इतिहास छत्रपतींचा

2K Posts • 1M views
🆔Official_Sagar 💞💤👑
823 views 23 days ago
मारुतीचे महारुद्र नाव असलेला शिलालेख !!!! नारायणगाव मारुती मंदिर कलश पट्टी शिलालेख. हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पुणे नासिक हायवे वर असलेल्या मौजे नारायणगाव येथील मीना नदीच्या किनारी स्वामी समर्थ मठा शेजारी मुख्य बाजारपेठेत असलेल्या हनुमान चौकात मारुती मंदिराच्या बह्याभागावर दर्शनी बाजूस मुख्य कलशाच्या खाली असलेल्या पट्टीवर उजव्या बाजूस कोरलेला आहे .मंदिर भव्य स्वरूपाचे असून त्याच्या पुढे आधुनिक बांधकाम सभामंडप केलेला असल्यामुळे शिलालेख सहजपणे दिसत नाही. . हा शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ६ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे काळाच्या ओघात वातावरणामुळे तसेच रंगरंगोटी केली असल्यामुळे शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत. शिलालेखाचे वाचन : १)श्री गणपती प्रसन्न २)श्री महारुद्र मारुतीचे देवळा ३) चा उदय काळ सकें १८१५ विज ४) य नाम स.श्रावण म.झाला. ५)कारागीर लालाजी व कृष्णाजी ६)नाईक परदेसी कुंभार ना.गा. गावाचे नाव :- नारायणगाव , ता. जुन्नर , जि. पुणे जी.पी.एस. :१९. ०७ ” ०९ ’ ३० ,७३ . ५८ ’’०७ ’३४ शिलालेखाचे स्थान :-मुख्य मंदिराच्या कलशाच्य खालीअसलेल्या उजव्या कोपऱ्यात आडव्या पट्टीवर कोरलेला आहे. अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे. भाषा : शुद्ध मराठी देवनागरी आहे. प्रयोजन : मुख्य मंदिर बांधकाम सुरुवात / बांधकामाची चालू केल्याची स्मृती जपणे. मिती / वर्ष : – शालिवाहन सकें १८१५ विजय नाम संवत्सर श्रावण काळ वर्ष : १९ वे शतक -११ऑगस्ट शुक्रवार ते ९ सप्टेंबर शनिवार सन ,१८९३ कारकीर्द :-ब्रिटीश आमदनी व्यक्तिनाम : लालाजी परदेशी व कृष्णाजी नाईक कुंभार. ग्रामदेवता :- गणेश,महारुद्र मारुती. शिलालेख संशोधन:- श्री सौरभ मंडलिक शिलालेखाचे वाचक : अनिल किसन दुधाने प्रकाशक : अर्थ :- शालिवाहन शकाच्या १८१५ व्या वर्षी विजयनाम संवत्सर मध्ये श्रावण महिन्यात (११ऑगस्ट शुक्रवार ते ९ सप्टेंबर शनिवार) १८९३ या दिवशी मौजे नारायण गाव येथे हनुमंताचे एक नाव असलेले महारुद्र मारुती यांचे देवळाचे काम चालू झाले किंवा ते काम पूर्ण झाले. हे काम लालाजी व कृष्णाजी नाईक परदेशी कुंभार नारायणगावच्या असलेल्या कारागिरांनी पूर्ण केले. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवरायांचे भक्त #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त
16 shares
Vaibhav Mhatre
1K views 17 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_सप्टेंबर_१६६० विशाळगडावरून सुटकेनंतर शिवरायांनी त्वरित उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यातील "चौल" ते "बांदा" हा प्रदेश जिंकून स्वराज्यात आणला 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_सप्टेंबर_१४३६ अहमदशहा याने १ सप्टेंबर १४३६ रोजी मुख्य वजीर दिलावर खान याला संगमेश्वरच्या मोहिमेवर पाठवले. रायरीचा अधिपती शिर्के यांच्याशी थोड्याफार चकमकी आणि वाटाघाटी नंतर दिलावरखानाने मोहिम आटोपती घेतली. त्याने त्या बदल्यात रायरीच्या शिर्के व जावळीच्या मो-यांकडुन अगणित संपत्ती व संगमेश्वर अधिपतीची कन्या घेतली. ही अगणित संपत्ती व मो-यांची कन्या त्याने अल्लाउद्दीन अहमदशहा याला अर्पण केली. मो-यांच्या त्या कन्येशी सुलतानाने विवाह केला व तिचे नाव ‘जेब-चेहरा’अथवा परी चेहरा ठेवले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_सप्टेंबर_१७६० सदाशिवरावभाऊंनी नानासाहेबांना पत्र लिहिले, त्या पत्रात भाऊ म्हणतात, "माझ्या छावणीत भूकमरी आहे, पैसे नाही आहेत, कर्जही मिळत नाही व माझे शिपाई उपवास करत आहेत, लवकरात लवकर मदत पाठवावी". दिल्ली जिंकल्यामुळे, अब्दालीच्या छावणीत भीतिदायक वातावरण निर्माण झालं आणि अहमदशहाअब्दाली, नजीबखान व शुजाउद्दोला यांनी दिल्लीकडे कूच केलं. अब्दाली आपल्या सैन्यासह, यमुनेच्या एका बाजूस शहादऱ्याजवळ तळ ठोकून होता, तर मराठे यमुनेच्या दुसऱ्या बाजूस दिल्लीत होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१_सप्टेंबर_१९३० धुळय़ाचा पाठीराखा लळींग लळिंगच्या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात. लळींगच्या या गवतालाही खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी 'मिठाचा सत्याग्रह'चे आंदोलन जाहीर केले, त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र-मीठ कुठून आणायचे? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी गवत कापण्याविरोधात केलेला कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत त्यांनी सविनय कायदेभंग केला. लळींगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
19 shares