इतिहास छत्रपतींचा

2K Posts • 1M views
🆔Official_Sagar 💞💤👑
633 views 23 days ago
महाराज " आज्ञापत्र " या आपल्या राज्यघटनेत सांगतात की, . " दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून,पुढे बुरुज देऊन ,येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे.किल्ल्यास एक दरवाजा एब थोरालाच आहे.याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजा तैशाच चोर दिंड्या करून ठेवाव्या.त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजेत तितक्या ठेऊन वरकड दरवाजे व दींड्या चिणून टाकाव्यात गडास यावयाचे मार्ग असतील , ते सुगम नसावे . सुगम असले तरी ते मोडून त्यावरी झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस जाता कठीण ऐसे मार्ग घालावे.या विरहित बलिकुबलीस चोर वाटा ठेवाव्या . त्या सर्वकाळ चालो देऊं नयेत . समयास तेच दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करून सामान सर्वदा नेत जावे " - संदर्भ ( रायगड स्थळ दर्शन ) #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
13 likes
7 shares
Vaibhav Mhatre
587 views 13 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६५७ शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१२_ऑगस्ट_१६८३ अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते. औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१२_ऑगस्ट_१७६५ प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगलचा नवाब बनवले होते, नंतर त्याच्या जागी मीर कासीमची नेमणूक केली गेली. पण इंग्रज आणि कासीमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्यात लढाई झाली, त्यात मीर कासीमने १५० इंग्रजाची कत्तल केली. नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह, शुजाउद्दोला आणि मीर कासीम यांच्या फौजांचा पराभव झाला आणि इंग्रजाची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली. कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजानी मल्हारराव होळकर यांचाही पराभव केला. याच सुमारास रॉबर्ट क्लाइव्ह यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नर पदी निवड झाली, त्याने आपले कसब पणाला लावून हतबल झालेल्या मुघल बादशहा आणि शुजाउद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहार प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले. त्याबदल्यात इंग्रजानी बादशहाला दरवर्षी २६ लाख रुपये तनखा देण्याचे ठरले. बादशहा आणि शुजाउद्दोला यांनी आपण इंग्रजाशी कधीही युद्ध करणार नाही असेही लिहून दिले. बादशहकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले ती तारीख होती १२ ऑगस्ट १७६५. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
14 likes
1 comment 14 shares