महानूभाव पंथ

2K Posts • 5M views
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* अक्षय तृतीयेला लामाईसाच्या क्रियेचा स्वीकार (१६८ उत्तरार्ध) एके दिवशी अक्षय तृतीयेचा अक्षय तृतीया आली लखाबाईसाने सर्वज्ञांना विनंती केली "जी जी मी सर्वज्ञच्या ठिकाणी अक्षय तृतीया करीन" सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली "करा" म्हणून सांगितले. तिने उपाहार तयार केला. सर्वज्ञांना तेल, उठणे लावून अंघोळ घातली पूजा अवसर केला. मग ताट केले‌. सर्वज्ञांचे जेवण झाले. गुळुणा केला. पानाचा विडा‌ घेतला. सर्वज्ञांना घागरीत काही वेगवेगळे पदार्थ भरून दिले ते पाहून लाहामाइसा दुःख करू लागली. "ही लखुबाईसा दैवा भाग्याची हिने सर्वज्ञाच्या ठाई अक्षयतृतीया केली. मी निर्दैवी माझ्याजवळ काहीच नाही. "सर्वज्ञांनी लामाईसाला विचारले "बाई हिने आमच्या ठायी अक्षयतृतीया केली तुम्ही का करत नाही?" "जी जी मज जवळ तर काहीच नाही"मग सर्वज्ञांनी सांगितले "ही घागर घेऊन जा आतबाहेर धुवा. खोल पाण्यात बुडवुन भरा व आम्हाला द्या मग आम्ही तुमची अक्षयतृतीया संपूर्ण चरितार्थ करू" तिने म्हटले "हो जी" मग घागर घेऊन गंगेला गेली. आत बाहेर घासून स्वच्छ धुतली मग खोल पाण्यात बुडवुन भरून आणली व सर्वज्ञांना समर्पित केली. सर्वज्ञांनी त्या क्रियेचा स्वीकार केला व म्हटले. "बाई आम्ही तुमची अक्षय तृतीया संपूर्ण चरित्रार्थ केली हो" सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय..!!✍🏻 संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻 🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल्या दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #अक्षय तृतीया
18 likes
11 shares
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *🧠 तणावमुक्त आयुष्याची प्रभावी गोष्ट🧘🏻‍♂️* 🏃🏻🏃🏻‍♀️आजच्या धावपळीत, प्रत्येकजण काहीतरी साध्य करण्यासाठी झटत असतो. पण हाच संघर्ष अनेकदा तणाव, चिंता आणि मानसिक भार वाढवतो.. 😇शहाण्या लोकांशी गहन चर्चा करणे ही गोष्ट महत्त्वाची असते, पण त्यात बराच वेळ आणि मानसिक ऊर्जा खर्च होते. प्रत्येक चर्चेमध्ये तर्क, विचारसरणी, आणि निर्णय घेण्याची जबाबदारी येते, जी आपल्याला थकवते आणि तणाव वाढवते.. 🤗त्याऐवजी, हितोशी मित्रांशी बिनकामाच्या गप्पा मारणे, हसणे, आठवणींचा हळूहळू स्मरण करणे, मन मोकळं करणे – हे खूप सोपे पण प्रभावी उपाय आहेत. मित्रांशी गप्पा फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास देतात.. 🗣️जिथे तणाव वाढतो, तिथे वेळ मर्यादित ठेवा. खास मित्रांशी आनंदी, मन मोकळे गप्पा मारा. स्वतःच्या भावना व्यक्त करा, आणि मन हालके करा. जीवनात थोडा हसून आनंद घ्या, मनसोक्त गप्पा अन विश्रांती हिच खरी संपत्ती आहे.. 🧘🏻‍♂️तणावमुक्त आयुष्य म्हणजे फक्त मोठे निर्णय घेणे नाही, तर मन हलके ठेवणे, आनंद शोधणे, आणि साध्या गोष्टींमध्ये समाधान मिळवणे..! *😊मनुष्याच्या जीवनात आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे त्यामुळे सकारात्मक विचाराने व समाधानी मनाने स्वत: आनंदी रहा व इतरांच्या आनंदात सदैव सहभागी व्हा, हेच आयुष्यातील प्रमुख सत्कर्म आहे हाच यशस्वी, आनंदी व समाधानी जीवनाचा खरा गुरु मंत्र आहे..!!✍🏻* *संचितयोग गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम आपल दिवस आनंदित मंगलमय् हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #गुड मॉर्निंग
