अनेक महिला ई-केवायसीसाठी मोठी कसरत करत असल्याचे दिसते. साईट डाऊन झाल्यावर त्यांना ताटकाळत थांबावे लागते. तर डोंगराळ भागातील महिलांना रेंजसाठी उंच भागावर जावे लागत असल्याचे समोर येत आहे. त्यातच ई-केवायसी करताना पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडण्याची नवीन अट काही महिलांसाठी मोठी जाचक ठरत आहेत. त्यांना आता लाडकी बहीण योजनेला कायमचे मुकावे लागणार की काय अशी भीती सतावत आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने उपाय सांगावा अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभघेतला आहे. 1 लाख 4 हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होतील. या बहिणींचे 1500 रुपयांचे मानधन तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात 26 लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. तर काही भाऊरायांनी या योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले होते. छाननी प्रक्रिया सुरूच असल्याने अजूनही काही बहाद्दर समोर येण्याची शक्यता आहे.
काय आहे ई-केवायसी
बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार येईल. प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. सणासुदीमुळे महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
#माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण😂 #लाडकी बहीण योजना अपडेट्स #मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना