Failed to fetch language order
📢नागपूर अपडेट👉
648 Posts • 1M views
ShareChatUser
713 views 2 days ago
_छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान_ *वडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन* ▪️नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण चाकुरः-छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी विविध शासकीय योजना मंजुरी प्रमाणपत्रे, दाखल्यांचे वाटप करण्यात आले. रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, पंचायत समिती सदस्य मिरावती कसबे, गजानन होनराव, भुजंगराव शिंदे, वडवळ नागनाथचे सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांच्यासह वडवळ नागनाथ महसूल मंडळातील सरपंच व नागरिक यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरामुळे एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा, योजनांचा लाभ मिळत आहे. महसूल विभागामार्फत पांदण रस्ते, शेत रस्त्याची कामे केली जात आहेत. यासाठी सुटसुटी धोरण तयार करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक दाखले वाटपाची कार्यवाही गतिमान करण्यात आली असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून शेती आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी यामध्ये भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा महसूल मंडळात एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी प्रास्ताविक केले. महसूल विभागाच्या योजना, सेवांची माहिती व लाभ देण्यासोबतच इतरही शासकीय विभागांच्या योजनांची माहिती समाधान शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या शिबिरात महसूल विभागाच्या जवळपास पंधरा सेवा देण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका, आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, महिला व बालविकास विभागामार्फत बेबी कीटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांच्या गटासाठी अनुदान धनादेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमामध्ये विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरानिमित्त उभारण्यात आलेल्या स्टॉल्सला सहकार मंत्री श्री. पाटील यांनी भेट देवून उपलब्ध सेवांची माहिती घेतली. #📝मराठवाडा अपडेट्स
11 likes
20 shares
Devendra Fadnavis
700 views 7 days ago
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नी रंजनाताई कवाडे यांचे नुकतेच निधन झाले. आज नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत रंजनाताई कवाडे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #नागपूर
9 likes
7 shares
ShareChatUser
747 views 13 days ago
चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाची हजेरी यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान ! चाकूरः-चाकूर परिसरात वादळी वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत तसेच या अवकाळी पावसामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील वीजही गुल झाली होती.रविवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ही संध्याकाळी उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.तसेच सोमवारी दिंनाक २३ फेब्रुवारीला शहरात आणि परिसरात सांयकाळी साडे चार-पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे व प्रचंड वाऱ्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच वैरणीचेही नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील शेतातील ज्वारी,गहू ,हरभरा सह आंबा,द्राक्षे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कांही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक काढून ठेवले होते मात्र अवकाळी पावसामुळे गहू भिजला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.चाकूर शहरातील विठ्ठल डाके,पंडित मोरे सह इतर शेतकरी यांचे रब्बी हंगामातील पीक पावसामुळे खराब झाले आहे.तसेच डोंगरज ,शेळगाव शेत शिवारात ही वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घरणी,गांजुर शेत शिवारातही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.घरणी येथील रब्बीची ज्वारी जमीनदोस्त झाली आहे तसेच शिरीष आणि आकाश शिंदे यांच्या सह इतर शेतकऱ्यांचे कापुन ठेवलेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गांजुर गावात तसेच शेतशिवारात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतातील रब्बी हंगामातील पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.एकंदरीत तालुक्यातील अनेक गावातील शेतशिवारात रब्बी हंगामातील पिके अवकाळी पावसामुळे बाधित झाली आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. #📝मराठवाडा अपडेट्स
12 likes
10 shares