स्वराज
8 Posts • 68K views
४_फेब्रुवारी_१६७० 🔥"गड आला पण सिंह गेला"🔥 नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे लढता लढता धारातीर्थी पडले ते किल्ले कोंढाण्यावर भगवा फडकवूनच🚩 ४ फेब्रुवारीला संध्याकाळी तानाजीनी सर्व मावळ्यांसह राजगड सोडला व सर्वजण खिंडीत येऊन पोचले. मध्यरात्रीनंतर सारे द्रोणागिरीच्या कड्याजवळ आले, मावळ्यांना तो कडा त्याच्या खाचाखोचासहीत माहीत होता. "हर हर महादेव" चा एल्गार झाला व मराठे गनिमांवर तुटून पडले. उदयभान व तानाजी यांच्यात जोरदार युद्ध झाले, त्यात वार झेलत असताना तानाजींची ढाल तुटली व मर्मस्थानी लार बसून तानाजी धारातीर्थी पडले. तानाजीराव पडल्यावर मराठी सैन्यात चलबीचल झाली पण त्याच वेळी सुर्याजींनी मावळ्यांना धीर दिला मग त्वेषाने मराठे तुटून पडले व "शेलार मामा" नी उदयभान राठोड ला संपवला. मराठ्यांची फत्ते झाली, गड ताब्यात आला पण सिंह मात्र गेला. तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 🚩 #शिवाजी #swarajya #शिवजयंती #तानाजी मालुसरे पुण्यतिथी
7 likes
5 shares