शिवभक्त सुरेश भोसले
ShareChat
click to see wallet page
@sureshbhosale
sureshbhosale
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
🚩रोजचे ऐतिहासिक शिवदिनवीशेष🚩📱📲8975379375
#🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜
🚩जय जिजाऊ - ShareChat
00:30
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ८ डिसेंबर इ.स.१६७७ (मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १५९९ संवत्सर पिंगळ, वार शनिवार) स्वराज्यासाठी हुबळीची लूट! छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ४,००० स्वार घेऊन हुबळी पुर्णपणे लुटली. छत्रपती शिवराय सुरतेवर परत एकदा स्वारी सुरतेवर केंद्रीत करणार आहेत अशी हूल उठवून महाराजांनी सर्वांनाच गाफील ठेवले. आणि शत्रूसैन्याचे लक्ष करावयास भाग पाडून मस्तपैकी हुबळी लुटून आपला कार्यभाग साधला व हे धन स्वराज्यासाठी जोडले! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ डिसेंबर इ.स.१६८० मुंबईकर इंग्रजांनी सुरतकरांना लिहीलेल्या पत्राची नोंद! "राजाच्या हितसंबंधांना विरोध येईल अशा तऱ्हेने सिद्दीला आमच्या कडून मिळणारा आश्रय व मदत ही राष्ट्राच्या कायद्याप्रमाणे समर्थनीय ठरणार नाहीत हे उघड आहे. परंतु हल्लीच्या परिस्थितीत तो नियम आम्हास मोडावा लागणार हे स्पष्ट आहे. दोघांपैकी कोणाचा तरी रोष पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. हे अवघड असल्याचे लिहून लंडनला आपल्या गलबतास सुरक्षितता असणे गरजेचे आहे". छत्रपती संभाजीराजेंना समाधान वाटेल अशा काही अटी सिद्दीकडून लेखी मिळतील. तर मिळवाव्या. तरीसुद्धा सिद्दीला फार दुखवू नये. यावरून इंग्रजांचे दुटप्पीपणाचे धोरण किती स्पष्ट होते हे कळून येते. पण ते कात्रीत सापडले होते, हे निश्चित. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ डिसेंबर इ.स.१६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला तेव्हा अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू.गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झालेगडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले. मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल असे वाटत होते पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात. एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढावा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ डिसेंबर इ.स.१७४० रेवदंडयाचा किल्ला मराठ्यान्नी अखेर दिडवर्षाच्या लढाईनंतर पोर्तुगिझांकडून जिंकला. 'मानाजी आंग्रे' आणि 'खंडोजी मानकर' यांच्या नेतृत्वाखाली लढाई देत मराठी फौजांनी आणि आरमाराने विजय प्रस्थापित केला... 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
🙏शिवदिनविशेष📜 - शिवशंभू प्रतिष्ठान eit| श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नंदणी क ०शिवदिनविशेष० కతింెన్లా REI L छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हुबळीची पुर्णपणे लूट ४,००० स्वार घेऊन केली ००! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! शिवशंभू प्रतिष्ठान eit| श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नंदणी क ०शिवदिनविशेष० కతింెన్లా REI L छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हुबळीची पुर्णपणे लूट ४,००० स्वार घेऊन केली ००! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! - ShareChat
#🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🚩छत्रपति शिवाजी महाराज - ShareChat
00:30
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ७ डिसेंबर इ.स.१६७२ बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र - प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ. ७ डिसेंबर १६७२ साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ डिसेंबर इ.स.१७१५ मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ डिसेंबर इ.स.१७६० बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युध्दात वीरमरण पत्करलेले एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये ओंकारेश्वराचे मंदिर बांधले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ७ डिसेंबर इ.स.१८०३ गव्हर्नर वेलेस्ली स्वत: अचलापुरात तळ ठोकून बसला १३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले.त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
