्ये इतर काही पिले आणि त्यांना अंगाखांद्यावर खेळवणारी त्यांची आई हे दृश्य तो विलक्षण तगमगीने पाहत असे. झू'च्या कर्मचाऱ्यांना याचे दुःख झाले. यावर काही मार्ग काढला नाही तर 'पंच'ची मानसिक स्थिती बिघडू शकते हे त्यांना ठाऊक होते.
खूप विचार करून त्यांनी एक उपाय शोधला. 'पंच'च्या आयुष्यात एक छोटासा साथीदार आला – एक नारंगी रंगाचा स्टफ्ड ऑरंगुटान माकडाचे सॉफ्ट टॉय. हा मखमली बाहुला त्याला आईसारखा वाटला; तो त्याला घेऊन फिरू लागला!
आता तर तो त्याला बिलगून झोपतो आणि त्याच्याशी खेळतो.
इंटरनेटने व्यापलेल्या जगात अशा हृदयद्रावक घटना लवकर व्हायरल होतात! पंच'चे व्हिडिओ आधी जपानमध्ये व्हायरल झाले आणि मागील काही दिवसांत तो जगभरातील सोशल मीडियाच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
त्याच्या एकटेपणाची आणि एकाकी असण्याची क्लिप लोकांना रडवतेय. त्या बाहुल्याला घट्ट धरून झोपलेला पंच जणू आईच्या मिठीत विसावला आहे असे वाटते.
झू मधल्या माकडांच्या समूहातील इतर माकडांनी त्याला अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. ते कधी कधी त्याच्यावर ओरडतात, तर कधी त्याला दूर ढकलतात.
नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मोठे माकड त्याला ओढत नेत असते, आणि पंच घाबरून धावत खेळणाकडे जातो.
हे दृश्य पाहून लाखो नेटिझन्सच्या डोळ्यात पाणी आले – "पंचला काही तरी मदत करा" असा संदेश जगभरातून व्हायरल झाला.
आपल्या झू मधला हा छोटा जीव जगाच्या केंद्रस्थानी आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की, पंचला गंभीर इजा झाली नसून हे फक्त स्कोल्डिंग आहे आणि तो हळूहळू समूहात मिसळतोय.
कोणत्याही सहृदयी व्यक्तीने 'पंच'चे फोटो अथवा व्हीडिओ पाहिले तर त्याच्या काळजाला ते नक्की भिडेल! आईविना वाढलेल्या या लहान जिवाचा हा संघर्ष करुण आणि आर्त आहे!
नुकतेच त्याला एका माकडीणीने स्वीकारले असल्याचा व्हीडिओ समोर आलाय. त्यांचे नाते दृढ व्हायला पाहिजे!
'पंच'ची कहाणी लाखो लोकांना भावली, कारण ती एकाकीपणाची, प्रेमाच्या शोधाची आणि आशेची आहे. त्याच्या छोट्या डोळ्यात अजूनही एक हुरहूर जाणवते.
'पंच'ची माहिती व्हायरल होताच या झू'ला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय. लोक त्याच्याविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटतेय.
मात्र हेच जग अन्यत्र लाखो बालके अनाथ होत असताना मुक असते!
वेगवेगळ्या युद्धात लाखो बालकांचे आईवडील मारले जातात तेव्हा हेच जग मौन असते!
अन्य प्रसंगी इथे हिंसेचे समर्थन करणारे आणि अमुक एकांना मारले पाहिजे असं म्हणणारी माणसं आता यावर अश्रू ढाळतील.
मात्र वास्तव जगात आजूबाजूला अशी किती तरी अनाथ बालकं खस्ताहाल जिंदगी जगत असताना त्यांच्या काळजाला कधीच पाझर फुटत नाही!
माणूस आणि त्याच्या संवेदना, भावनासापेक्ष राहिल्या नाहीत! माणसाच्या भावना आता यंत्रवत झाल्या आहेत आणि त्याच्या जडणघडणीतील बारकाव्यावर अवलंबून राहताहेत!
