#✊🏻अभिजीत दीपके: आंदोलन संपणार नाही🔴
हे सरकार आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही.
बीजेपीचं म्हणणं असेल की सोनम वांगचुक यांचं आंदोलन चुकीचं आहे, तर त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार नाही का?
आज आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जने अनेकांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. मतभेदांना संवादाने उत्तर देण्याऐवजी लाठीचार्ज केला जात असेल, तर सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
लोकशाहीत सरकारवर टीका करणे, प्रश्न विचारणे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. सत्तेचा वापर लोकांचा आवाज दाबण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी व्हायला हवा.
लोकशाही टिकते ती संवाद, संयम आणि संविधानाच्या मूल्यांवर; दडपशाहीवर नाही. 🙏🏻🇮🇳
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #📲व्हायरल व्हिडिओ #🔺भाजपा