🙏शिवदिनविशेष📜 - शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES ওখণনা ৭২ ভন২ ২০২৭ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क ०शिवदिनविशेष - ம fsaஙEsa.?EIR 6 बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी Ccoo छत्रपती शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले.. ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES ওখণনা ৭২ ভন২ ২০২৭ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क ०शिवदिनविशेष - ம fsaஙEsa.?EIR 6 बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी Ccoo छत्रपती शिवाजी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना पत्र लिहिले.. ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! - ShareChat
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:30
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ६ डिसेंबर इ.स.१६६३ छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारीसाठी राजगडावरून प्रस्थान...! मुघल साम्राज्याला हादरा देणारे शिवशाहीतील एक महत्त्वाचे प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची पहिली लूट. शाईस्तेखानाने स्वराज्यात राहून केलेली स्वराज्याची नासधूस, या सर्व काळामध्ये महाराजांचे पन्हाळगडावरून पलायन, चाकणचा वेढा, उंबरखिंडीचे युद्ध, या सर्व घटनांवर मात करीत महाराजांनी रामनवमीच्या दिवशी केलेला शाईस्तेखानाचा पराभव, या सर्व घटनांमुळे स्वराज्याचा खजिना रिकामा होत होता. याची भरपाई म्हणून महाराजांनी एक धाडसी मोहीम आखली. ही मोहीम स्वराज्यात राहून नव्ह, तर स्वराज्याचा बाहेर जाऊन राबवायची होती, मुघली गोटात शिरून, चोख तयारीनिशी महाराजांनी मनसुबा आखला. या नव्या शिलांगणाची मोहीम महाराजांनी आपल्या सगळ्यात विश्वासू हेरावर सोपवली आणि ते म्हणजे हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. (स.ब) गुजरात प्रांतातील सुरत शहर म्हणजे अतिशय समृद्ध आणि श्रीमंत. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचा मान होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सुरत शहरामधून चाले. या सुरत शहरामधून मिळणार्या जकातीपोटीच औरंगजेबास वार्षिक १२ लक्ष रुपये मिळत असत. डच, इंग्रज, अरबी, फ्रेंच हे सगळे लोक सुरतमधून आपला व्यापार करत असत. सोने, हिरे, मोती, जड-जवाहीर याने सुरतेतील व्यापाऱ्यांचे कोश गडगंज भरलेले असत. अनेक अनमोल वस्तू, चंदन, अत्तरे, केशर, रेशमी कापडाचे ठाण अशा अनेक वस्तूंचा व्यापार सुरतेमधून चालत असे. या सर्व गोष्टी वगळता सुरतेला अनन्यसाधारण महत्त्व होते, कारण यवनी धर्मानुसार मक्का यात्रा अत्यंत पवित्र मानलेली आहे आणि मक्केला जाणारे यात्रेकरू हे सुरतेमधून जात असत. त्यामुळे सुरतेला मक्केचा दरवाजा असे संबोधले जात असे. सुरतेचे मूळ नाव 'सूर्यपूर' असे होते. तापी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले, समुद्र किनार्यापासून २७ मैल आत असणाऱ्या सुरतेची वस्ती तशी दाट होती. पण त्याभोवती यावेळी तटबंदीदेखील नव्हती. (अ.हो.मो) सुरत राजगडापासून १५० कोस दूर आणि हा सगळा प्रवास मुघली प्रदेशातूनच होणारा. अशा या सोन्याच्या लंकेची खडा-न-खडा माहिती बहिर्जी नाईक यांनी गोळा केली. सुरतेमधील सर्व धनिक मंडळी, त्यांची संपत्ती, सुरतेमधील मुघली बंदोबस्त ही सर्व माहिती घेऊन बहिर्जी महाराजांसमोर हजर झाले आणि सुरत शहराचा नकाशाच त्यांनी महाराजांपुढे मांडला आणि बहिर्जी महाराजांना म्हणाले, "सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल." बहिर्जीकडून ही सगळी माहिती ऐकल्यावर "लष्कर चाकरी नाफारी काम मनाजोगे होणार नाही याजकरिता जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे" या विचारे महाराजांनी स्वतः जाण्याचे निश्चित केले. (स.