*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*"चिंती परा ते येई घरा"*
प्रत्येक मनुष्याला मनापासून वाटत असते की, भगवंताने आपल्यास सुख द्यावे किंवा आपण मागीतलेले सर्व संकल्प पूर्ण व्हावेत. ज्ञानेश्वर माऊली सुध्दा देवाजवळ मागणे मागतात-
*"जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात।"*
वास्तविक आपण देवाजवळ लडीवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी योजना ईश्वराने आपल्या जीवनात केलेली आहे. परंतु मनुष्यप्राणी हा नेमके हे विसरतो की माणसाला अंतर्मन व बहिर्मन अशी दोन मने आहेत. बहिर्मन हे समुद्राच्या लाटेप्रमाणे असते तर अंतर्मन हे सागरासारखे असते. माणसाच्या बहिर्मनात जे विचार घोळत असतात तेच आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. म्हणून माणसाने जीवनात जगतेवेळी आपण कोणते घ्यावे व कोणते न घ्यावे ते पहिले लक्षात घेतले पाहिजे. *"महत्वाचे सर्वात प्रथम बहिर्मनात चांगले विचार ग्रहण किंवा आत्मसात करण्यास शिकले पाहिजे."*
*_पण माणूस काय करतो नेमका जे ऐकू नये ते ऐकतो अन जे खाऊ नये ते खातो. जे पिऊ नये ते पितो व जीवनाची पूर्ण वाताहात करून घेतो._*
अंतर्मन ही जमीन आहे व बहिर्मन हा शेतकरी आहे. आता शेतीमध्ये कोणते पीक घ्यावयाचे आहे ते शेतकरी ठरवितो, जमीन ठरवत नाही. त्याप्रमाणे जमिनीचे कार्य फक्त तुम्ही जे पेरले त्याचे दाम दुप्पट देणे हे असते, म्हणून बहिर्मनाने जर गाजर गवत पेरायचे ठरवले तर अंतर्मन तेच पीक दुप्पट भरपूर देणार. बहिर्मनाने जर गहू पेरला किंवा ऊस लागवड केली तर तेच पीक भरघोस येणार कारण बहिर्मनामार्फत बाह्य जगातील विचार अंतर्मनात येतात व अंतर्मनात रूजतात परिपक्व होतात व तसेच जीवनात साकार होतात. *"म्हणून माणसाची दृष्टी स्वच्छ असावी."*
जगातील सर्व वस्तू जगास आनंद देतात. सूर्य प्रकाश देतो, वृक्ष छाया देतात, फळे देतात मग मानवाने जगास दुःख का द्यावे, *'चिंती परा ते येई घरा'।* म्हणून नेहमी माणसाने दुसऱ्याच चांगले चिंतण्यास शिकले पाहिजे.
असे म्हणतात-की
*मना त्वाचिरे पूर्व संचित केले।*
*तया सारिखे भोगणे प्राप्त झाले।।*
आपल्या कर्मातून नशिब साकार होते हे पूर्ण कळल्याने तो सावध वागतो. बेसावध वागत नाही. यापुढे तरी मी सत्कर्मेच करीन. दुष्कर्मे करणार नाही असा निश्चय करतो. यामुळे तो माणूस सुखी व शांत होतो व त्याचे जीवन प्रगतीकडे वाटचाल करते.
माणूस दुःख आले की त्याचा संबंध अन्यत्र जोडतो व अंधश्रध्देकडे झुकतो. योग्य डाॅक्टर न मिळाल्याने तो माणूस भरकटतो त्यामुळे मनाने कमजोर बनते व त्यास जास्त हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते.
ज्याला मनावर विजय प्राप्त करावयाचा आहे त्यांनी योग्य सदगुरूंना, गुरुंना, अनन्यभावे शरण गेले पाहिजे. त्यांच्या संगतीत गेल्याने आपले षडविकार कमी होतात. दृश्य जगताबद्दलची आसक्ती कमी होते. आपला अहंकार लयास जातो. भगवंतावर आपले प्रेम कसे दृढ होईल हे सदगुरू शिकवितात. *'नामस्मरणाने जळती अवघ्या पापराशी'* हे गुरूंच्या चरणसेवेत असतानाच साधकाला उमगते. म्हणूनच संतांनी म्हटले आहे. *"संतांचा सांगाती मनोमार्गगती"*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवारी आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