इतिहास छत्रपतींचा

2K Posts • 915K views
Dr Amol Melage
593 views 3 hours ago
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
10 likes
19 shares