कदाचित या जाणिवांना नवा पाझर फुटण्याचे काम 'पंच'च्या घटनेने केले आणि आपल्या अंतःकरणातली ही जिव्हाळ माया नित्य एकसारखी जपता आली तर पंच'च्या संघर्षाचे फळ खूप मधाळ असेल असे म्हणता येईल!
'पंच'ला त्याच्या जीवनात माया ममता आणि प्रेम लाभो! माणसांची सहृदयता तात्कालिक न राहता नित्य राहो..!
लेखक-समीर गायकवाड
#💥😔गड आला पण सिंह गेला 💥 #तानाजी मालुसरे #तानाजी मालुसरे पुण्यतिथी #😎आपला स्टेट्स #🙏शिवदिनविशेष📜
४ फेब्रुवारी १६७० रोजी मराठा इतिहासातील एक अत्यंत रोमांचक आणि शौर्याची गाथा घडली, ती म्हणजे कोंढाणा किल्ल्यावरील (सिंहगड) लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि निष्ठावान सरदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाच्या (रायबाच्या) लग्नापेक्षा स्वराज्याच्या मोहिमेला महत्त्व दिले. "आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे" हा त्यांचा निश्चय अजरामर ठरला.
तानाजींनी अवघ्या ५०० मावळ्यांसह रात्रीच्या वेळी कडा चढून किल्ल्यावर हल्ला केला. घोरपडीच्या (यशवंती) साहाय्याने त्यांनी हा कठीण कडा पार केला असे म्हटले जाते. किल्ल्यावर तानाजी मालुसरे आणि मुघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या लढाईत तानाजींनी असीम शौर्य गाजवले, परंतु अखेर त्यांना वीरमरण आले. तानाजींच्या मृत्यूनंतर खचलेल्या मावळ्यांना त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी धीर दिला आणि मराठ्यांनी कोंढाणा जिंकला. जेव्हा शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली, तेव्हा त्यांच्या मुखातून दुःखद शब्द बाहेर पडले: "गड आला, पण सिंह गेला. तानाजींच्या या अतुलनीय बलिदानाची आठवण म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' असे ठेवले.🙏🚩🚩
#अजितदादा यांस भावपूर्ण श्रध्दांजली🙏💐 #भावपूर्ण श्रद्धांजली 😭 #बारामती #अजित पवार #😎आपला स्टेट्स
सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला आणि विकासकामांना गती देणारा एक उत्तम प्रशासक आज आपल्यातून निघून गेला. राजकारणातील अजितदादांच्या या पर्वाचा असा अंत मनाला सुन्न करणारा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. ॐ शांती! 🙏
#🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷 #🇮🇳तिरंगा स्टेट्स🫡 #🇮🇳तिरंगा स्पेशल🎨 #🇮🇳तिरंगा स्पेशल🎨 #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷
#😎आपला स्टेट्स
माझा देश, माझी ओळख 🇮🇳✨ | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य, संविधान आणि एकात्मतेला सलाम करतो. प्रत्येक रंग, प्रत्येक धडधड आणि प्रत्येक स्वप्न — हे सर्व मिळून बनतो माझा भारत ❤️
चला, आपण आपल्या मूल्यांचे रक्षण करण्याची, विविधतेचा आदर करण्याची आणि आपल्या राष्ट्राची मान सदैव उंचावत ठेवण्याची प्रतिज्ञा करूया 🇮🇳✨
जय हिंद! वंदे मातरम! 🇮🇳
#बचपन कि यादे 🤗☺️ #हरवलेले लहानपन #लहानपण देगादेवा #लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा🙂 #😎आपला स्टेट्स