11 likes
1 comment 16 shares
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞 🌹* *🧠कृष्ण म्हणजे अमर्यादितपणा प्रेमातही आणि युद्धात ही🧘🏻‍♂️* 🎊कृष्ण हे केवळ एक ऐतिहासिकदृष्ट्या व्यक्तीमत्व नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे अमर्यादित जाणीव आहे. त्यांचे अस्तित्व मोजमापात बसणारे नाही, कारण तो प्रेमात जितका अथांग आहे, तितकाच युद्धातही निर्णायक आहे. कृष्णाला समजून घ्यायचे असेल तर त्याला फक्त परमेश्वर म्हणून नाही, तर जीवनदर्शन म्हणून पाहावे लागते. 💞कृष्णाचे प्रेम हे अटीशर्तींच्या पलीकडचे आहे. राधेवरच त्यांचे प्रेम मालकीचे नाही, तर समर्पणाचे आहे. भेटीत कमी आणि विरहात अधिक गहिरे असलेले हे प्रेम, “माझ” या शब्दात अडकलेले नाही. गोकुळात कृष्ण माखनचोर आहे, गवळ्यांचा सखा आहे, गायींचा गोपाळ आहे. त्यांचे प्रेम सर्वांसाठी समान आहे—राजा असो वा रंक, स्त्री असो वा पुरुष. म्हणूनच कृष्णाचे प्रेम मर्यादित नात्यांमध्ये अडकत नाही, ते आत्म्यापर्यंत पोहोचते. 🏇🏻 जेव्हा पण हाच कृष्ण युद्धभूमीवर उभा राहतो, तेव्हा तो तितकाच कठोर आणि स्पष्ट दिसतो. महाभारतात कृष्ण स्वतः शस्त्र उचलत नाही, पण त्यांचे प्रत्येक शब्द शस्त्रापेक्षा ही तीव्र आहे. अर्जुनाच्या संभ्रमावर तो प्रेमाने हात ठेवतो, पण निर्णयासाठी कठोर सत्य सांगायला मागे हटत नाही. “धर्मासाठी युद्ध टाळणे हा अधर्म आहे,” हे सांगताना तो भावना नाही, तर कर्तव्य महत्त्वाचे ठरवतो. 🧘🏻‍♂️कृष्णाची अमर्यादितता याच ठिकाणी प्रकर्षाने दिसते. तो कुणाचाच अंध समर्थक नाही; तो सत्याचा साथीदार आहे. जिथे अन्याय आहे, तिथे तो उभा राहतो—मग तो कंसाविरुद्ध असो, की कुरुक्षेत्रात अधर्माविरुद्ध. प्रेमात तो सर्वस्व देतो, आणि युद्धात तो निर्णयाचे ओझे उचलतो. दोन्हीकडे त्याचा हेतू एकच असतो—जीवनाचे संतुलन.. 📖कृष्ण शिकवतो की प्रेम हे दुर्बलतेचे लक्षण नाही आणि युद्ध हे क्रौर्याचे प्रतीक नाही. योग्य वेळी प्रेम व्यक्त करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध उभे राहणेही आवश्यक आहे. जीवनात प्रत्येक क्षणी प्रेम असतेच असे नाही, कधी कधी कुरुक्षेत्रही सामोर येते आणि या वेळी दोन्ही ठिकाणी कृष्णासारखी समजूत हवी असते. *👏🏻म्हणूनच कृष्ण म्हणजे "अमर्यादितपणा" भावनेतही आणि बुद्धीतही, मृदुत्वातही आणि कठोरतेतही. तो शिकवतो की जीवन एकाच रंगाचे नसते; प्रेम आणि युद्ध, दोन्हींच्या समतोलातूनच खरे माणसाचे जीवन घडते..!!✍🏻* *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवार आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🙏शुभ सकाळ,धम्म प्रभात, गुड मॉर्निंग, जय भीम 🙏 #महानुभाव पंथ
142 likes
2 comments 291 shares