⛈️सावधान! राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार 🙆🏻‍♂️

42 Posts • 153M views
Marathi Social Media
6K views 1 days ago
#⛈️सावधान! पावसाचा जोर वाढणार🙆🏻‍♂️ ✅या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट ✅एक जुलै ते आठ जुलै दरम्यान चांगला पाऊस झाला होता, या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर पावसाने तब्बल दहा दिवस दडी मारल्यामुळे पिकं संकटात आली होती, शेतकऱ्यांची चिंता वाढली होती ✅या राज्यांना पावसाचा इशारा हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू -काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि छत्तीसगड या रांज्याना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग प्रति तास 80 ते 90 किलोमीटर एवढा प्रचंड असणार आहे, त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, तसेच या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहनाही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. ✅महाराष्ट्रात काय स्थिती? महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, परंतु आता पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होत आहे. राज्यात आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या वीस जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
51 likes
55 shares