जन्म: 1 ऑगस्ट 1920, वाटेगाव (सांगली) • स्मृती: 18 जुलै 1969 • फक्त दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ, पण त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 लोकनाट्ये, असंख्य कथा, पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. 'फकिरा' ही त्यांची गाजलेली कादंबरी. • ते एक थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लोकशाहीर आणि कष्टकरी, वंचितांच्या वेदनांना शब्द देणारे लेखक होते. त्यांच्या लेखणीत एक कंदील, एक पेन आणि जनतेचा लढा होता -🌹🖋️📝
#लोक शाहिर अण्णाभाऊ साठे स्मृती दिन