🔴आज पासून शाळांना 5 दिवस सुट्टी🥳
16 Posts • 1M views
seema
39K views
#🔴14 जानेवारीपासून शाळांना 5 दिवस सुट्टी🥳
442 likes
315 shares
#🔴शाळांना सलग 5 दिवस सुट्टी❓ Maharashtra: राज्यातील बहुतांश शाळांना या आठवड्यांमध्ये एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. असं असतानाच आता राज्यात असून एक सुट्टी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरं तर 15 तारखेला राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात मतदान पार पडत आहे. मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा भरणार नाहीत. मात्र आता अशी एक मागणी करण्यात आली आहे की ज्यामुळे 16 तारखेलाही मुलांना शाळेत पाठवावं लागणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...म्हणून 16 ला सुद्धा सुट्टी? COMMERCIAL BREAK SCROLL TO CONTINUE READING राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध विषयांसाठी सेवेवर घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी विशेष सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी केली आहे. नेमकं म्हणणं काय? मतदानाची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत असली तरी प्रत्यक्ष प्रक्रिया त्यानंतरही अनेक तास सुरूच राहते. मतदानाच्या रांगेतील शेवटच्या माणसाचे मतदान होईपर्यंत प्रक्रिया चालते. त्यानंतर ईव्हीएम मशीन सील करणे, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे, साहित्य सुरक्षितपणे मुख्य संकलन केंद्रावर जमा करणे, अहवाल सादर करणे या सर्व प्रक्रिया उशिरापर्यंत चालतात. उशिरापर्यंत काम करून लांब पल्ल्याचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नियमित कर्तव्यावर रुजू होणे त्यांच्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या ताणदायक ठरते. त्यामुळेच निवडणुकीत काम करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सशुल्क विश्रांती दिवस (सुट्टी) घोषित करावा. अशी मागणी शिक्षण विकास मंचचे समन्वयक डॉ. सूर्यवंशी यांनी केली आहे. कोणकोणत्या शहरांमध्ये मिळणार सुट्टी? महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 15 जानेवारीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी मतदान होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, आणि चंद्रपूरमध्येही याच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळेच या 29 ठिकाणी ज्या प्रमाणे मतदानाच्या दिवशी सुट्टी असणार आहे तशी दुसऱ्या दिवशीही दिली जावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सलग सुट्टीचे पाच दिवस? खरोखरच 16 तारखेला सुट्टी दिली तर अनेक शाळा 14 तारखेपासूनच बंद असतील. 14 तारखेला संक्रांतीची सुट्टी आहे. त्यानंतर 15 ला मतदान आणि 16 ला सध्याच्या मागणीनुसार सुट्टी जाहीर झाली तर शिक्षक नसल्याने आणि निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण यंत्रणांना काम संपवण्यासाठी शाळांचा परिसर वापरला जाईल. त्यानंतर 17 तारखेला शनिवार असून 18 तारखेला रविवार आहे. त्यामुळे मुलांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
107 likes
2 comments 96 shares