व्यथा ह्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात
डोळ्यातून ओघळतात तर कुणाच्या हसण्यात दडतात
कुणी शांतपणे सहन करतो, कुणी शब्दांत मांडतो
तर कुणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवतो
पण जेव्हा या सगळ्या व्यथा एकमेकांत गुंफल्या जातात
त्या कथेत कुणी नायक, कुणी खलनायक नसतो
फक्त माणूस असतो आणि असतात त्या त्याच्या भावना
त्या कथेत दु:खही असतं, आशाही असते
तुटलेपणही असतं, जोडले जाण्याची चाहूलही असते
कारण प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते
प्रत्येक जखम नवीन अर्थ देऊन जाते
भावना मात्र सारख्याच असतात आणि म्हणूनच
प्रत्येकाची कथा कुठेतरी आपलीच व्यथा वाटत असते…
***आबा पेडणेकर*** #🙂Positive Thought #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🙏प्रेरणादायक / सुविचार #😊Feeling happy