*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२० फेब्रुवारी इ.स.१६६०*
छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*१९ फेब्रुवारी..🚩🚩*
*#रयतोत्सव..✨*
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दख्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला
*तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती रायगडी सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती युगनिर्माता छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा शतकांच्या छाताडावर खडा शिवाजी राजा..*
शतकानु शतके हिंदुस्थानावर अमानुष अत्याचार गाजवून सत्ता प्रस्थापित करणाऱ्या परकीय सत्ता केंद्रांच्या सत्ताकेंद्रांना उद्धवस्त हिंदुस्थानची सर्व सत्ता केंद्रे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर एकवटवणाऱ्या हिंदुभुपती अखंडी हिंदुस्थानधिपती महाराज यांची आज जयंती..
त्यानिमित्त आमच्या परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा..
*#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात..🚩🚩*
*टीम :#शिवविचार_प्रतिष्ठान* #🙏छ.शिवाजी महाराज जयंती 2026😇 #🚩जगात भारी 19 फेब्रुवारी😍 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१८ फेब्रुवारी इ.स.१६५३*
छत्रपती शिवरायांनी गोपाळ भटास वर्षासन चालू केले.
*१८ फेब्रुवारी इ.स.१६६६*
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६७९*
शके १६००, कालयुक्त संवछरे पौष शुद्ध १०, दशमी
युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत! सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गोटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला. (जेधे शकावली कारण देत नाही.)
*१७ फेब्रुवारी १६८९*
छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१७ फेब्रुवारी इ.स.१६६३*
*छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८९*
*छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुरुवात. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१६ फेब्रुवारी इ.स.१६३५*
*मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवरायांनी कोकणातील "चाफळ" जिंकले.
*१६ फेब्रुवारी इ.स.१६८१*
*१६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. राजे सिंहासनाधीश्वर झाले. छत्रपती संभाजी महाराज रणांगनात जितके कठोर होते तितकेच ते स्वराज्यात होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधातही कठोर होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात राजधानी रायगडवरुन त्यांनी कवी कलशाकरवि काही महत्वाचे न्यायनिवाड़े केले. त्यातून त्यांच्यातील न्यायप्रिय राजगुण उठून दिसतो. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
#🔱महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🕉️ *#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#महाशिवरात्री🙇🏻♂️🚩*
शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.
*ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥*
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६५*
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून शिवछत्रपती यांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत
१३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान मराठे बसरुरला पोहोचले.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६६६*
औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या म्रृत्यू मुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.
*१४ फेब्रुवारी इ.स.१६७१*
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतली!
होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवून साजरा करीत असत. या वेळची शिकार होती मेहेरुफ-ए-जंजीरा याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज किल्ले रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते. मात्र मन जंजिरा किल्ल्यातच गुंतले होते. जंजिरा किल्ल्याच्या आजुबाजूचा दंडाराजपुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम सिद्धी याकुत व सिद्धी खैरियत यांनी सुद्धा दंडाराजपुरी मराठ्यांच्या कडून घेण्यासाठी, होळीच्या मध्यरात्री समुद्र मार्गे व जमिनीमार्गे राजापुरीवर हल्ला चढवला. कडोविकडीची लढाई झाली
दंडाराजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला.
*१४ फेब्रुवारी सन १६७९-८०*
चोपड्याहून सुरतेस लिहिलेल्या पत्रातील माहिती अशी " शिवाजीच्या सैन्याने हा प्रदेश लुटून व जाळून फस्त केला आहे ज्या शहराचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात त्या लोकास शिवाजी कोणत्याही प्रकारचा उपसर्ग देत नाही. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
राजापूर वखारीचा प्रमुख इंग्रज अधिकारी
"हेन्री रेव्हिंगटन" याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे..
त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो.....
"शिवाजी हिंदुसेनाधीपती"
म्हणजेच त्याकाळी इंग्रजांची हीच धारणा होती की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत.
*१३ फेब्रुवारी इ.स.१६६०*
छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला
*१३ फेब्रुवारी इ.स.१६७२*
छत्रपती शिवराय विश्रांतीसाठी रायगड ला मुक्कामी आले #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१२ फेब्रुवारी इ.स.१६८९*
छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे 7 वर्षाचे होते व राजाराम महाराज हे 18-19 वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !
अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय
*१२ फेब्रुवारी इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला. #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज













