शरदचंद्र पवारांच्या पाठीमागे किती खासदार आमदार आहेत, हा आकड्यांचा प्रश्न असू शकतो; पण तो नेता दिल्लीत असणे, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. दिल्लीच्या राजकारणात अनुभवाची उंची, संकटात मार्ग काढण्याची क्षमता आणि सर्व पक्षांशी संवाद साधण्याची ताकद हीच खरी ताकद असते. संख्या बदलतात, सत्ताही बदलते, पण राष्ट्राच्या पातळीवर प्रभाव टाकणारे नेतृत्व कायम महत्त्वाचे असते. म्हणूनच ही फक्त राज्यसभेची निवडणूक नाही, तर महाराष्ट्राचा अभ्यासू, संतुलित आणि दूरदृष्टी असलेला आवाज दिल्लीत घुमत राहावा.
#शरदपवार #SharadPawar
#महाराष्ट्राचा_बुलंद_आवाज_शरद_पवार_शरद_पवार... #🏛️राजकारण