कधीकाळी मराठा साम्राज्याच्या सागरी आणि सामरिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलावळ खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेला भरतगड आज दुर्लक्ष,अतिक्रमण आणि निष्काळजीपणाच्या विळख्यात सापडला आहे ही केवळ एका गडाची शोकांतिका नसून आपल्या इतिहासाच्या होत चाललेल्या ऱ्हासाची वेदनादायक कहाणी आहे.ज्या तटबंदीवरून कधीकाळी स्वराज्याच्या रक्षणासाठी नजर ठेवली जात होती, जिथे रणशिंगांचे आवाज घुमत होते,त्या तटबंदीच्या आत आज आंबा आणि काजूची लागवड करण्यात आली आहे.गडावरील प्राचीन वास्तूंचे अवशेष, दगडी बांधकाम, इतिहासाच्या असंख्य खुणा या झाडांच्या मुळांखाली दबल्या जात आहेत. प्रत्येक वर्षागणिक गडाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले आहे आणि इतिहासाची पाने अक्षरश मातीखाली गाडली जात आहेत.भरतगड हा फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर तो मराठ्यांच्या पराक्रमाचा, सागरी सामर्थ्याचा आणि स्वाभिमानाचा साक्षीदार आहे.पण दुर्दैवाने आज त्याच गडाकडे प्रशासन, पुरातत्व विभाग आणि समाज या तिन्ही स्तरांवरून गंभीरपणे पाहिले जात नाही. अतिक्रमण इतक्या वेगाने वाढत आहे की पुढील काही वर्षांत हा गड पूर्णपणे नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे.इतिहास जपण्याच्या गप्पा आपण नेहमी मारतो, पण प्रत्यक्षात इतिहासाची स्मारके वाचवण्यासाठी किती जण पुढे येतात? आज गरज आहे ती फक्त सोशल मीडियावर पोस्ट करण्याची नाही,तर गडसंवर्धनासाठी आवाज उठवण्याची, प्रशासनाला जागं करण्याची आणि पुढच्या पिढीसाठी हा वारसा जतन करण्याची.जर आज आपण जागे झालो नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला इथे कधीकाळी भरतगड नावाचा गड होता एवढंच सांगावं लागेल आणि तो दिवस आपल्या इतिहासासाठी सर्वात मोठं दुर्दैव ठरेल. इतिहास जपला तरच पुढच्या पिढीला स्वराज्याची ओळख जिवंत राहील…⛳️#jay 🚩maharshtra 🚩 #morning #history #today #viral

6K views • 2 months ago
00:00
00:22

#💝 शायराना इश्क़ #💔 हार्ट ब्रेक स्टेटस ##️⃣DilShayarana💘 #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #moj_content

1M views • 9 days ago • Made with AI
00:00
01:47