Vaibhav Mhatre
2K views
#इतिहास छत्रपतींचा ⛳ #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ #२_फेब्रुवारी_१६६१ मुघल सरदार कारतलबखान हा मोठ्या फौजेनिशी कोकणातील नागोठणे, चौल, पेण ही ठाणी काबीज करण्यासाठी शाहीस्तेखानाच्या हुकुमावरून निघाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना मिळाली.कारतलबखान हा उंबरखिंडीतून नागोठण्याला उतरणार होता.खानासोबत माहूरची प्रख्यात देशमुखीन "सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडीता रायबागन" ही शूर स्त्री देखील होती. महाराज मावळ्यांना घेऊन आधीच उंबर खिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहीले. खान आला पण त्याने शिवरायांचा परत जायचा आदेश धुडकावून लावला. मग मराठ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला, मुघलांची भयंकर लंगडतोड चालू झाली. त्यांना त्या घोर जंगलात लढताही येईना व पळताही येईना, या अरण्याचे नाव "तुंगारण्य". अखेर खान शरण आला, त्याचा प्रचंड पराभव झाला. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलबखान कसाबसा जीव वाचवून पुण्यात परतला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #२_फेब्रुवारी_१६८२ छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे ⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