
शिवभक्त सुरेश भोसले
@sureshbhosale
🚩रोजचे ऐतिहासिक शिवदिनवीशेष🚩📱📲8975379375
#📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६५९
( कार्तिक शुद्ध षष्टी, शके १५८१, संवत्सर विकारी, मंगळवार )
खानाच्या वकिलाला निरोप :-
कृष्णा भास्करला जाणूनबुजून गड दाखवला गेला. गडाचा बंदोबस्त किती मजबूत आहे हा निरोप खानापर्यंत जावा हा हेतू. खानाचे पत्र स्वीकारून रिवाजानुसार आपलेही वकील खानाकडे येतील असे सांगून कृष्णा भास्करास उंची नजराणे, भारी पोशाख, घोडा व भेटवस्तू देऊन आजच्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६७९
सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजी महाराजांचे एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडले. इंग्रजांनी त्यांच्याकडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्यांना कैदेत टाकले. तसेच मुंबईतील ३-४ गरीब रहिवाश्यांना चौलच्या आसपास टेहळणीकरिता पाठवले व त्यांना आदेश दिला की, त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. हे हेर मराठ्यांच्या हालचाली इंग्रजांना कळवीत होते. मुंबईतील जवळजवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१६८२
स्वराज्यावर चालून आल्यावर औरंगजेबाने नोव्हेंबर १६८१ पासूनच तळकोकणावर आपले सरदार पाठवून हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या मोहिमेवर हसन अलीखान,राव दलपत यासारखे मातब्बर सरदार होते. ऑगस्ट १६८२ मध्ये खानजहान बहादूर या सरदारालाही तळ कोकणात पाठवले होते. छत्रपती संभाजीराजे कोकणात मुघलांच्या या चालू असलेल्या हालाचली थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी तळ कोकणातील आपल्या अधिकाऱ्यांना हुकूम देऊन मुघल सैन्याच्या वाटा अडवायला सांगितले होते. मराठ्यांच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी या हुकुमाची ताबडतोब अंमलबजावणी केली. कोकणच्या वाटेवर संभाजीराजेंच्या सैन्याने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने मुघल सरदारांना आणि त्यांच्या सैन्याला मराठ्यांनी कोकणात शिरु दिले नाही. याच दरम्यान १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यात तळ कोकणचा मुघल अधिकारी अली चौधरी याने आपल्याला एक सरदार, अहजार स्वार व २ हजार प्यादे दिले तर आपण सुरतपासून तळ कोकणपर्यंत मुलुख लुटू शकेन असे कळवले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७२४
निजामाने मुबारिझखानास लिहिले की, आपण दोघेही बादशहाचे सेवक, आपसात लढणे चांगले नाही. माझी नेमणूक दुसरीकडे कोठे झाल्यावर मी दक्षिण सोडून जाईन. खानाने हे बोलणे जुमानले नाही. लढाईनेच सोक्षमोक्ष करून घ्यावयाचे त्याने ठरविले. कदाचित दिल्लीची कुमक
खानास मिळेल म्हणून त्यास अगोदर गाठण्यासाठी निजामाने आपल्याकडील बाजीराव व मराठी फौज घेऊन तारीख ३ सप्टेंबर रोजी औरंगाबादेहून दौड केली. बाजीरावांनी आपली माणसे मुबारिझखानाच्या हालचाली कळविण्यास पाठविली होती. दोन्ही सैन्याची गाठ साखरखेड या गावी पडली. तारीख १ ऑक्टोबर रोजी तुंबळ युद्ध झाले. मुबारिझखानाने लढण्याची पराकाष्ठा केली पण तो व त्याचे दोन मुलगे मारले गेले. त्याच्या फौजेचा मोठा संहार झाला. विजयी निजामाने जानेवारी १७२५ च्या सुरुवातीस हैद्राबादेचा ताबा मिळविला. निजामाच्या या विजयामुळे भागानगर ऊर्फ हैद्राबादचा सुभा फत्तेसिंगास मिळावा ही शाहू महाराजांची मागणी पार वितळून गेली. निजामाने औरंगाबाद व हैद्राबाद या बाजू आपल्या सरदारांकडून व्यापल्यामुळे शाहू महाराजांच्या सरदारांना कर्नाटकाकडे आपली मुलुखगिरीची कामगिरी करावी लागली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८०
दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव येथे असताना आनंदराव रास्त्यांच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला
चढवला. यात हालेचे विशेष नुकसान झाले नाही. तरीही बदलापूराजवळच्या हल्ल्याची धास्त खाऊन तो टिटवाळा मुक्कामी गेला. रामचंद्र गणेश कानडे हे वसईच्या कुमकेकरता जात असतानाच टिटवाळ्याच्या जवळच हालेने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला रामचंद्रपंतांनीही असे कडवे प्रत्युत्तर दिले की, हार्टलेची पाचावर धारण बसली. अशावेळी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी वज्रेश्वरी नजिक आकाशात खूप मळभ असताना रामचंद्रपंत गुपचूप हार्टलेला पकडण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, ऐनवेळी चक्क उन पडले आणि हार्टलेला रामचंद्रपंत दिसले. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या आणि रामचंद्रपंत ठार झाले. इकडे वज्रेश्वरीला पंत पडले अन् तिकडे त्याच सुमारास वसईदेखील पडली!!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ ऑक्टोबर इ.स.१७८८
गुलाम कादरने नवीन बादशहाचे सहाय्याने जनानखाना व राजपुत्रांचे महाल लुटले. एके दिवशी शहाजाद्यांना व दासींना आपल्या समोर उभे करून गावयास व नाचावयास लाविले, तसेच बादशहास दिवाणी इ-खासात ओढून आणून चाबकाने मारिले. इतकेही करून द्रव् मिळेना म्हणून बादशहास पुरलेल्या द्रव्याचा ठावठिकाणा विचारला, तेव्हा बादशहाने आपल्याला असे द्रव्य माहीत नाही असे उत्तर करताच तक्तावर हुक्का ओढीत बसलेल्या गुलाम कादरने एकदम उडी टाकून बादशहा शहा अलम यास खाली पाडले व त्याचे उरावर बसून पेषकबजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडले. शहरात सतत लुटालूट चालू ठेविली. इस्माईल बेग यास गुलाम कादरचे हे वर्तन मुळीच आवडले नाही. अशा वाईट कृत्यात आपण सामील असल्याने आपल्यावरही केव्हातरी गदा येईल म्हणून तो घाबरून गेला आणि सरळ महादजी शिंद्यास येऊन मिळाला महादजीनी काळजीपूर्वक योजना आखून ऑक्टोबर १७८८ त आपला सरदार राणेखान यास फौज व तोफा देऊन दिल्लीचा कबजा घेण्यास रवाना केले. तसेच गुलाम कादरचे अंतर्वेदीतील मुलुखात मराठी फौज पाठविली. अंतर्वेदीतील या मराठे फौजेने सन १७८८ च्या ऑक्टोबरात रोहिल्यांची ठाणी उठवून मराठ्यांचा अंमल पूर्ववत स्थापिला. मराठ्यांची फौज आपल्यावर चालून येत आहे असे पाहून गुलाम कादरखान दिल्ली सोडून आपल्या मुलुखाचे रक्षण करण्यासाठी निघून गेला. पुढे दिनांक ११ ऑक्टोबर १७८८ रोजी मराठी फौजेने दिल्लीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यानंतर २२ ऑक्ट रोजी मराठे सरदार अंध बादशहा शहाअली यास नजर शिष्टाचार करून भेटले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*#ऊर्जामंत्र*
*स्वप्न खरी होण्याची शक्यताच ही आपल्या जीवनाला रोमहर्षक आणि ऊर्जादायी बनवत असते....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
#⛳शिवसंस्कृती #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩जय जिजाऊ
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 १० ऑक्टोबर इ.स.१६६४
छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१६७३
१० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला. त्यामुळे मुंबईच्या इंग्रज प्रमुखाने सिदीला आपली नाराजी कळवणारे व तंबी देणारे पत्र पाठवले. प्रेसिडेंटच्या ह्या पत्राकडे दुर्लक्ष करून सिद्दीने आपले अत्याचार, दहशतयुक्त जुलूम चालूच ठेवला. श्रीमान रायगडाहून आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शंभर सैनिकांनी सिद्दीच्या माणसांना चकित करून निदर्यपणे कापून काढले. ह्या घटनेनंतर सिद्दीचे निघृण अत्याचार शांत झाले असे वाटते. इ.स. १६७४ च्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी यांच्यात तुंबळ युद्ध झाले. दोन्ही पक्ष अगदी जेरीस आले होते. तेव्हा सिद्दीने सुरतच्या इंग्रज प्रेसिडंटाला दोघांत मध्यस्थी करून शांतता निर्माण करण्याची विनंती केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबळने रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी खाडीत शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान यांजवर हल्ला चढवला. दोन्ही नौदल प्रमुख जखमी झाले. सिद्दीचे १०० तर मराठ्यांचे ४४ सैनिक कामी आले. मराठ्यांचा विजय झाला. त्यामुळे सिदी संबळ जंजिऱ्याच्या २१ मैल दक्षिणेकडील हरेश्वर बंदरात निघून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर १६७५
१० आॕक्टोबर १६७५ रोजी या संदर्भात खामगाव येथे एक मजहर आला. त्यावर मावळातील करंजवणे येथील देशमुख, जैतजी नाईक, बिनमल्हारजी नाईक तसेच कोंढवे, कात्रज, नांदेड, खडकवासला, नांदोशी, वडगाव, आंबेगाव, बावधन, हिंगणे, खेरडी, गोऱ्हे, भुकुम, सुस, लवळे, कोथरुड, इ. गावच्या पाटलांच्या निशाणी तसेच परीट-मोगरी, सुतार-वाकस, तेली-पहार, महार-विळादोरी, गुरव, कुंभार, लोहार, तराळ यांच्याही निशाणी मजहरावर आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१७६०
भाऊसाहेबासह मराठे सैन्य दिल्लीत दि. २२ जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत राहीले. त्यानंतर त्यांनी आपली छावणी दिल्ली पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शालीमार बागेत हलवली. तेथे मराठ्यांची दि. १० ऑक्टोबर १७६० पर्यंत छावणी होती. ह्या ८० दिवसांच्या वास्तव्यात मराठ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. उत्तरेकडील मामलतदाराकडील येणाऱ्या पैशावर खर्च भागविण्याची पाळी आली. जाटांकडील सालाबाद खंडणीचे पैसेही भिडेमुळे भाऊस मागता आले नाहीत. उत्तरेत गारा व गव्हावरली रोग पडल्यामुळे दुष्काळ पडला, महागाई झाली तसा सैन्याचा खर्च वाढत चालला होता. दिल्ली घेतल्यामुळे तेथील राजवंश व राजवाडा यांच्या खर्चाचा बोजाही मराठयांवर पडला. तो खर्च महिना सुमारे १ लाख रुपये होता. मराठ्यांच्या छावणीच्या दरमहाच्या ७ लाख रुपये खर्चात आणखी एक लाख रुपये खर्चाची भर पडली. हा खर्च भागविण्यास भाऊस पैशाचा पुरवठा सारखा व्हावयास हवा होता. पण तसे होईना. पेशव्यांच्या पत्राप्रमाणे उत्तरेतील मामलेदारांनी अर्धा वसूल भाऊकडे व अर्धा पेशव्यांकडे पाठवावयाचा होता. तेव्हा मामलेदार भाऊस लिहित की, वसूल झालेले पैसे पेशव्यांस पाठविले व पेशव्यास लिहित की, भाऊस पाठविले. आणि पैशाचा भरणातर कोठेच करत नसत. ह्यामुळे हलाखी निर्माण झाली. “फौजभारी पण पोटास नाही. घोडी दाणा खावयास विसरली, माणसास अन्न मिळतां कठीण असे झाले" मराठ्यांच्या तोफखान्याचे बैल खाण्यास नमिळाल्यामुळे व आजारामुळे मरु लागले. यामुदतीत अबदालीच्या फौजेने अंतर्वेदीतील मुलुख व्यापला त्यामुळे दिल्ली शहरात धान्याचा व घासदाण्याचा पुरवठा होईना. सैन्यास उपवास पडू लागल्यामुळे वादशाही दिवाणी-इ-खास ह्या दरबारच्या जागेस रुप्याचे छत होते त्याचा पत्रा काढून गरज भागविण्याची भाऊने तोड काढली. दि. ६ ऑगस्ट रोजी छत फोडून ते वितळवून ९ लक्ष रुपये तयार केले. ह्या छताचा काही भाग वजीर गाजिउद्दीन खानाने त्यापूर्वी काढून नेला होता. ह्या ९ लाखापैकी काही रुपये सरदारास दिले, बाकी फौजेस वाटले. जेणेकरुन सुमारे एक महिना गुजरण झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १० ऑक्टोबर इ.स.१७७३
दादांनी निजामअली आणि हैदरयाजवर स्वारी करण्यासाठी विसाजीपंतांनी आणलेल्या पैशातून सैन्य उभारणी केली आणि वरील दोधावर स्वारी करावी अशी मसलत सखाराम बापू, प्रमुख मंडळी व शिंदे, होळकर वगैर सरदार मानकरी यांना बोलावून आणून विचार केला. सर्वांचा रुकार झाला. त्यावरून दसऱ्यास १० ऑक्टोबर १७७३ रोजी पुण्याहून निघून डेरे गारपिरावर दिले. बापू, त्रिंबकराव, नाना, हरिपंत, मोरोबा वगैरे मंडळीस आपल्यामागे पुण्यास ठेविल्यास आपल्याला मोठा धोका निर्माण होईल अशी दादास सार्थ भिती वाटल्याने त्या सर्व मावळ्यांची त्यांनी मोट बांधली व त्यास आपल्याबरोबर लष्करात चालविले. गारपिरावरून ते पेडगांवला आले. तिथेच आनंदीबाईच्या सांगण्यावरून आणलेली पेशवेपदाची वस्त्रे दादांनी स्विकारली आणि ह्याच ठिकाणी रामशास्त्रींनी येऊन 'दादा तुम्ही खुनी आहात आणि खुनास शिक्षा देहांत प्रायशित्ताची, ती तुम्ही भोगली पाहिजे' हे त्यास ऐकविले. त्यामुळे दादांवरील कारभाऱ्यांचा विश्वास विचलित झाला आणि त्यांची मने दादांविरुद्ध एक झाली, आणि त्यातूनच बारभाईचे कारस्थान उभारले गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*#ऊर्जामंत्र*
*स्वताच्या मेहनती वर विश्वास ठेवा,कारण प्रयत्न हे कधीच व्यर्थ जात नाहीत....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