ब) सर्व सैन्याच्या जमावानिशी महाराजांनी मार्गशीष वद्य द्वितीया, शके १५८५ म्हणजेच ६ डिसेंबर १६६३ रोजी सुरतेसाठी राजगडाहून प्रस्थान केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ डिसेंबर इ.स.१७०१ मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ डिसेंबर इ.स.१९५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ६ डिसेंबर इ.स.१९७६ क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!* #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 - शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान ohri Shi l mhht uutshtan महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ नोंदणी क 2029 शिवदिनविशेष० डिसेबर इ.स.१६६३ ٤ सुखखेवर स्वाशीराठी அஅனி fளஞரீகஇுலகுர शखगडावर्ना खस्थााना केले॰॰ ४ शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान ohri Shi l mhht uutshtan महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ नोंदणी क 2029 शिवदिनविशेष० डिसेबर इ.स.१६६३ ٤ सुखखेवर स्वाशीराठी அஅனி fளஞரீகஇுலகுர शखगडावर्ना खस्थााना केले॰॰ ४ शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! - ShareChat
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:30
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ५ डिसेंबर इ.स.१६६७ पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंत ह्या नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. पोर्तुगीजांनी पाद्री सेबास्तियांव मार्तीश ह्याला आपला दूत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे तहाच्या कारारावर त्यांची सही घेण्यासाठी पाठविले. शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी जो शांततेचा आणि मैत्रीचा करार झाला त्याचा पोर्तुगीज आराखडा पुढील प्रमाणे आहे. शिवाजी राजे आणि काँद व्हिसे रेई ह्यांच्यामधील मैत्रीच्या आणि शांततेच्या कराराची कलमे पुढील प्रमाणे :- (१) दिनांक १९ नोव्हेंबर १६६७ रोजी शिवाजी राजांच्या सैन्याने बार्देशमध्ये शिरून जे पुरूष, स्त्रिया आणि मुले युद्ध कैदी म्हणून नेले व माझ्या राजाच्या प्रजाजनांची गुरे आणि बैल पळविले, त्यांना शिवाजी राजे ह्यांनी आमच्याकडून कोणतीच युद्ध खंडणी न घेतां आम्हास परत करावे. (२) आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिलेल्या लखम सावंत आणि केशव नाईक ह्या देसायांना सक्त ताकीद देण्यात येईल की, त्यांनी आमच्या राज्यांत राहून शिवाजी राजे, त्यांचे प्रजाजन, आणि त्यांचे राज्य ह्या विरुद्ध कोणतीच कारवाई करू नये आणि त्यांच्या हातून तसे कृत्य घडल्याची जाणीव आम्हाला झाल्यास अथवा शिवाजी राजांनी ते आमच्या निदर्शनास आणल्यास त्या देसायांना आमच्या स्वामींच्या राज्यांतून ताबडतोब हांकलून देण्यात येईल. आमच्या स्वामींच्या राज्यात येऊन राहिलेले दुसरे दोन शरणार्थी नारबा सावंत आणि मालू शेणवी ह्यांनाहि अशीच ताकीद दिली जाईल. आणि सर्व प्रकारची अंदाधुंदी टाळण्यासाठी सदरहू देसाई जोपर्यंत आमच्या राज्यात असतील तोपर्यंत त्यांना गोवा बेटाबाहेर जाऊ दिले जाणार नाही. (३) बालाघाटहून गोवा बेटांत आणि बंदरात आणि बार्देश व साष्टी महालांत जो माल आणि गुरे येतील ती अडविली जाऊ नयेत व त्यांच्यावर कर लादला जाऊ नये. त्याचप्रमाणे पोर्तुगालच्या राजाच्या ह्या राज्यातून आणि बेटातून जो माल बालाघाटला जाईल, त्याचीही अडवणूक होऊ नये अथवा त्याच्यावर कर लादला जाऊ नये. मग शिवाजी राजे व आदिलशहा ह्यांच्यामध्ये युद्ध चालू असो वा नसो. (४) उभय पक्षांची दृढ आणि चांगली मैत्री असावी आणि समुद्रावर आणि जमिनीवर ही मैत्री टिकावी आणि उभय पक्षांपैकी कुणा एकाकडून ह्या काराराचा भंग झाल्यास त्याने दुसऱ्याकडे तत्संबंधाने तक्रार करावी. आमच्याकडून आगळीक झाल्यास शिवाजी महाराजांनी आमच्याकडे तक्रार करावी आणि शिवाजी महाराजांकडून आगळीक झाल्यास आम्ही त्यांच्यापाशी तक्रार करावी. (५) जर शिवाजी राजांना काँद व्हिसे रेई ह्यांच्याशी एखादा महत्त्वाचा सौदा करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तिमार्फत त्या वाटाघाटी करता येतील. