ShareChat
click to see wallet page

प्राचीन काळात गावाचं रक्षण करताना,युद्धात किंवा लोकांना वाचवताना जे योद्धे वीरमरण पावले, त्यांच्या स्मरणार्थ गावकऱ्यांनी वीरगळ उभारल्या.त्या काळी असा विश्वास होता की 👉 गावासाठी प्राण देणारा वीर मृत्यूनंतरही गावाचं रक्षण करत राहतो.म्हणून लोकांनी त्या वीराला ग्रामरक्षक मानलं आणि काळानुसार वीरगळ देवासारखी पूजली जाऊ लागली.आजही अनेक ठिकाणी वीरगळला हळद-कुंकू लावतात, फुले अर्पण करतात आणि सण-जत्रांमध्ये पूजा केली जाते. कारण लोकांच्या श्रद्धेनुसार ही फक्त दगडाची शिळा नसून एका वीराच्या बलिदानाची जिवंत आठवण आहे. ⚔️ परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर, या वीरगळ युद्धात मरण पावलेल्या वीरांचा इतिहास पिढ्यान् पिढ्या जतन राहावा म्हणून उभारल्या गेल्या. वीरगळांचे अनेक प्रकार आजही महाराष्ट्रभर आढळतात. #virgal #sahyadrichi_bhatkanti #viral #trending #maharashtraforts🚩#somvar #today #viral #fort #निसर्ग #मावळ #ट्रेकिंग #मित्रमंडळ

681 जणांनी पाहिले
12 दिवसांपूर्वी