Bhimsquadmk

22 Posts • 69K views
बाबासाहेबांचे विविध भाषणातून विचार... भाग 2 विकल्या गेलेल्या नेत्यांना ओळखायला शिका हे समाजात राहून समाजाला दिशाहीन करण्याचे काम खूप अलगत करत असतात त्यांच्या पासून सावधान रहा हे स्वतःचा फायदा करून समाजाचे आणि चळवळीचे नुकसान करत असतात... तुम्ही स्वतःच स्वतःची गुलामगिरी संपवली पाहिजे. ती नष्ट करण्यासाठी कोण्या देवावर किंवा कोण्या महापुरुषावर अजिबात विसंबुन राहू नका. लक्षात ठेवा की लोक नुसते आकडेवारीने बहुसंख्य असणे पुरेसे नाही. यश मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी लोकांनी सजग, सक्षम आणि स्वाभिमानी असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपले मार्ग स्वतःच आखले पाहिजेत आणि स्वतःच त्या मार्गावरुन चालले पाहिजे... अस्पृश्यता ही अस्पृश्यांसाठी जीवन सुधारण्याच्या सर्व प्रकारच्या संधींची दारे बंद करून टाकते. ती अस्पृश्याला समाजात मोकळेपणाने फिरण्याची संधी देत नाही, तर ती त्याला कैदेत आणि विजनवासात जगण्यास भाग पाडते; ती त्याला स्वतःला सुशिक्षित करण्यापासून व त्याच्या निवडीचा व्यवसाय करण्यापासून रोखते... अस्पृश्यतेने अस्पृश्य, हिन्दू व अंतिमतः देशाचाही विनाश केला आहे. उपेक्षित वर्गाला जर त्याचा आत्मसन्मान प्राप्त झाला तर ते केवळ स्वतःच्याच प्रगती व समृद्धीमध्ये सहभागी होतील असे नाही तर त्यांची व्यावसायिक कौशल्ये आणि निर्धारामुळे ते देशाच्या शक्ती व समृद्धीमध्ये देखील योगदान देतील. अस्पृश्यतेच्या अवमानकारक जिण्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी अस्पृश्यांना जी काही महाकाय शक्ती खर्च करावी लागते आहे, ती जर वाचवली तर तीच शक्ती त्यांनी शिक्षणाचा प्रसार आणि संपूर्ण देशातील संसाधनांचा विकास यासाठी वापरली असती.... या देशात अनेक महात्मे होऊन गेले ज्यांचे एकमेव उद्दिष्ट अस्पृश्यतेला नष्ट करून उपेक्षित वर्गाचे जिणे उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल करून घेणे हे होते, पण कुणालाही त्यांच्या कार्यात यश आले नाही. महात्मे आले आणि महात्मे गेले, परंतु अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले... जातीप्रथेचे संपूर्णतः निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून संतांच्या संघर्षाचा समाजावर काही परिणाम झालेला नाही. व्यक्तीचे मूल्य हे स्वयंभू व स्वस्थापित असते; ते त्याच्याकडे भक्तीच्या मुलाम्यामुळे येत नाही. संतांनी हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष केला नाही. याउलट, उपेक्षित वर्गावर त्यांच्या संघर्षाचा अयोग्य परिणाम झालेला आहे. यांमुळे ब्राह्मणांना अस्पृश्यांच्या तोंडावर फेकून त्यांची तोंडे बंद करायला एक तर्क मिळाला की तुम्ही जर चोखामेळा सारखे व्हाल तरच तुम्हाला आदर मिळेल नाहीतर नाही... हिंदू संहितांमधून खोडसाळपणे असा प्रचार केला गेला की उच्च वर्णीयांची सेवा करण्यातच शुद्रांची मुक्ती सामावलेली आहे. अस्पृश्यता ही गुलामगिरीचेच दुसरे नावरूप आहे. कोणताही वंश त्याचा आत्मसन्मान नष्ट करून वाढूच शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला खरोखरच अस्पृश्यांचे उत्थान करायचे असेल, तर तुम्ही सामाजिक स्तरावर त्यांना त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी मुक्त असे स्वतंत्र नागरिक म्हणूनच वागवले पाहिजे... मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💪बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙏 प्रेरणादायक बॅनर
17 likes
7 shares