🚩*छत्रपती शिवाजी महाराज*🚩
171 Posts • 1M views
❤🚩शिवभक्त🚩❤
1K views 14 hours ago
⛳स्वराज्यभूमी ⛳ *महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *८ मार्च इ.स.१६७०* *( फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार )* *किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-* *आग्र्याहून सुटका करून घेतल्यानंतर सुमारे तीन वर्षे महाराजांनी कोणतीही हालचाल केली नाही. मात्र १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो निळोपंत काकांनी!* *व्हय पासष्टी-सत्तरीच्या घरात पण मावळी मनगट अजूनही पोलादी असलेलं. ह्या वयातही काकांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमावर महाराज बेहद्द खुश झाले!* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१६७३* *नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩* *इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१६८९* *मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१६९४* *औरंगजेबने शहाजादा मुअज्जमचा मुलगा शहाजादा मुइजुद्दीन याला नोव्हेंबर, १६९२ त पन्हाळगडाविरुद्ध रवाना केले. शहाजादा मुइजुद्दीन याने पन्हाळ्याला वेढा घातला. पण किल्ला जिंकून घेण्याचे त्याला जमेना. ऑक्टोबर १६९३ मध्ये रामचंद्रपंत, शंकराजी आणि धनाजी जाधव हे पन्हाळगडाला मदत करण्यासाठी चालून आले. २० ऑक्टोबरपासून चकमकी सुरू होऊन त्या काही दिवस चालू राहिल्या. मराठ्यांनी किल्ल्यात रसद आणि कुमक पोहचविली. याच वर्षी बारामतीचा, मोगलांतर्फे असलेला ठाणेदार हणमंतराव निंबाळकर हे मराठ्यांना येऊन मिळाले. इ. स. १७०४ मध्ये याचा मृत्यू होईपर्यंत याने मोगलांस सळो की पळो करून सोडले. इ. स. १६९४ त पन्हाळगडचा वेढा मोगलांकडून चालूच होता. औरंगजेबाने ७ मार्च १६९४ रोजी पन्हाळ्याकरिता मोगलांना आणखी ६ हजार सैन्याची कुमक पाठविली. पण ती पोचण्यापूर्वीच शहाजादा मुइजुद्दीन हा पन्हाळा सोडून ८ मार्च १६९४ रोजी निघाला होता. हे समजल्याबरोबर औरंगजेबाने शहाजादा अज्जमचा मुलगा बेदारबख्त, यास पन्हाळ्याच्या वेढ्यासाठी पाठविले. तरीही मोगलांस पन्हाळा किल्ला काबीज करणे जमले नाही. म्हणून औरंगजेबने पन्हाळ्याचा मराठा किल्लेदार परशुराम त्रिंबक यास ३१ ऑक्टोबर १६९९त ताकीदवरपत्र लिहिले, ह्या पत्रास किल्लेदार त्रिंबक याने भीक घातली नाही. पन्हाळ्याला घातलेला मोगल वेढा चालूच राहिला. तो चालू असता धनाजी जाधवांनी बाहेरून मोगलांचा अतिशय उच्छेद केला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१७३५* *राधाबाईंनी १४ फेब्रुवारी १७३५ ला काशीविशेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या ८ मार्चला बु-हाणपूरला आल्या. त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती. शे-पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही. बुन्हाणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवासखर्चासाठी काही रक्कम, तसेच वाटेत रक्षणाकरिता २०० स्वार दिले, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रतापसूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुणचार करण्याची आलेली संधी उदेपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्याचा वंशज जगतसिंग याने वाया जाऊ दिली नाही, बाईंचा खूप आदरसत्कार केला. त्यांचे आशीर्वाद मिळवले. प्रवासासाठी रोख रक्कम, तसेच हत्ती, घोडे, सोने-नाणे देऊ केले. उदेपूरचा दिवाण बहिरदास यानेदेखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली. शाही उमरावांनीदेखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराणे, आहेर दिले, मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले. या सर्व यात्रेत बादशाहकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून, सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही. किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडदास्त ठेवण्यात आली.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१७५८* *मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले. तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलिकडे सरहिंद येथें अबदालीच्या तर्फेने अदुसमदखान बंदोबस्तास होता, त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेविले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास कापून बायकास सोडवून परत नेले. नंतर एक दिड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव, मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले. ते तारीख ८ मार्च स. १७५८ ला सरहिंद येथे पोचले. तेथे त्यांना अलाजाठची शीख फौज सामील झाली. त्यांनी सरहिंदला वेढा घातला. लढाई चालू झाली. अब्दालीचे सरदार अब्दुस्समदखान व जंगबाजखान यास जखमा लागल्या धरून आणून वस्र भूषणे देऊन आपल्यापाशी ठेविले. शहर लुटून घेतलें. श्रीमंतांनी अबदालीची दहा हजार फौज बुडविली. त्याचा सूड घेतला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *८ मार्च इ.स.१७७९* *इष्टुर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भिवराव पानसे तोफखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला.......``* *मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा ( पराक्रमी,शूर,वीर) म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो.इष्टुर शिवाय मानाजी शिंदे व कोन्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत जेम्स स्तुअर्ट ला त्याच्या पराक्रमामुळे कौतुकाने फाकडा म्हटले जाते. रणांगणात शत्रूने दाखविलेल्या पराक्रमाला दिलदारपणे दिलेली ति दाद आहे अण कि शत्रूचे कौतुक !* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩आम्ही_शिवपाईक_बारा_मावळचे🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस
33 likes
58 shares