#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 ५ ऑगस्ट १६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील "खोपडे देशमुख" हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच "खोपडे देशमुख" घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला. 🚩 ५ ऑगस्ट १६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. 🚩 ५ ऑगस्ट १६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले. रणझुंजार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मानाचा मुजरा.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती