#राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले धुरंधर, बुद्धिमान, धाडशी नेत्यास आज सर्व महाराष्ट्र मुकला....
महाराष्ट्र तसेच देशाचे अतोनात नुकसान... अतिशय दुर्दैवी घटना.. 😔
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐🙏🏻
#राजमाता जिजाऊ १२ जानेवारी ❀*
*राजमाता जिजाऊ जयंती*
जन्म - १२ जानेवारी १५९८ (बुलढाणा)
स्मृती - १७ जून १६७४ (पाचड,रायगडचा पायथा)
राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्या नंतर संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला, मुलाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजी राजांच्या आई-वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय. राजमाता जिजाऊ यांच्या थोर कार्यास कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद. जय भारत. जय महाराष्ट्र.
#राजमाता जिजाऊ पानांवर अनेक राजांची आणि सम्राटांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहेत. पण या राजांना घडवणारे हात मात्र अनेकदा पडद्याआड राहतात. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व, ज्यांनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर एका युगाला जन्म दिला, त्या म्हणजे 'राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ'. आज १२ जानेवारी, जिजाऊ माँसाहेबांची जयंती. ज्या माऊलीने शिवरायांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले आणि ते वटवृक्ष होईपर्यंत जोपासले, त्या महान मातेला अभिवादन करण्याचा हा दिवस.*
*जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा येथील लखुजी जाधव यांच्या प्रतिष्ठित घरात झाला.* *बालपणापासूनच त्यांनी मुघल आणि इतर शाह्यांचा जुलमी अंमल पाहिला होता. मराठा सरदार परकीयांच्या पदरी चाकरी करत होते आणि रयत भरडली जात होती. हे चित्र पाहून जिजाऊंचे मन अस्वस्थ होत असे. शहाजीराजांशी विवाह झाल्यानंतर त्या भोसले घराण्याची सून झाल्या. शहाजीराजे स्वतः पराक्रमी होते, पण परिस्थितीमुळे त्यांनाही वेगवेगळ्या शाह्यांची चाकरी करावी लागत होती. या अस्थिर आणि गुलामगिरीच्या वातावरणात जिजाऊंच्या मनात एक स्वप्न आकार घेत होते - स्वतःच्या लोकांचे, रयतेचे राज्य!*
*जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिवरायांचे संगोपन. जेव्हा शहाजीराजे कर्नाटकात होते, तेव्हा पुण्यातील उद्ध्वस्त झालेली जहागीर सावरण्याची आणि बाल शिवबाला घडवण्याची जबाबदारी जिजाऊंवर आली.*
*पुण्यात आल्यावर त्यांनी 'सोनेरी नांगर' फिरवून केवळ जमीन कसण्यायोग्य केली नाही, तर रयतेच्या मनात विश्वास पेरला.* *शिवनेरी आणि लाल महालात त्यांनी शिवबांना केवळ तलवारबाजी किंवा युद्धनीती शिकवली नाही, तर त्याहून महत्त्वाचे धडे दिले. त्यांनी रामायण-महाभारतातील कथा सांगून शिवरायांना न्याय, नीती आणि धर्माचे शिक्षण दिले.*
*"शिवबा, आपल्याला कोणाची चाकरी करायची नाही, तर या दीन-दुबळ्या रयतेचे वाली व्हायचे आहे, स्वराज्य निर्माण करायचे आहे," हे विचार त्यांनी सतत शिवरायांच्या मनावर बिंबवले. शिवरायांच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवणारी पहिली ठिणगी जिजाऊच होत्या.*
*जिजाऊ केवळ एक माता नव्हत्या, तर त्या एक दूरदृष्टी असलेल्या राजकारणी आणि कुशल प्रशासक होत्या. शिवराय लहान असताना त्यांनीच जहागिरीचा कारभार पाहिला. न्यायनिवाडा कसा करावा, रयतेची काळजी कशी घ्यावी, याचे प्रत्यक्ष धडे त्यांनी शिवरायांना दिले.*
*स्वराज्याच्या उभारणीत येणाऱ्या प्रत्येक संकटात त्या शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.* *अफजलखानाचा वध असो, सिद्दी जोहरचा वेढा असो, किंवा आग्र्याहून सुटका; प्रत्येक कठीण प्रसंगात शिवरायांना योग्य सल्ला देण्याचे आणि त्यांना मानसिक बळ देण्याचे काम जिजाऊंनी केले. जेव्हा जेव्हा शिवराय मोहिमेवर जात, तेव्हा स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ समर्थपणे सांभाळत असत.*
*आज शेकडो वर्षांनंतरही जिजाऊंचे जीवन आपल्याला प्रेरणा देते. त्या केवळ शिवरायांच्या आई नाहीत, तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श आहेत की आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत. त्या एक आदर्श आहेत की संकटात न डगमगता परिस्थितीवर कशी मात करावी.*
*आज आपल्याला पुन्हा एकदा जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि समाजाप्रति बांधिलकी निर्माण करण्यासाठी प्रत्येक आईने 'जिजाऊ' होणे गरजेचे आहे.*
*छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे शिल्पकार असतील, तर राजमाता जिजाऊ या त्या स्वराज्याचा भक्कम पाया आहेत.* *पाया जेवढा मजबूत, इमारत तेवढीच बुलंद असते. हिंदवी स्वराज्याची ही बुलंद इमारत जिजाऊंच्या संस्कारांच्या आणि त्यागाच्या पायावर उभी आहे.*
*स्वराज्यजननी, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!*
*जय जिजाऊ! जय शिवराय...!*




![राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले - ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY - ShareChat राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले - ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_415656_3831d620_1769580414358_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=358_sc.jpg)








