#⛈️'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार🌪️ भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
२२ ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहणार आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि स्वच्छ राहील, तसेच थंडीचा प्रारंभिक प्रभाव जाणवू शकतो. हवामान विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सतर्क राहावे.