क̴̯̌̒ो̶̧̭̓̈́̔͟ͅक̶̙̉̀ण̸̗̩̑̉̚ व̸͙̰̝͖͑̀̈े̶̢̞͗͝ड̵̥̀̒͝͝
ShareChat
click to see wallet page
@vilakshan
vilakshan
क̴̯̌̒ो̶̧̭̓̈́̔͟ͅक̶̙̉̀ण̸̗̩̑̉̚ व̸͙̰̝͖͑̀̈े̶̢̞͗͝ड̵̥̀̒͝͝
@vilakshan
• कोकणातला निसर्ग🏝 •Follow नक्की करा 🙏 •मी-✍️
#😎आपला स्टेट्स #👩🏻‍🎤Girls नौटंकी #👧Girls status
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:17
#👧Girls status #👩🏻‍🎤Girls नौटंकी #😎आपला स्टेट्स
👧Girls status - ShareChat
00:15
#👧Girls status #😎आपला स्टेट्स #👩🏻‍🎤Girls नौटंकी
👧Girls status - ShareChat
00:32
#🌳निसर्ग फोटो #🌳निसर्ग फोटोग्राफी #📸 माझी फोटोग्राफी #कोकण
🌳निसर्ग फोटो - ShareChat
00:24
नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मनाला सुख नावाची फूल रेंज सापडते.. ❤️🫶 #📸 माझी फोटोग्राफी #🌳निसर्ग फोटोग्राफी #👌हृदयस्पर्शी फोटो #🌳निसर्ग फोटो
📸 माझी फोटोग्राफी - ShareChat
#🌳निसर्ग फोटोग्राफी #🌳निसर्ग फोटो #👌हृदयस्पर्शी फोटो #📸 माझी फोटोग्राफी
🌳निसर्ग फोटोग्राफी - ShareChat
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी 'चौरंग' शिक्षा काय होती?🤔🤔 हात-पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन ती व्यक्ती दगावू नये यासाठी जखमा गरम तेलात अथवा तुपात तळल्या जायच्या.😨😨 छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भ्याड कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे, नराधमांनी कोवळ्या, अजाणत्या जिवांनाही सोडले नाही. शाळेत ज्या चिमुकल्या दादा दादा म्हणत होत्या, त्याच नराधमाने त्यांना ओरबडले. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे अश्वासन देण्यात आले. पण राज्यात महिला आणि चिमुकलीच्या इज्जतीसोबत (badlapur school case in marathi) खेळण्याची ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही अशा प्रकारची कूकर्म झाली आहेत. कोर्टाकडून गुन्हेगारांना शिक्षा होते, पण त्याला खूप उशीर लागतो. न्यायव्यवस्थेत पळवाटाही आहेत. 2013 मध्ये मुंबईत शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्कार (mumbai shakti mills case) झाला होता. त्या आरोपींना पकडलेही, तेव्हाही असाच संताप व्यक्त करण्यात आला होता. ११ वर्षे उलटली, पण त्या आरोपीला अद्याप शिक्षा झालेली नाही. हे काही पहिलेच प्रकरण नाही. याआधीही अशी प्रकरणं झाली आहेत. बदलापूर असो अथवा शक्ती मिल प्रकरण असो. महिला, चिमुकल्यांवरील अत्याचार कायमचे कधी थांबणार?असाच प्रश्न उपस्थित होतोय. आंदोलनं, कँडल मोर्चा काढून काय होणार? अभिनेता रितेश देशमुख यांनी बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त करत असताना महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी रितेश देशमुख यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा (shivaji maharaj chourang punishment) दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatripati Shivaji Maharaj Maratha Empire) यांनी वयाच्या १६ व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भ्याड कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांची चौरंग शिक्षा नेमकी काय होती. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatripati Shivaji Maharaj Maratha Empire) यांनी आदर्श शासनव्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांनी महिलांचा सन्मान केला. स्वराज्यातील स्त्रियांच्या ते पाठीशी राहिलेच. पण शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला, त्यांना सन्मानाने वागवले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. त्यांनी स्वत:च्या मेहुण्यालाही शिक्षा दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील चौरंग शिक्षेचा धाक होता. राजेंनी नराधमांना धाक बसवण्यासाठी दिलेली चौरंग शिक्षा काय होती, ती पाहूयात... वयाच्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलात्कार करणाऱ्याला चौरंग शिक्षा दिली होती. रांझ्याच्या बाबाजी भिकाजी गुजर याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या याच शिक्षेला 'चौरंग' शिक्षा असे म्हटले जाते. हात-पाय कलम केल्यानंतर रक्तस्त्राव होऊन ती व्यक्ती दगावू नये यासाठी जखमा गरम तेलात अथवा तुपात तळल्या जायच्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की, अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होत नव्हती. गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जान सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली. हात-पाय कलम केल्यानंतर जखम तेलात तळल्या जायच्या. त्यामुळे नसा बंद व्हायच्या.. त्यामुळे रक्तस्त्राव तर थांबायचाच, पण तो व्यक्ती मरत नसायचा. शिक्षा फक्त हात-पाय तोडायची द्यायची. त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही. आयुष्यभर हे सर्वांसमोर उदाहरण म्हणून राहील. तुम्ही जर महिलांवर अत्याचार केला, तर तुम्हालाही अशीच शिक्षा होईल, असे सर्वांसमोर उदाहरण राहावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरु केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात चौरंग शिक्षेचा धाक होता. त्यामुळे महिलांकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहत नसायचे. बाबाजी भिकाजी गुजर हे फक्त एकच प्रकरण नाही, त्याशिवाय खंडोजी कोपर यांचा एक पाय आणि एक हात तोडला होता. इतकेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या मेहुण्यालाही सोडलं नव्हते. त्यांनी मेहुण्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली होती. त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले होते. छत्रपतींनी मेहुण्यालाही सोडलं नाही - मल्लवा देसाईचं एक प्रकरण आहे. धारवाडजवळ बेलवडी जिंकण्यासाठी त्यांचा मेहुणा सखुजी गायकवाड यांच्यावर शिवाजी महाराज यांनी जबाबदारी दिली होती. पती मृत्यू पावल्यानंतर मल्लवा यांनी लढाई सुरुच ठेवली होती. त्यांनी पुरुष वेशाधारी स्त्री सैन्यही मैदानात उतरवले होते. महाराज मैदानात उतरल्यानंतर बेलवडीच्या सैन्यानी माघार घेतली. सुखोजी गायकवाड याने काही सैन्यास कैद करुन रात्रभर मराठा छावणीत ठेवले होते. त्यामध्ये मल्लवा यांचाही समावेश होता. सखुजी यांनी मल्लवा यांच्यावर वाईट नजर ठेवली.. हे छत्रपती शिवाजी महाराज यांना समजले. छत्रपतींच्या राज्यात शिरसत्याप्रमाणे स्त्रियांना मराठा सैनिकांनी पकडणे हा मोठा गुन्हा मानले जायचे. हा गुन्हा करणारा छत्रपतींचा मेहुणा होता. महाराजांनी त्यांनाही सोडले नाही. सुखोजी गायकवाड यांचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. महाराजांनी मल्लवा यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सावित्रीचा खिताब देऊन गौरव केला. त्याशिवाय तिचं राज्य तिला परत दिले. तिच्या मुलाला मांडीवर घेऊन राजेंनी दूध पाजले. मल्लवा यांना राजेंनी बहीण मानले. मल्लवा यांनी छत्रपतींचा पुतळा तयार केला. ते शिल्प आजही आहे. नरसापूरमधील घटना सुन्न करणारी आहे. या घटनेमुळे महिला, मुली राज्यात सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण, राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत, त्याचं प्रमाण वाढतच चाललेय. आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. आशा गुन्हेगारांना महाराजांच्या काळातील शिक्षा दिल्या गेल्या पाहिजेत का? असा विचार सामान्यांच्या मनात आला तर त्याला चुकीचे ठरवायला नको. राजांच्या काळात दिली जाणारी ही शिक्षा आता सध्या आणि भविष्यातही लागू होईल असे वाटत नाही. कारण राजांच्या काळात राजे म्हणजेच सर्व काही होते, राजे म्हणजेच उच्च न्यायालय, राजे म्हणजेच सर्वोच्च न्यायालय. राजांचा निर्णय अंतिम होता, खबर काढण्यासाठी विश्वस्त सेवक होते, ज्यांच्यामुळ घटनेच्या मुळाशी जाणं शक्य व्हायचं आणि निर्णय देणं सोपं व्हायचं. पण आताच्या लोकशाही मध्ये हे शक्य वाटत नाही, गुन्हा ठरवण्यासाठी कोणते निकष वापरायचे, कुणावर विश्वास ठेवायचा असे अनेक प्रश्न उभे राहतील. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा .. 🙏🙏🙏 #🙋‍♂️Thank You🙂 #🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स
🙋‍♂️Thank You🙂 - "चौरंग शिक्षा" संपूर्ण माहिती राजांच्या काळात दिली जाणारी " चौरंग" शिक्षा आता शक्य नाही "चौरंग शिक्षा" संपूर्ण माहिती राजांच्या काळात दिली जाणारी " चौरंग" शिक्षा आता शक्य नाही - ShareChat
आज सगळं हाताशी आहे, पण त्या निरागस दिवसांची सर कुठल्याच सुखाला नाही.. ❤️🥰 #🌳निसर्ग फोटो #🌳निसर्ग फोटोग्राफी #😎आपला स्टेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो
🌳निसर्ग फोटो - सायकल भाड्य़ावी दुकान ಶ೫ सायकल  मिळतील भाडयाने ३० पैसे সনি अर्धा तास ५० पैसे प्रति तास নান বটীন लिहन य्यावे सायकल भाड्य़ावी दुकान ಶ೫ सायकल  मिळतील भाडयाने ३० पैसे সনি अर्धा तास ५० पैसे प्रति तास নান বটীন लिहन य्यावे - ShareChat
शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लेकराचाच विचार… हीच खरी "आई" 🙏🌹 काही क्षण असे असतात, जे काळजावर कायमचे कोरले जातात. काही दृश्यं अशी असतात, जी डोळ्यांसमोरून जात नाहीत… आणि मनाला आयुष्यभर छळत राहतात. बरगी धरण येथे घडलेला क्रूझ अपघात असाच एक काळजाला चिरून टाकणारा प्रसंग ठरला आहे. त्या क्षणी पाणी वाढत होतं… लाटा प्रचंड वेगाने अंगावर आदळत होत्या… मृत्यू काही क्षणांवर उभा होता. पण त्या माऊलीच्या डोळ्यांसमोर एकच चित्र होतं—तिचं लेकरू. स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड नाही… भीतीचा लवलेश नाही… तिने फक्त आपल्या लेकराला छातीशी घट्ट कवटाळलं होतं. जणू ती नियतीलाच आव्हान देत होती— "माझा जीव घे, पण माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस..." आईच्या प्रेमाचं हे स्वरूप शब्दात मावणारं नाही. तो त्याग… ती माया… ती शेवटची मिठी… हा फक्त नाताच नाही, तर एक अनंत शक्ती आहे. पण नियतीनं आपला निर्णय बदलला नाही… दोघेही या जगातून निघून गेले. मात्र जाताना त्यांनी जगाला एक अढळ सत्य शिकवून दिलं— मृत्यू शरीरं वेगळी करू शकतो, पण आईच्या मायेचं बंधन कधीच तोडू शकत नाही. आज त्या हसऱ्या चेहऱ्यांच्या आठवणी मनाला चटका लावून जात आहेत… शब्द हरवले आहेत… आणि मन भरून आलं आहे… त्या मायेला आणि तिच्या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏🌹 #😢अश्रु आठवणींचे😔 #भावपुर्ण श्रध्दांजली
😢अश्रु आठवणींचे😔 - 00 स्वतःचा जीव गेला... पण लेकराला शेवटपर्यंत कवटाळून ठेवणारी आई 00 स्वतःचा जीव गेला... पण लेकराला शेवटपर्यंत कवटाळून ठेवणारी आई - ShareChat