मायबाप छत्रपती
2K Posts • 728K views
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ८ नोव्हेंबर इ.स.१६५९ (मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १५८१ संवत्सर विकारी वार मंगळवार) अफझलखान जावळीस पोहचला ! सर्व संकटांना तोंड देऊन त्यांच्याशी अफझलखानाचे लष्कर व खासा खान जावळीला येऊन पोहचला. त्या घनदाट जंगलात पोहचताच खानाला आता जावळी आपल्या हाती आलीच असे वाटू लागले . तर चाहु बाजुंनी डोंगरांनी वेढली गेलेली जावळी पाहताच खानाच्या सैन्याची छाती दडपून गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुमारे एक कोसावर पारगावनजीक कोयनेच्या काठी पाण्याची सोय पाहुन खानानी छावणी ठोकली. जावळीचा परिसर खानाच्या फौज फाट्यामुळे गजबजून गेला. जावळीला पोहोचताच खानाचे वकील प्रतापगडावर गेले व त्याने रितसर खान आपल्या म्हणण्यानुसार जावळीस आला असल्याची बातमी महाराजांना दिली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ नोव्हेंबर इ.स.१६७५ भाई मतिदासांचा अमानुष वध! शके १५९७ च्या मार्गशीर्ष शु.१ रोजी तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतीने कापून वध करण्यात आला. या वेळी दिल्लीस मोगलांचा शेवटचा पराक्रमी आणि जुलमी बादशहा औरंगजेब राज्य करीत होता. हा बादशहा मोठा धर्मांध आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात, कपटविद्या, हृदयहीनता, इत्यादि दुर्गुणांचा सांठाच त्याच्याजवळ होता. याच्या राक्षसी धर्मप्रेमांत अनेक अपराधी, निरपराधी लोकांची आहुति पडत असे. शेंकडों माणसे हालअपेष्टा भोगीत दिवस कंठीत असत. शीखांचे गुरु तेगबहादूर यांनी मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाही, म्हणून त्यांना कैदेत पडावे लागले. अनेक अनुयायी त्यांचाच मार्ग चालत होते. गुरुहतेग बहादुराच्या अनेक शिष्यांना प्राणदंडहि सोसावा लागत होता. मार्गशीर्ष शु. १ रोजी घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक अशीच आहे. धर्मासाठी प्राण देणाऱ्या हुतात्म्यांच्या इतिहासांत हा प्रसंग आपल्या तेजाने सदैव तळपत राहील असाच आहे. तेग बहादुराबरोबर ‘मतिदास' नावाचे त्यांचे शिष्य दिल्लीस कैतच होते. त्यांच्या वधाचे फर्मान बादशहाकडून निघाले! “ऐन मध्यान्हींच्या सुमारास करवतीने इंच इंच याप्रमाणे डोक्यापासून त्यांना चरचरां कापण्यांत आले. असे कापले जात असतां प्रतिक्षणी त्यांना 'अजून तरी मुसलमान होतोस काय?' असे विचारण्यात येत असे. व प्रत्येक वेळी ते धीरोदात्तपणे 'नाही' असे उत्तर देत असत. नुसते वर्णन वाचूनहि अंगावर शहारे येण्यासारख्या या अनन्वित वेदनांत मतिदासजीनी नुसता सुस्कारा देखील सोडला नाही. अखेरीस तिळातिळा येवढया कापलेल्या मतिदासजीच्या रक्ताचा सडा दिल्लीच्या चांदणी चौकांत पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदु म्हणूनच परलोकास गेला." शीखांचा सर्वच इतिहास अशा स्फूर्तिदायक आणि उदात्त घटनांनी भरलेला आहे. मतिदासांच्या वधानंतर तीनचार दिवसांतच गुरु तेगबहादुर यांचा वध झाला. मतिदासीप्रमाणेच तेग बहादुरांनीहि अलौकिक धैर्य दाखविले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ नोव्हेंबर १६८१ मराठा फौजेने इंग्रजांच्या धरणगाव वखारीतील दारूगोळा रातोरात गायब केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ८ नोव्हेंबर १८०५ आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरांचा (भांगरे) जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कमोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀ #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #वेड इतिहासाचे #मायबाप छत्रपती
40 likes
35 shares
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 २ नोव्हेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी तंजावर चे ठाणे जिंकले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 २ नोव्हेंबर १६८३ पोर्तुगीजांनी गोव्याच्या किल्ले फोंडा वर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. "किल्लेदार त्र्यंबकजी इंगळे" यांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले, आणि आज त्यांच्या मदतीला दस्तुरखुद "छत्रपती संभाजीराजे" ८०० घोडेस्वार आणि मोठे पायदळ घेऊन किल्ले फोंडामध्ये दाखल झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #वेड इतिहासाचे #मायबाप छत्रपती https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 📜 २ नोव्हेंबर इ.स.१६८९ राजाराम महाराज जिंजीस नोव्हेंबर १६८९ त आले आणि त्यांनी जिंजीचा कारभार हाती घेतला. त्यांनी जिंजीस मराठ्यांची कर्नाटकांतील राजधानी निर्माण केली. कर वसूल करणे, नव्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, ठाणी व किल्ले यांचा बंदोबस्त राखणे, नवे लष्कर उभारणे, मोगलांशी लढण्यासाठी कर्नाटकांतील हिंदू नायकांचे सहकार्य मिळविणे आणि राज्यकारभार आणि मोगलांशी युद्ध करण्यासाठी पैसा मिळविणे यासारखी कार्ये आता जिंजीमध्ये सुरू झाली. राजाराम महाराजांजवळ द्रव्यसंग्रह नव्हता. गिरजोजी यादवाने महाराष्ट्रातून बोचके बांधून बरोबर आणलेले जडजवाहीर अडीच लाखांचे होते. शिवाय हरजी राजे महाडीक ह्यांच्या पत्नीने नवऱ्याचा व तिचा धनसंचय होता तोही तिने राजाराम महाराजांस दिला. जिंजीच्या अधिकाऱ्यांनी व लष्कराने राजाराम महाराजांची हुकूमत मानली. जिंजीस मराठी राज्याचा कारभार चालू झाला. पण पैशाशिवाय फौज उभी राहणार नाही. तेव्हा महाराजांस मोठी अडचण पडली ती पैशांची. अडचण निवारण्याचे उद्योग राजाराम महाराजांस जिंजीस सांभाळून आणणारे प्रल्हादपंत यांनी केले. कर्नाटकातील राजे, पाळेगार वगैरेना मुघली राजवट नको होती. कारण मोगल बादशहाच्या हुकूमाने मुसलमान लोक हिंदूची मंदिरे पाडू लागले ते त्यांना नको होते. त्यांनी राजाराम महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास सुरुवातीस भरघोस पाठिंबा दिला. परंतु द्रव्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक भासू लागली. मार्टीनच्या रोजनिशीत खालीलप्रमाणे प्रयत्न करून द्रव्य मिळविण्याच्या नोंदी सापडतात. द्रव्य मिळविण्यासाठी राजाराम महाराजांच्या प्रधान मंडळाने अनेक प्रयत्न केले. जिंजीत आल्यावर एक हुकूम काढून सर्व नोकर-चाकरांस व सरदारांस, पाळेगारांना फर्माविले की, त्यांनी राजाराम महाराजांचे दर्शन घ्यावे व दर्शनाच्यावेळी राजाच्या चरणी मोठा नजराणा ठेवावा. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ संताजी भोसले यांनी राजाराम महाराजांस एक हजार पगोडे नजर केले. फ्रेंच आणि डच यांनी प्रत्येकी चौदाशे पगोड्यांचा ऐवज नजराणा म्हणून दिला. इंग्रजांनी मात्र ६०० पगोडे किमतीचा नजराणा दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ नोव्हेंबर इ.स.१७६३ मराठे आणि निजाम यांच्यामधल्या राक्षसभुवन येथील लढाईवरुन पेशवे माधवराव यांचे पुण्यात आगमन. निजामशाहीत त्याचे वर्चस्व वाढू नये म्हणून व त्याच वेळी निजामशाहीत चंचूप्रवेश करणार्‍या फ्रेंचांचे वर्चस्व कमी करण्यासाठी बाळाजीने शक्य तेवढी खटपट केलेली दिसते. सिंदखेड येथे मराठे व निजाम अलीचे युद्ध होऊन निजामाच्या पराभवाने मराठ्यांना २५ लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळाला. यावेळी निजाम अली व फ्रेंच सेनापती यांच्यात वितुष्ट येऊन त्याचे पुन्हा एकदा हत्याकांडात रूपांतर झालेले दिसते; पण यानंतर फ्रेंच सेनापती निजामाच्या राजकारणातून कायमचा बाहेर पडला. इ.स.१७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने काढलेल्या मोहिमेत निजामाचा उद्‍गीरच्या लढाईत पराभव होऊन मराठ्यांना अंबड, फुलमडी, नांदेड इ. साठ लाखांचा प्रदेश आणि अशेरी, मुल्हेर, दौलताबाद हे किल्ले आणि बर्‍हाणपूर, विजापूर एवढे प्रदेश मिळाले. तसेच निजाम अलीने एलिचपूर येथे व सलाबतजंगाने हैदराबादेस रहावे असे ठरले. यानंतर पानिपतचा पराभव व नानासाहेबांचा मृत्यू या घटना घडल्या. मराठेशाहीची धुरा माधवराव पेशव्याच्या खांद्यावर आली. या काळातील निजाम अलीची पुण्यावर चढाई ( १७६१ ) , त्याची राघोबाशी हातमिळवणी व माधवराव पेशव्यांची लढाई, पुण्याची जाळपोळ व त्यानंतर उभयपक्षांच्या चढाओढीची राक्षसभुवनाच्या लढाईत झालेली परिणिती अशा परस्परविरोधी घटना घडल्या. राक्षसभुवनाच्या ( १७६३ ) तहाने पानिपतचे अपयश काहीसे धुऊन निघाले आणि १७५१ – ६० मध्ये मिळविलेला निजामी राज्याचा मुलुख परत मिळाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ नोव्हेंबर इ.स.१७८२ इ.स.१७८१ साली वाडीकर सावंत आणि कोल्हापूरचे छत्रपती यांचे संबंध बिघडताच पोर्तुगिजांना आपले घोडे पुढे दामटण्यास संधी मिळाली. खेम सावंत तीसरा याने कोल्हापुरच्या छत्रपतिंशी लढण्याकरिता पोर्तुगिजांकडे सैन्याची आणि दारुगोळ्यांची मदत मागितली. या मागणीनुसार पोर्तुगिजांनी सावंतांच्या मदतीस सैन्य रवाना केले. परंतु ह्या सैन्याने सावंतांना मदत करण्याऐवजी डिचोलीस जाऊन तेथील किल्ल्यावर हल्ला करून तो घेतला. डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळी वर चाल केली. सावंतांच्या सैन्याने पोर्तुगिजांचा तीव्रपणे प्रतिकार केला. अखेर १४ तासांच्या प्रतिकारानंतर साखळीचा कोट पडला. यावेळी वाडीकर सावंत आणि कोल्हापूरचे छत्रपती यांच्यात युद्ध चालू असल्याने सावंतांना पोर्तुगिजांचा समाचार घेता आला नाही. परंतु १ वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दि. २ नोव्हेंबर इ.स.१७८२या दिवशी साखळीचा कोटास वेढा घातला. कोट पडला, परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्याने तो फिरून काबीज केला. साखळीच्या कोटास वेढा घातला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 २ नोव्हेंबर इ.स.१७८४ अफ्रासिवाबखानाने मीरबक्षी पद ऑक्टोबर १७८३ च्या सुरवातीस स्विकारले आणि पुढील वर्षी बरोबर तेरा महिन्यांनी २ नोव्हेंबर १७८४ रोजी त्याचा खून झाला, ह्या काळात बादशाही राज्यकारभाराची स्थिती न सुधारता ती अधिक खालावली. म्हणून महादजी शिंद्यास दिल्लीचा कारभार हाती घेणे भाग पडले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
87 likes
101 shares
🚩 _*प्रेरणास्थान*_ 🚩 ♈ _*बुद्धिमत्ता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेऊन पोहोचविते तेथे किती काळ टिकून रहायचे हे मात्र तुमचे वर्तन ठरवित असते.*_🦁❣️ *_दैवत_छत्रपती_शिवशंभु_* ⛳ #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #📜इतिहास शिवरायांचा #वेड इतिहासाचे #मायबाप छत्रपती
1991 likes
41 comments 1459 shares