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ५ डिसेंबर इ.स.१६७३ शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले. सन इ.स.१६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला. राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात घाटले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ डिसेंबर इ.स.१७४६ सदाशिवराव भाऊसाहेब अवघ्या सोळाव्या वर्षी महादजीपंत पुरंदरे यांच्यासह दिनांक ५ डिसेंबर सन १७४६ रोजी कर्नाटक मोहीमेवर रवाना झाले. या मोहिमेत पाच्छापूर, कित्तूर, परसगड, बदामी, यादवाड, बसवपट्टण, बागलकोट वगैरे ३६ परगणे काबीज केले. बहादूरभेंड्याचा किल्लाही घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ५ डिसेंबर इ.स.१७९६ नाना आणि दौलतराव शिंद्यांना परशुरामभाऊंची ही घाई अन विश्वासात न घेता केलेले काम अजिबात आवडले नाही आणि नाईलाज असला तरीही या दोघांनी श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे) यांस गादीवर बसवण्याचे ठरवले. दि. ५ डिसेंबर १७९६ रोजी बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. नानांनी सातारकर शाहू महाराजांकडून वस्त्रेही आणली. बाजीराव आता अधिकृतरीत्या पेशवे झाले. चिमाजीअप्पा हे तसं पाहिलं तर वयाने अन् नात्यानेही यशोदाबाईंपेक्षा वडील होते. ते यशोदाबाईंचे चुलत सासरे होते. त्यांचे दत्तकविधान करणे हे अतिशय चुकीचे असून अशास्त्रीय आहे असे पुण्यातल्या धर्मसभेचे मत होते. बाजीरावांनीही गादीवर बसताच पुण्यातल्या शास्त्री-पंडितांची सभा बोलवून हे दत्तकविधान अधिकृतरीत्या गैर ठरवले आणि तडक चिमाजीअप्पांना नजरकैदेत ठेवले. गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसात बाजीराव पेशवे नाना फडणविसांना न जुमानता स्वतः मुखत्यार होऊन कारभाराचे निर्णय नानांना न विचारता स्वतःच घेऊ लागले. बाजीराव ऐकत नाही आणि हळूहळू तोही रघुनाथरावांच्याच वळणावर जात आहे असे नानांना वाटू लागले. त्यामुळे नाना कडेकोट बंदोबस्तात प्रथम साताऱ्यास जाऊन छत्रपतींची भेट घेऊन महाड येथे राहिले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
🚩छत्रपति शिवाजी महाराज - शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ स्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क शिवदिनविशेष॰० डिसेबर इ.स.१६७०३ ५ छत्रपती शिवाजी महाशजांनी शर्जाथ्वानाचा पशभव कश्क्न त्याश ठा२ माश्ले. . ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान Shn Shhnhhu "ui महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ स्टबर २०२५ सुरेश भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क शिवदिनविशेष॰० डिसेबर इ.स.१६७०३ ५ छत्रपती शिवाजी महाशजांनी शर्जाथ्वानाचा पशभव कश्क्न त्याश ठा२ माश्ले. . ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! - ShareChat
#🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
🚩जय जिजाऊ - ShareChat
00:30
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳ ▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬ *🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण* *************************************** https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩जय जिजाऊ #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९ शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली ! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले . संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले . 🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२ रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण खेड्या जवळ लढाई झाली, त्यात दोन्हीकडील सैनिक मेले व जखमी झाले. त्या लढाईनंतर मुकर्रबखानाने मौजे मेहेंदळी येथे डेरा जमा केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ डिसेंबर इ.स.