आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस #गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेचा - आपल्या गुरुंप्रती प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण जीवनात काही तरी करतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. त्यामुळे व्यासमुनींना आठवले पाहिजे.
ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. शास्त्रात त्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे कथन आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.
व्यासांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असे देखील म्हणतात. तसेच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात.
*स्मरण करूया* : आपली सर्वांची सर्वात पहिली गुरु म्हणजे आई. त्यानंतर वेळोवेळी योग्य ती शिकवण देणारे वडील, शिक्षक हे देखील आपले गुरु आहेत. मग आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरुंची गाठ पडत जाते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, “ हे ज्ञान मिळायच्या आधी आपण कुठे होतो? आता कुठे आहे? पूर्वी या ज्ञानाशिवाय आपण कुठे होता? यातला फरक लक्षात आला की कृतज्ञता भाव येतो.
🤝 यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना काहीही भेटवस्तू दिली तरी खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्षात आचरणात आणणे ही आहे. #🙏गुरु महिमा😇 #🙏🏻गुरुपोर्णिमा स्पेशल😍 #🙏🏻गुरुपोर्णिमा स्टेटस📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