ShareChat
click to see wallet page

#😱जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार, 6 जणांची हत्या #🔪क्राईम अपडेट्स😎 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #क्राईम #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲 *सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर (ता. चडचण) येथे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण सामूहिक हत्याकांडाने अवघा चडचण तालुका बरोबरच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत सहाजणांचा निघृण खून केला. या घटनेमुळे सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वादातून हा रक्तरंजित हल्ला घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या थरारक हल्ल्यात धोंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, राहुल उर्फ रेवणसिद्ध निराळे, समर्थ शिवपुत्र निराळे, शब्बीर अत्तार अशी या सहा जाणांची नावे आहेत. सर्वांचा मृत्यू घट्नास्थळीच झाल्याचे सांगण्यात येत आहे.

6.4K जणांनी पाहिले
7 तासांपूर्वी