१७२७ थोरला बाजीराव पूर्णा परळी प्रांतात आले. पुढे ६ डिसेंबर पौष शु. ५ कसबे नरसीक, ८ डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोला, ९ डिसेंबरला तालुका मंगळूरपीर जिल्हा अकोला, १० डिसेंबर ला हातगाव, ११ डिसेंबर ला मांजराखेड. तालुका चांदूर जिल्हा अमरावती हे सगळे प्रांत लुटून उध्वस्त केले. म्हणजे डिसेंबर च्या ह्या प्रारंभीच्या काळात राऊ नी तुफानी घोड-दौड करून वाशीम,माहूर, मंगळूरपीर तालुके धुळीस मिळवले. मग अचानक वायव्येस शिरले आणि चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्या जवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ डिसेंबर इ.स.१७४८ पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला निवती गड तसा छोटा आहे. उंचीनेही छोटा आहे, पण छान आहे. गडासंबंधी जास्त काही ऐतिहासिक माहिती वाचायला मिळत नाही. शिवकाळानंतर हा किल्ला १८व्या शतकामध्ये सावंतवाडीच्या सावंतांकडे होता. ४ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीजांनी निवतीवर हल्ला चढवला. पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माइल खान नावाच्या कॅप्टनने शौर्याची कमाल करून सावंतांकडून हा किल्ला जिंकून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ डिसेंबर इ.स.१७९१ महादजी शिंदे यांनी एक पत्र पेशव्यांस पाठविले. महादजी शिंदे लिहीतात. "स्वामींचे दर्शन घ्यावयाचा बेत करून मेवाडातून येत असता उदेपुरकर राणाजींचे राज्यात बंदोबस्त नाही. उमराव आपापले जागा मुलुख बळकावून राहीले. भिमसिंगाकडे चित्तोडचा किल्ला. तो भिमसिंग राणाजींचे लक्षात नाही. याकरिता राणाजी येऊन भेटले. चित्तोड वगैरेचा बंदोबस्त करावा म्हणोन बजिदी केली त्यावरून राणाजीसह चित्तोडनजीक येऊन मुक्काम केला. भिरमसिंगाने गोळी वाजवली. सबब मोर्चे लाऊन तोफांची निकड करताच भिमसिंग घाबरा झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ डिसेंबर आज #भारतीय_आरमार_दिन भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराज. "आरमार उभारणी" इ.स. १६५९ पासुन शिवरायानी आरमार तळ उभारण्यास सुरूवात केली. पश्चिम किनारपट्टीवर विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग बांधले. मालवणचा सिंधुदुर्ग तर जलदुर्गाचे आश्चर्य म्हणावे लागते कारण तो एवढा अचुक व मजबुत बांधला आहे. आरमाराची यादी चित्रगुप्ताच्या बखरीत दिली आहे त्यात "थोर गुराबा ३०, गलबते १००, महागिर्या १५०, लहान गुराबा ५०, होड्या १०, लहान होड्या १५०, तारवे ६०, पाल १५, जुग १५, मचवे ५०. एवढी होती. इंग्रजानीही स्वराज्याच्या आरमाराच्या याद्या वेळोवेळी लिहुन ठेवलेल्या आढळतात. त्यावरून स्वराज्याचे आरमार कारवार पर्यंत गेले तेंव्हा त्यात एका डोलकाठीची ३० टनापासुन १५० टनापर्यंत वजनाची ८५ जहाजे व तीन अतिमोठी जहाजे होती. म्हणून आधुनिक भारताशी अनुबंध असणारा, समुद्र व आरमाराचा गम्भिरपणे विचार करणारा पहिला राजा म्हणजे शिवाजी महाराजच म्हणावे लागेल. पहिले आरमारप्रमुख सरखेल "कान्होजी आंग्रे" होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ ✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.* ▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬ *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* *जय गडकोट* *!! हर हर महादेव !!*
🚩जय जिजाऊ - शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान ohri Shi l mhht uutshtan महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेथ भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क - शिवदिनविशेष॰ डिसेबर इ॰स. १६७७९ 8 নিমনী  दिलेरखानच्या छावणीतून ` युवराज छत्रपती संभाजी राजे किल्ले पन्हाळगडास परतले .. ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! शिवशंभू प्रतिष्ठान ?1 श्री शिवशंभू प्रतिष्ठान श्री शिवशंभू प्रतिष्ठान ohri Shi l mhht uutshtan महाराष्ट्र राज्य. {ೆ HES स्थापना १२ सर्प्टबर २०२५ सुरेथ भोसलेः- ८९७५३७९३७५ सोलापूर ००००६४७ /२०२५ नोंदणी क - शिवदिनविशेष॰ डिसेबर इ॰स. १६७७९ 8 নিমনী  दिलेरखानच्या छावणीतून ` युवराज छत्रपती संभाजी राजे किल्ले पन्हाळगडास परतले .. ! शिवकार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण.. ! - ShareChat