छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे थोर योद्धा म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. कोंढाणा किल्ला (आजचा सिंहगड) मुघलांच्या ताब्यात होता, तो जिंकण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपवली. तानाजींच्या मुलाचे लग्न ठरलेले असतानाही त्यांनी “आधी स्वराज्य, नंतर संसार” असे म्हणत मोहिम स्वीकारली.च्या रात्री तानाजी आपल्या मावळ्यांसह कोंढाण्यावर चढाईस निघाले. किल्ल्याची उंच कातळ भिंत पार करण्यासाठी त्यांनी यशवंत नावाच्या गोर पडाचा उपयोग केला. भीषण युद्धात तानाजींनी शत्रूंशी पराक्रमाने लढा दिला, पण अखेरीस ते वीरमरणाला प्राप्त झाले. तानाजींच्या बलिदानामुळे कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. ही वार्ता ऐकून छत्रपती शिवाजी महाराज भावुक होऊन म्हणाले — “गड आला, पण सिंह गेला!” तेव्हापासून कोंढाणा किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. नरवीर तानाजी मालुसरे यांचे बलिदान मराठी इतिहासात सदैव अजरामर राहील. 🙏⚔️ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #🚩🙏👑सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे.👑🙏🚩. #नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी

5K views • 6 months ago
00:00
00:57

#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा

4K views • 4 days ago
00:00
00:28