इतिहास छत्रपतींचा
2K Posts • 873K views
⛳ आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष ⛳ 📜 ४ मार्च इ.स.१६६० छत्रपती शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले. स्वतः शिवाजीराजे पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते. जोवर महाराज पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती महाराज आखणार होते. कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते. अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा सिद्दी जौहरने घट्ट आवळला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🗿शिवकालीन पुराणवस्तू https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/t7rLDmS3bLs 📜 ४ मार्च इ.स.१६७७ (फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार रविवार) महाराजांच्या भेटीला आकण्णापंत आणि मादण्णापंत! छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीस जाताना कुठल्याही प्रकारची लुट न करता शांतपणे येत असल्याचे पाहून कुतुबशहा निष्चितपणे संतोष पावला. आपले पाहुणे म्हणून त्यांच्या अर्थात महाराजांच्या सत्कारार्थ सामोरा येण्याची तयारी करू लागला. कुतुबशहा सामोरा येतोय, लागलीच महाराजांनी निरोप धाडला की, "तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ मी धाकटा भाऊ आपण पुढे न येणे". अर्थात या निरोपाने बादशहा अजून संतोष पावला. त्याने आकण्णापंत आणि मादण्णापंत यांना हुकूम केला की, "खासे आपण जाऊन महाराजांचे स्वागत करावे". त्याबरहुकूम आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सन्मानाने महाराजांना सन्मानपुर्वक शहरात नेले. या पहिल्याच भेटीत महाराजांनी कुतुबशहाचे मन जिंकून एक नवा मित्र जोडला! 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मार्च इ.स.१६८७ निळोपंतांनी सर्जेराव जेधे यांस पाठविलेल्या पत्राची नोंद! सर्जेराव जेधे यांस अभय देण्याचे वचन दिले. सर्जेराव जेधे यांसाठी मोरोपंतांच्या पायाची शपथ वाहिली आणि कौल दिला. निळोपंत पेशव्यांनी जेधे घराण्यास माफ करून तुम्ही स्वराज्याची एकनिष्ठेने सेवा करावी आणि आमच्यावर पुर्ण भरवसा ठेवावा असे कैलासवासी मोरोपंत पिंगळे यांची शपथ घेऊन आश्वासन दिले. जेधे घराणे किती बहुमोलाचे होते ही गोष्ट यावरून लक्षात येते. त्यांचे स्वराज्यात राहणे किती महत्त्वाचे होते हे यावरुन लक्षात येते. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ४ मार्च इ.स.१७०१ पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्र जाहीर केल्याची नोंद! हिंदुंनी पोर्तुगालच्या राजास अर्जावर अर्ज पाठविण्याचा सपाटा सुरू केला. त्याला यश येऊन पोर्तुगालच्या राजाने एक आज्ञापत्रानुसार जाहीर केले की हिंदूंना ४ भिंतीच्या आत होम हवनाधी विधीनुसार लग्ने लावण्याची मुभा राहील. परंतु ही सवलत इंक्विझिशनच्या नियमांना बाधक हीती म्हणून गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास तसे कळविले. पोर्तुगालात इंक्विझिशनचा वरचष्मा असल्याने पोर्तुगालच्या राजास त्याचा विरोध पत्कराने अशक्य होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मार्च इ.स.१७०६ छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं. https://youtu.be/t7rLDmS3bLs 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मार्च इ.स.१७३९ मराठ्यांनी कारंजा (उरण) बेट जिंकले मानाजी आंग्रे ४ मार्च १७३९ रोजी आपल्या आरमारातील ४० गलबतां मधून २००० हजार शिबंदी सह फिरंगी प्रतिकार मोडून काढत कारंजा बेटावर उतरले. बेटावर अदीच आपले माणसे पेरून मराठ्यांनी जवळ जवळ ७००-८०० स्थानिक आंग्र्यांना आपल्या बाजूस वळवले होते. हा सर्व प्रकार पाहून पोर्तुगीज कप्तान जोसे लुई द सिल्वा ह्याच्या पाचावरच धारण बसली. बघता बघता पूर्ण कारंजा बेट ताब्यात घेत लगेच दुसऱ्या दिवशी मराठे द्रोणागिरी गडास बिलगले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 ४ मार्च इ.स.१८१८ इंग्रजांनी विसापूर जिंकला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
4 likes
15 shares