महानूभाव पंथ
2K Posts • 5M views
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞 🌹* *🧠कृष्ण म्हणजे अमर्यादितपणा प्रेमातही आणि युद्धात ही🧘🏻‍♂️* 🎊कृष्ण हे केवळ एक ऐतिहासिकदृष्ट्या व्यक्तीमत्व नाही, तर मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे अमर्यादित जाणीव आहे. त्यांचे अस्तित्व मोजमापात बसणारे नाही, कारण तो प्रेमात जितका अथांग आहे, तितकाच युद्धातही निर्णायक आहे. कृष्णाला समजून घ्यायचे असेल तर त्याला फक्त परमेश्वर म्हणून नाही, तर जीवनदर्शन म्हणून पाहावे लागते. 💞कृष्णाचे प्रेम हे अटीशर्तींच्या पलीकडचे आहे. राधेवरच त्यांचे प्रेम मालकीचे नाही, तर समर्पणाचे आहे. भेटीत कमी आणि विरहात अधिक गहिरे असलेले हे प्रेम, “माझ” या शब्दात अडकलेले नाही. गोकुळात कृष्ण माखनचोर आहे, गवळ्यांचा सखा आहे, गायींचा गोपाळ आहे. त्यांचे प्रेम सर्वांसाठी समान आहे—राजा असो वा रंक, स्त्री असो वा पुरुष. म्हणूनच कृष्णाचे प्रेम मर्यादित नात्यांमध्ये अडकत नाही, ते आत्म्यापर्यंत पोहोचते. 🏇🏻 जेव्हा पण हाच कृष्ण युद्धभूमीवर उभा राहतो, तेव्हा तो तितकाच कठोर आणि स्पष्ट दिसतो. महाभारतात कृष्ण स्वतः शस्त्र उचलत नाही, पण त्यांचे प्रत्येक शब्द शस्त्रापेक्षा ही तीव्र आहे. अर्जुनाच्या संभ्रमावर तो प्रेमाने हात ठेवतो, पण निर्णयासाठी कठोर सत्य सांगायला मागे हटत नाही. “धर्मासाठी युद्ध टाळणे हा अधर्म आहे,” हे सांगताना तो भावना नाही, तर कर्तव्य महत्त्वाचे ठरवतो. 🧘🏻‍♂️कृष्णाची अमर्यादितता याच ठिकाणी प्रकर्षाने दिसते. तो कुणाचाच अंध समर्थक नाही; तो सत्याचा साथीदार आहे. जिथे अन्याय आहे, तिथे तो उभा राहतो—मग तो कंसाविरुद्ध असो, की कुरुक्षेत्रात अधर्माविरुद्ध. प्रेमात तो सर्वस्व देतो, आणि युद्धात तो निर्णयाचे ओझे उचलतो. दोन्हीकडे त्याचा हेतू एकच असतो—जीवनाचे संतुलन.. 📖कृष्ण शिकवतो की प्रेम हे दुर्बलतेचे लक्षण नाही आणि युद्ध हे क्रौर्याचे प्रतीक नाही. योग्य वेळी प्रेम व्यक्त करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध उभे राहणेही आवश्यक आहे. जीवनात प्रत्येक क्षणी प्रेम असतेच असे नाही, कधी कधी कुरुक्षेत्रही सामोर येते आणि या वेळी दोन्ही ठिकाणी कृष्णासारखी समजूत हवी असते. *👏🏻म्हणूनच कृष्ण म्हणजे "अमर्यादितपणा" भावनेतही आणि बुद्धीतही, मृदुत्वातही आणि कठोरतेतही. तो शिकवतो की जीवन एकाच रंगाचे नसते; प्रेम आणि युद्ध, दोन्हींच्या समतोलातूनच खरे माणसाचे जीवन घडते..!!✍🏻* *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवार आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🙏शुभ सकाळ,धम्म प्रभात, गुड मॉर्निंग, जय भीम 🙏 #महानुभाव पंथ
135 likes
2 comments 274 shares
*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹* *"चिंती परा ते येई घरा"* प्रत्येक मनुष्याला मनापासून वाटत असते की, भगवंताने आपल्यास सुख द्यावे किंवा आपण मागीतलेले सर्व संकल्प पूर्ण व्हावेत. ज्ञानेश्वर माऊली सुध्दा देवाजवळ मागणे मागतात- *"जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात।"* वास्तविक आपण देवाजवळ लडीवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी योजना ईश्वराने आपल्या जीवनात केलेली आहे. परंतु मनुष्यप्राणी हा नेमके हे विसरतो की माणसाला अंतर्मन व बहिर्मन अशी दोन मने आहेत. बहिर्मन हे समुद्राच्या लाटेप्रमाणे असते तर अंतर्मन हे सागरासारखे असते. माणसाच्या बहिर्मनात जे विचार घोळत असतात तेच आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. म्हणून माणसाने जीवनात जगतेवेळी आपण कोणते घ्यावे व कोणते न घ्यावे ते पहिले लक्षात घेतले पाहिजे. *"महत्वाचे सर्वात प्रथम बहिर्मनात चांगले विचार ग्रहण किंवा आत्मसात करण्यास शिकले पाहिजे."