कैलास किसन बोंबले
553 views
*#छत्रपती_शिवाजी_महाराज* एक आख्यायिका का झाले... शिवाजी महाराजांचे ७ घोडे - १- मोती २- विश्वास ३- तुरंगी ४- इंद्रायणी ५- गाजर ६- रणभीर ७- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता. संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशाख साधा परंतु दरबारी पोशाख राजेशाही असे. काळी दाढी, मिशी, लांब केस, मोठे व तेजस्वी डोळे, भेदक नजर, अत्यंत सावध, बोलतांना स्मित हास्य. उंची पेक्षा हाताची लांबी नजेरेत भरणारी. मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायला शिकविले. जगातील १११ देशात १९ फ़ेब्रुवरिला जयंती साजरी केली जाते. १३०० पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्दकोश शिवरायांनी तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शाश्रज्ञ- आज आपण शेतीत ३०० फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज ४०० वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर ४००० फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना. छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले. जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही, स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत. छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर – प्रत्येक किल्ल्यावर २ प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे. याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा. पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण २५ फुट व जास्त लांब आहे. रायगड- राज्यभिषेक दिन ६ जून. महाराज्यांच्या काळात रायगडावरील लोकसंख्या कमीतकमी १०००० असे. ६५ किल्ल्यांच्या गराड्यात रायगड किल्ला. २००० फुटावर पहिली तटबंदी ४००० फुटावर दुसरी तटबंदी किल्याची वाट एकदम छोटी. किल्यावर ३०० इमारती होत्या. १०००० लोकांना वर्षभर पाणी मिळावे यासाठी ९ टाके. रायगडाला ३ बाजूला तटबंदी नव्हती फक्त पश्चिम बाजूला तटबंदी आहे. किल्याचे एकूण क्षेत्र १२०० एकर. रायगडावर ४२ दुकाने होती. पैकी २१ दुकाने देशी माल विक्री व २१ दुकाने परदेशी माल विक्रीसाठी. आजच काम आजच झालं पाहिजे, उद्या नाही त्यांचं नाव शिवाजी महाराज. मराठ्यांचे घोडे एकदा निघाल्यावर एक दमात १००/१२५ किमी सहज जात कारण मावळे स्वराज्यासाठी लढत होते. मुघलांचे घोडे ३०/३५ किमीवर थांबत कारण मुघल सैन्य पगारसाठी काम करत होते. महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात ८ मंत्री ३० विभाग (१२ महाल व १८ कारखाने) ३० विभागात ६०० कर्मचारी महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल. रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम. छत्रपती शिवाजी महाराज - महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर १६७१ मध्ये त्या काळात मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रच, डच, पोर्तुगीज यांनी तिथली शेती मोडीत काढण्यासाठी त्यावेळच्या गोवा प्रांतातून मीठ आणून स्वस्तात विक्री सुरु केली. महाराज्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आयात मिठावर कर लावला. त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणून छत्रपतींना जानता राजा म्हणतात. वयाच्या १७ व्या शिवरायांच्या करिअरची सुरुवात आर्किटेक्ट म्हणून झाली. त्यांनी स्वतः डिजाईन करून राजगड किल्ला बांधला. एक इंग्रज लिहितो “ शिवाजी महाराज द ग्रेट गॅरिसन- इंजिनिअरचा गुरु” होते. बांधकाम खर्च २२००० कोटी. या गडावर महाराज २७ वर्ष राहिले. १९८२ साली पोर्तुगालची राजधानी लिसबेन येथे गडकोट/किल्ल्यांचे जागतिक प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाच्या निवड समितीने जगातील किल्ले बघितल्यावर “राजगड” किल्यास प्रथम पारितोषिक दिले. महाराज्यांच्या मृत्यूनंतर ३०२ वर्षांनीही महाराज्यांच्या सन्मान होतो. श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा. #शिवजयंती