एक like तर बनतोच ना .. 👍

12K Posts • 27M views
🌹🌹परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिज🌹🌹 आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. भगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही. सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार ? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल ? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती. ती म्हणाली, "आपण श्रीकृष्णाला विचारू." तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला, "द्रौपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो." त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणि बाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की, "भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आत जा आणि बांगडया वाजवून नमस्कार कर." त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली, आणि बांगडया वाजवून नमस्कार केला." त्यांनी लगेच तिला "अखंड सौभाग्यवती भव" म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी. तेव्हा ते म्हणाले, "द्रौपदी, ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग." ती म्हणाली, "माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे." भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल. ‼️नामस्मरणात स्त्रीपुरूष, श्रीमंतगरीब, हे भेद नाहीत. फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
191 likes
65 shares
🌹🌹मध्यम स्थितीतली माणसे संगतीला चांगली. 🌹🌻 एका गावात चोरांची एक सभा भरली. तीत काही चोर म्हणाले की, लूट करायची ती हानी करून करावी; तर काहींचे असे म्हणणे पडले की, कुणाला उगीच मारायला नको, नुसतीच लूट करावी; पण लूट करावी असे सर्वांचेच ध्येय होते ! तसे आपले होते. एक म्हणतो, व्यवहारदृष्टया प्रपंच करावा; दुसरा म्हणतो, तसे नव्हे, योग्यअयोग्य पाहून प्रपंच करावा; तर तिसरा म्हणतो, स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा; परंतु देवाचे अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असे कुणीच म्हणत नाही ! सगळयांना प्रपंच 'हवा' आणि 'देव असला तरी चालेल.' म्हणजे प्रपंच तेवढा खरा, असे ते मानून चालतात, देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणे गातो. असा एक दारूडा गाणे गात असताना दुसरा दारूडा त्याला म्हणू लागला की, 'अरे, हे असले गाणे काय म्हणतोस ? तुला काही कळत नाही.' नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारूड्याने दुसऱ्या दारूड्याला विचारला ! त्याप्रमाणे, प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मते प्रतिपादन करावी असे घडते, आणि मग ते एकमेकांना नावे ठेवतात. आपला प्रपंचातला व्यवहार असा असतो. 'आम्हांला बंधने नकोत' असे म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर, नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालकाइतकीच सुखाची असते; उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी. पण स्वतः लबाडी करू नये; म्हणजेच, आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे. व्यवहाराच्या दृष्टीने बघितले तर मला मध्यम स्थितीतली माणसेच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात; त्यांचे पाप मध्यम, पुण्य मध्यम, आणि परमार्थदेखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळप्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावे, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकेच. ‼️नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे,अब्रुने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
68 likes
56 shares
🌹🌺संतांच्या संगतीचा परिणाम.🌺🌹 जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत्‌ होते. त्याचप्रमाणे सत्पुरूषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते, आणि पुनः तो सत्पुरूष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही; म्हणजेच, नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही, त्यांपासून परावृत्त करतो, तो संत. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संतसंगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्‍यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठायी भगवद्‌भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकारामबुवा नुसते 'विठठ्‌ल विठठ्‌ल' म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संताना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण 'सर्व ठिकाणी मीच आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आईपण जसे सगळीकडे सारखे, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो; पण त्यांचे करणे निःसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळयांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते; तसे आपण बोलावे. ‼️आपली भूमिका थोडी तयार असल्यास सत्संगतीचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
175 likes
140 shares