९० च्या दशकातील मुलांचे बालपण हे खऱ्या अर्थाने मैदानी खेळ आणि निखळ आनंदाने समृद्ध होते. आजच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात हरवलेला तो काळ खरोखरच सुवर्णकाळ होता. त्याकाळी शाळा सुटली की दप्तर फेकून मुले गल्लीत किंवा मैदानात धाव घेत असत. 'लगोरी' हा त्या काळातील सर्वात लोकप्रिय खेळ होता, जिथे सात दगड रचून ते बॉलने पाडणे आणि प्रतिस्पर्धी संघाने चेंडू मारण्यापूर्वी ते पुन्हा रचणे यात एक वेगळाच थरार असायचा. 'विट्टी-दांडू' आणि 'गोट्या' या खेळांनी मुलांमध्ये एकाग्रता आणि अचूक नेमबाजीचे कौशल्य विकसित केले होते. दुपारच्या वेळी 'लपंडाव' किंवा 'शिवणापाणी' खेळताना लपण्यासाठी शोधलेल्या जागा आणि 'राज्य' आल्यावर मित्रांना शोधण्याची धडपड आजही आठवली की चेहऱ्यावर हसू येते. मुलींमध्ये 'सागरगोटे', 'काचपाणी' आणि 'लंगडी' हे खेळ अत्यंत प्रिय होते. पावसाळ्यात कागदी होड्या सोडणे असो किंवा उन्हाळ्यात 'भोवरा' फिरवण्याची स्पर्धा, प्रत्येक ऋतूचा एक वेगळा खेळ असायचा. या खेळांमुळे केवळ शारीरिक व्यायामच होत नव्हता, तर मुलांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण आणि संकटावर मात करण्याची वृत्ती निर्माण होत असे. ९० च्या दशकातील हे खेळ म्हणजे केवळ मनोरंजन नसून, निस्वार्थ मैत्री आणि मातीशी जोडले गेलेले एक घट्ट नाते होते, ज्याची जागा आजचा कोणताही व्हिडिओ गेम घेऊ शकत नाही.
#श्री.शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #शिव शंभू #😎आपला स्टेट्स
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१ (माघ शुध्द सप्तमी १६०२)रोजी झाला.
#🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #😎आपला स्टेट्स
१३ जानेवारी १६८० हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दिवस मानला जातो. या दिवशी युवराज संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्हाळगडावर ऐतिहासिक भेट झाली होती.
काही काळ राजकीय आणि वैयक्तिक कारणांमुळे शंभुराजे स्वराज्यापासून दूर गेले होते. मात्र या दिवशी ते पुन्हा शिवछत्रपतींना येऊन मिळाले.
वडील आणि मुलामधील सर्व मतभेद मिटून स्वराज्याच्या दोन सिंहांची ही शेवटची मोठी भेट ठरली.
राजकीय वारसा या भेटीमुळे स्वराज्यापुढील उत्तराधिकाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आणि शिवरायांनी संभाजी महाराजांना पुन्हा विश्वासात घेतले. ही ऐतिहासिक भेट कोल्हापूरजवळील पन्हाळगडावर पार पडली होती...🙏🚩
#भोगी व मकारसंक्रात #भोगी #हॅप्पी मकरसंक्रात #शुभ मकरसंक्रात 👍 #😎आपला स्टेट्स
तिळात मिसळला गूळ जसा तसे प्रेम असावे,
शब्दांतल्या कडवटपणाला हळूच आपण पुसावे,
तिळगुळ घ्या गोड बोला ही तर केवळ एक रीत,
खरे सांगू का? माणसात माणसाने शोधून काढावे प्रीत.
भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या सर्वांना प्रेमळ शुभेच्छा..
#दुरदर्शन की यादे🫠😍 #बचपन कि यादे 🤗☺️
#लहानपणीच्या आठवणी 🤗🤗 #आठवणी लहानपणीच्या😍💕 #😎आपला स्टेट्स
#राजमाता जिजाऊ जन्मोत्सव #राजमाता जिजाऊ #जय जिजाऊ #जय जिजाऊ
जय शिवराय 🚩🚩🚩 #🙏 शिवराय स्टेटस
राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पना आणि मूल्यांच्या शिल्पकार होत्या, ज्यांनी महाराजांच्या मनात न्याय, धर्म आणि लोककल्याण यावर आधारित स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटवली; त्यांचे धैर्य, दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठा यामुळेच एक आदर्श राजा घडला, ज्यांनी मावळे आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामुळे त्या स्वराज्यमाता म्हणून ओळखल्या जातात..