* *_पण माणूस काय करतो नेमका जे ऐकू नये ते ऐकतो अन जे खाऊ नये ते खातो. जे पिऊ नये ते पितो व जीवनाची पूर्ण वाताहात करून घेतो._* अंतर्मन ही जमीन आहे व बहिर्मन हा शेतकरी आहे. आता शेतीमध्ये कोणते पीक घ्यावयाचे आहे ते शेतकरी ठरवितो, जमीन ठरवत नाही. त्याप्रमाणे जमिनीचे कार्य फक्त तुम्ही जे पेरले त्याचे दाम दुप्पट देणे हे असते, म्हणून बहिर्मनाने जर गाजर गवत पेरायचे ठरवले तर अंतर्मन तेच पीक दुप्पट भरपूर देणार. बहिर्मनाने जर गहू पेरला किंवा ऊस लागवड केली तर तेच पीक भरघोस येणार कारण बहिर्मनामार्फत बाह्य जगातील विचार अंतर्मनात येतात व अंतर्मनात रूजतात परिपक्व होतात व तसेच जीवनात साकार होतात. *"म्हणून माणसाची दृष्टी स्वच्छ असावी."* जगातील सर्व वस्तू जगास आनंद देतात. सूर्य प्रकाश देतो, वृक्ष छाया देतात, फळे देतात मग मानवाने जगास दुःख का द्यावे, *'चिंती परा ते येई घरा'।* म्हणून नेहमी माणसाने दुसऱ्याच चांगले चिंतण्यास शिकले पाहिजे. असे म्हणतात-की *मना त्वाचिरे पूर्व संचित केले।* *तया सारिखे भोगणे प्राप्त झाले।।* आपल्या कर्मातून नशिब साकार होते हे पूर्ण कळल्याने तो सावध वागतो. बेसावध वागत नाही. यापुढे तरी मी सत्कर्मेच करीन. दुष्कर्मे करणार नाही असा निश्चय करतो. यामुळे तो माणूस सुखी व शांत होतो व त्याचे जीवन प्रगतीकडे वाटचाल करते. माणूस दुःख आले की त्याचा संबंध अन्यत्र जोडतो व अंधश्रध्देकडे झुकतो. योग्य डाॅक्टर न मिळाल्याने तो माणूस भरकटतो त्यामुळे मनाने कमजोर बनते व त्यास जास्त हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागते. ज्याला मनावर विजय प्राप्त करावयाचा आहे त्यांनी योग्य सदगुरूंना, गुरुंना, अनन्यभावे शरण गेले पाहिजे. त्यांच्या संगतीत गेल्याने आपले षडविकार कमी होतात. दृश्य जगताबद्दलची आसक्ती कमी होते. आपला अहंकार लयास जातो. भगवंतावर आपले प्रेम कसे दृढ होईल हे सदगुरू शिकवितात. *'नामस्मरणाने जळती अवघ्या पापराशी'* हे गुरूंच्या चरणसेवेत असतानाच साधकाला उमगते. म्हणूनच संतांनी म्हटले आहे. *"संतांचा सांगाती मनोमार्गगती"* *संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻* *🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रविवारी आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻* #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #शुभ
84 likes
87 shares
*🌹💞📿श्रीदत्त कृपा📿💞🌹* 🎊🥳🌹👁🙏🏻👁🌹🪔📿 *सह्याद्रि शिखरे रम्यं अनसुयात्रिनंदनम्..!!* *तंवंदे परमानंद श्री दत्तात्रेयं जगदगुरुम..!!* *'अवतार ऊदंड होती, सवेची मागूती विलया जाती, तैसी नव्हे श्रीदत्तात्रेय मुर्ती, नाश कल्पांती असेना.!!'* *'पुर्णब्रम्ह मुसावले, ते हे दत्तात्रेय रुप ओतीले, ज्यांचे विलोकनमात्रे तरले, जिव अपार त्रिभूवनी..!'* *|| जो चहू योगी चा अधिष्ठात्री ||* *|| अमोघा सिद्धी जयाच्या घरी ||* *|| तो माता पुरी राज्य करी ||* *|| तया नमन श्री दत्तात्रया ||* _*परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव दिना निमित्त आपणा सर्वांना खुप खुप मंगलमय् आनंदी शुभेच्छा..!!✍🏻*_ #महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #🎭Whatsapp status *_संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻_* *_🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय हो📿🙏🏻_*
109 likes
3 comments 124 shares