#⛳शिवसंस्कृती #🚩शिवराय #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🚩छत्रपति शिवाजी महाराज
#📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩जय जिजाऊ
#⛳शिवसंस्कृती #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
*"आपण पुढे काय करणार हे महत्वाचे नाही तर,आपण सध्या काय करत आहोत हे जास्त महत्वाचे आहेत....!!..*
*🚩||दैवत छत्रपती शिवशंभु||🚩*
*🚩आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩*
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*⛳ श्री शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* ⛳
▬▬▬▬▬▬꧁☾︎✫☽︎꧂▬▬▬▬▬▬
*🚩शिव कार्य हेच आमचे ध्येय आणि हेच आमचे धोरण*
***************************************
https://www.instagram.com/shrishivshambhu_pratishtan?igsh=dG9ib2pubnA5dDU4 #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय जिजाऊ #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६३५
जिवाजी महाले यांची जयंती🚩
प्रतापगडावर अफजल खानाशी महाराज लढा देत असताना महाराजांवर वार करणाऱ्या सय्यद बंडाचे त्यांनी हात छाटले होते. आपल्या चपळाईने महाला यांनी महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळे होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी ही म्हण प्रचलीत झाली. शिवरायांचे अपरिचीत मावळे जिवाजी महाले छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक होते. छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६४८
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४८ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६६७
मोघलांना जाऊन मिळण्याबाबत काही राजकारण असेनही...
छत्रपती शिवरायांनी आग्र्यावरून परतताच छत्रपती संभाजीराजेंना सात हजार स्वारांची मनसबदारी मिळवुन मोघलांशी सख्य केले. त्यावेळी दक्षिणेचा सुभेदार होता शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलम. छत्रपती संभाजीराजेंनी ९ ऑक्टोबर १६६७ ला शहाजाद्याच्या भेटीस राजगडावरुन प्रयाण केले.
वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात" .....हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की," छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती.
करे पुढे सांगतो की " शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उद््गार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फार आनंद झाला. अशा तह्रेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला." अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत. नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले. फितुर झालेल्या बर्याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील... हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्या पुढील संकटाची(औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपती संभाजीराजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते. तेंव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजीराजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजीराजांना मदत केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ९ ऑक्टोबर इ.स.१६८४
छत्रपती संभाजीमहाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल
होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.
पण फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा छत्रपती संभाजी राजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले. औरंगजेबाने ९ ऑक्टोबर १६८४ शहाअलमला फार मोठी मदत पाठविली. २८ डिसेंबरला एक मणाची तोफ व २०/२० शेरांची एक अशा चार तोफा रूहुल्लाखानाच्या मदतीस विजापुरास रवाना केल्या. या हालचालीत इ.स. १६८४ हे साल गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
✍ *लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.*
▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬༒︎༒︎▬▬▬▬▬▬
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩शिवराय