🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१ एप्रिल १६७०
शिवराय सुरतेवर पुन्हा हल्ला करण्याची अफवा पसरली.
त्यांच्या बंदोबस्तासाठी गुजरातचा सुभेदार 'बहादूरशहा' ५००० फोजेसह सुरत मध्ये तळ ठोकून बसला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी सातारा जवळचा "परळीचा किल्ला (सज्जनगड)" जिंकला.
सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे.
या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले.
या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत.
सुरेख पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे.
मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे.
पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती
म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग.
मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला.
मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड.
औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले 'नवरसतारा'.
पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा 'सज्जनगड' म्हणून नामकरण विधी केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१ एप्रिल १७३१
"श्रीमंत सरसेनापती त्र्यंबकराव खंडेराव दाभाडे" हे
डभोईच्या युद्धात धारातिर्थी पडले.
सन १ एप्रिल १७३१ रोजी छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे बाजीराव आणि सेनापती त्रिंबकराव दाभाडे यांच्यात डभोई येथे लढाई झाली.
त्यात पेशवा बाजीरावांच्या बाजूने सैन्याच्या आघाडीला मालोजी बंडगर, जानोजी कोळेकर सरनोबत, मावजी खरात, जानोजी देवकाते व निंबाजी थोरात या कसलेल्या शूर सरदारांना आपल्या पथकानीशी उभे केले होते. या लढाईत सेनापती त्रिंबकराव दाभाडे यांचा मृत्य झाला आणि पेशवा बाजीरावानी हि लढाई जिंकली होती.
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त