ShareChat
click to see wallet page

*१०१ शिवस्मारकांची भव्य यात्रा* राज्यभर शिवजयंतीची जोरदार तयारी सुरु असून छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान कडून १०१ शिवस्मारकांची भव्य यात्रा काढली जात आहे. आज हि यात्रा लातूर व धाराशिव येथे आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सुरु झालेली हि शिवस्मारक यात्रा जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अंबाजोगाई मार्गे जाऊन उद्या माजलगाव येथे समारोप होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळराजे आवारे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांची एकूण ४०० पुतळे उभे केले आहेत. परंतु शिवाजी महाराजांच्याच भूमीत त्यांचेच पुतळे उभा केल्याबद्दल फडणवीस सरकारने त्यांच्यावर १६० गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात या यात्रेचे उत्साहात स्वागत केले जात आहे. आजच्या राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवविचारांची गरज असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेचा समारोप झाल्यानंतर राज्यातील १०१ गावांत हि शिवस्मारके रूबाबात उभी राहणार आहेत... #19

569 ने देखा