🧿लाखात एक ✺ 🇷 ✺ भीमाची लेक🧿358
8K views • 4 months ago
महाड चवदार तळे सत्यग्रह हा फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर शतकानुशतक चाललेल्या त्या क्रूर जातं व्यवस्थेविरुध्दचा होता, जिथे दलितांना सार्वजनिक पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता.निसर्गाने दिलेलं पाणी सर्वांसाठी असतांना ही समाजाने त्यावर जातीची कुंपण घातली होती आणि काही लोकांनी त्यावर मक्तेदारी सांगितली होती. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे तळ्यातून पाणी पिऊन हा अन्याय थेट आव्हान दिलं. त्या ऐका घोटात फक्त तहान भगवली नाही तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क घोषित केला --आणि त्यामुळेच हा लढा मानवतेच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला. "आम्ही फक्त पाणी पिण्यासाठी तळ्याकडे जातं नाही, आम्हीही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी जातं आहोत " #२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिन...🙏 ✊
155 likes
1 comment • 309 shares