"मला खरंच फार वाईट वाटतंय. मी अंकिताला भेटले होते, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, प्रियाला भेटायला जायचं. पण अंकिता म्हणाली की शंतनू म्हणतो, 'येऊ नका', कारण तिची परिस्थिती भेटायला योग्य नव्हती, कदाचित केस गळत असतील वगैरे. तरी मी म्हटलं होतं की आपण तरी जाऊया. पण वाटलं नव्हतं ती इतक्या लवकर जाईल. असं व्हायला नको होतं. देव का असं करतो, हे समजत नाही. त्या पोरीने नुकताच संसार उभा केला होता. तिचं जायचं वय नव्हतं. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.”#marathimanoranjan
#Priyamarathe