ShareChat
click to see wallet page

राज्यातील कामगार वर्गासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्य कामगार विभागाने कामगार कायद्यांमध्ये क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, 👉 आठवड्यात ४८ तास काम पूर्ण केल्यास उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, 📌 कामगारांनी जर ४८ तासांचं काम तीन किंवा चार दिवसांत पूर्ण केलं, 📌 तर त्यांना पुढील चार किंवा तीन दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे. हा निर्णय लागू झाल्यास, ✔️ कामगारांचा work-life balance सुधारणार ✔️ मानसिक आणि शारीरिक ताण कमी होणार ✔️ खासगी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठा बदल घडणार यासोबतच, ❗ मालकाने वेळेत पगार दिला नाही तर ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. #कायदा #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #सरकारी नियम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰

1.1K ने देखा