शेतीविषयक योजना थेट शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचती करणार-एन.आर पाटील यांचा निर्धार!
चाकूरः-
ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार,तसेच ग्रामविकास यासाठी प्रयत्नशील राहणार,शेती विकास,आरोग्य,रस्ते आणि रोजगारासाठीचा अजेंडा तसेच थेट आश्वासन ,गाव बदलण्यासाठी नियोजन करणार आणि तक्रारी नव्हे तर तोडगा काढणार असे प्रतिपादन नागनाथ रामराव पाटील (एन.आर.) हे कॉर्नर बैठकातुन करीत आहेत.
जानवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, काँग्रेस आघाडीकडून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नागनाथ रामराव पाटील (एन.आर.) हे निवडणूक रिंगणात आहेत. य गटात काँग्रेस आघाडीकडून मतदारसंघात जोरदार संपर्क मोहीम सुरू केली आहे.
शेती,जलसिंचन, आरोग्य, शिक्षण, रस्ते ,पाणी, महिला बालकल्याण व गावाच्या सर्वांगीण विकासा संबंधित अशा अनेक जनहिताच्या योजना जनते पर्यंत पोहोचती करणार.जिल्हा परिषद म्हणजे जनतेच्या विकासाचे केंद्र आहे. अशा महत्त्वपूर्ण जागी आपला विश्वासू ,कर्तबगार, नि:स्वार्थी, सतत काम करणारा, प्रशासनावर पकड असणारा आणि अनुभवी माणूस पदस्थ करणे महत्वाचे असते.या सर्व बाबतीत उत्कृष्टपणे काम करण्याची शंभर टक्के खात्री फक्त नागनाथ रामराव पाटील (एन आर पाटील) यांचीच आहे. कारण एन आर पाटील यांच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला तर खात्री पटते .अनेकांना त्यांनी लग्नकार्यासाठी ,मुलाच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी, शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी तात्काळ लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक सहकार्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांना ऊस कारखान्यावर नेण्यासाठी कितीतरी वणवण फिरावे लागते पण एन आर पाटील यांच्याकडे गेलेला कोणीही शेतकरी आनंदी होऊनच परतला आहे. एवढेच नाही तर कारखाना शेतकऱ्यांकडून देयक कर्ज वजा करून उसाचे बिल देत असेल आणि कोणास हे अडचणीचे होत असेल तर अशा प्रसंगी संबंधीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे परोपकारी काम केले आहे. एन आर पाटील यांचे वैशिष्ट्ये हे कसल्याही प्रकारे भेदभाव करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. ते एक निर्मळ भावनेने केवळ समाजसेवा म्हणून आपले कार्य निरंतर चालू ठेवतात.त्यांची सामान्य लोकांत " कामाचा माणूस" म्हणून ओळख आहे. एन आर पाटील यांना मत म्हणजेच विकासाला व अडचणीत धावून येणारांस मत आहे. अशा विविध लोकहितार्थ पैलूंचा निकष इतर उमेदवारास लावून बघितला तर शेवटी एकमेव एन.आर.पाटील हेच योग्य असल्याचे दिसून
#📝मराठवाडा अपडेट्स