#📢मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणाला
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे २०२६ पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा कडक आमरण उपोषण सुरू केले असून, यावर नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. "मराठा आरक्षणाच्या बाबतीत आमचे सरकार सुरुवातीपासूनच अत्यंत सकारात्मक आणि पारदर्शक राहिले असून, आम्ही नेहमीच समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत," अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. मात्र, कोणतेही आरक्षण देताना ते न्यायालय, कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणारे असावे लागेल; त्याबाहेर जाऊन घेतलेले निर्णय न्यायालयात टिकत नाहीत, असे सांगत त्यांनी इतर कोणत्याही समाजावर (विशेषतः ओबीसींवर) अन्याय न करता मार्ग काढणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, भर उन्हात अन्न-पाण्याशिवाय उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांनी, "आरक्षणाच्या अंमलबजावणीला विलंब करून सरकार समाजाची अग्निपरीक्षा घेत आहे आणि आंदोलनादरम्यान माझ्या जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस आणि सरकारच जबाबदार असेल," असा थेट आणि आक्रमक इशारा दिला आहे.
#मराठा आरक्षण #मनोज जरांगे पाटील ##मनोज जरांगे पाटील# मराठा आरक्षण # एक मराठा लाख मराठा # #मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा