२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिन...🙏
36 Posts • 12K views
#माझी पहिली पोस्ट ✌ महाड चवदार तळे सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर शतकानुशतक चाललेल्या त्या क्रूर जात व्यवस्थेविरुद्धचा होता, जिथे दलितांना सार्वजनिक पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. निसर्गाने दिलेलं पाणी सर्वांसाठी असतानाही समाजाने त्यावर जातिची कुंपणं घातली होती आणि काही लोकांनी त्यावर मक्तेदारी सांगितली होती. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे तळ्यातून पाणी पिऊन हा अन्याय थेट आव्हान दिलं. त्या एका घोटात फक्त तहान भागवली नाही, तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क घोषित केला - आणि त्यामुळेच हा लढा मानवतेच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला. "आम्ही फक्त पाणी पिण्यासाठी तळ्याकडे जात नाही, आम्हीही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी जात आहोत." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर #महाड चवदार तळे सत्याग्रह दिवस #20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह ✊🏻️ #२० मार्च १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह दिन...🙏 #महाड