#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६१
शास्ताखानच्या हुकुमावरून कारतलबखान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला आणि ठरल्याप्रमाणे कोकणात उतरून उंबरखिंडीकडे त्याने वाटचाल सुरू ठेवली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६६७
आऊसाहेबांचे न्यायदान :-
महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन, कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला न्हवता.
कानद खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत न्हवते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून, जाणून हा वतनाचा तंटा सोडवला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१६८०
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र:-
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी राजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी तो लिहितो:-
शिवाजीराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे.
२४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
(हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन,
तो लिहितो:✍️
(महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्या कोणाला स्वार्यांवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे.)
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_जानेवारी_१७३९
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले त्याच वेळी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७ मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीत मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला
🚩
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#१_नोव्हेंबर_१६५९
खानाची भेट निश्चित होत होती.
गोपीनाथपंत अफजलखानाच्या डेऱ्यात फेऱ्या मारत होते. त्यांच्या बरोबरचे हेर छावणीची बातमी काढत होते. राजे भेट जावळी येथेच व्हावी आणि ती पण किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी यासाठी आग्रही होते त्यामुळे तसे ठरले.
🚩🏇🚩🏇🚩
#१_नोव्हेंबर_१६७६
संभाजी राजे हे धर्मपत्नी येसूबाईसाहेब यांच्यासह शृंगारपूरात येऊन राहिले
🚩🏇🚩🏇🚩
#१_नोव्हेंबर_१६७९
२२ ऑक्टोबरला राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला.
आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती.
इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने
१ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश -
“नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत.
आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल."
🚩🏇🚩🏇🚩
#१_नोव्हेंबर_१६८३
विरजईने फोंड्याला मोर्चे बांधले.
मराठे किल्ला लढवण्यासाठी छातीचा कोट करून उभे ठाकले होते.
वेढा फोडण्यासाठी खास संभाजीराजे स्वतः ८०० स्वार आणि मोठे पायदळ घेऊन निघाले. हे नुसते कळण्याचा अवकाश कि व्हाइसरॉयची भीतीने गाळण उडाली.
🚩🏇🚩🏇🚩
#१_नोव्हेंबर_१६९२
पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला.
या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.
🚩🏇🚩🏇🚩
#१_नोव्हेंबर_१७१८
फसलेल्या 'विजयदुर्ग' मोहिमेनंतर इंग्रजांनी ४ महीने तयारी करून प्रचंड ताकदीने 'खांदेरी'वर आक्रमण केले.
पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली.
🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१६६५
शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले.
राजे शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता, येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१६८४
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र
केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात (Paltata पलते) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्ल्स राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१७३९
सन १७३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला.
इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला.
तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला.
धारावी किल्यात पाण्याची सोय नाही.
गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले, पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला.
दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला.
त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१८७९
वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नाशिक
या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.
या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे,
त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१६६५
शिवरायांनी कर्नाटकातील "कारवार" जिंकले.
राजे शिवरायांचा कारवारच्या खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता, येथे शेरखानने इंग्रज व तेथील सर्व व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवरायांच्या समोर रूजू केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१६८४
केग्विनने इंग्लडच्या राजाला पत्र
केग्विनने २२ फेब्रुवारी १६८४ रोजी पुन्हा इंग्लडच्या राजाला पत्र पाठवून संभाजीराजांनी आपल्या सरहद्दीवर ३०००० सैन्य मुंबईपासून तीन मैलांवर असणार्या पलतात (Paltata पलते) या बेटावर उतरवून ते बेट व्यापण्याचा प्रयत्न केल्याचे कळवले होते. केग्विन हा सातत्याने चार्ल्स राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणार्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१७३९
सन १७३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी धारावी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी सन १७३९ मोर्चा कायम झाला.
इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला.
तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला.
धारावी किल्यात पाण्याची सोय नाही.
गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले, पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला.
दिनांक २७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी चिमाजीअप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येधून हल्ला करण्यास हुकूम दिला.
त्यानुसार रामजी महादेव, तुबाजीपंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२२_फेब्रुवारी_१८७९
वासुदेव बळवंतांनी पुणे, नगर, नाशिक
या टापूत पायी प्रवास करून लोकांची विपन्नावस्था पाहिली.
या दुष्काळास, दारिद्र्यास परकीय सरकार जबाबदार आहे,
त्याची हकालपट्टी करून आपल्या लोकांचे शासन स्थापन केले पाहिजे, असा प्रचार त्यांनी सुरू केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६०
मराठ्यांनी अकोला जिंकले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६२
इग्लंडच्या राजाचे रॉयल वॉरंट✍️
शिवछत्रपतींना आरमार अत्यंत प्रतिकूल परिस्थीत समुद्रात उतरवायचे होते,
फिरंगी व वलंदेज, इंग्रज, किलाताब ऐशा सत्तावीस पादशाह्या व जमिनी वरील मोहिमा संभाळून हि सर्व 'लगबग' करावी लागणार होती व भारतीयांकडे आरमार बांधणी चे ज्ञान नव्हते या करता आरमार बांधणे सुरूंग लावणे इत्यादी कामांसाठी महाराजांनी काही इंग्रज व पोर्तुगीज माणसे नोकरीवर ठेवली होती.
भारतीयांना हे फिरंगी सहज ज्ञान देत नसत.
इग्लंडच्या राजाने तर २१ फेब्रुवारी १६६२ या तारखेचे एक रॉयल वॉरंटही काढले होते की
"इंग्रज भारतीय जहाजे चालवतात तिथल्या रहिवाशांना जहाजे बांधण्यास व चालविण्यास शिकवितात त्यांना ताबडतोब इंग्लंडला पाठवून द्यावे"
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१६६५
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत छत्रपती शिवराय महाराज छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या
(दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ ला भर रस्त्यावर ठार मारले होते, कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.)
हा कारवारात येऊन पोहोचला त्याच्या जवळ फौजही नव्हती.
तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_फेब्रुवारी_१८२९
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मृत्यू.
(जन्म : २३ आॅक्टोबर १७७८)
झाशीचे राणी प्रमाणेच तिचेही दत्तक विधान नाकारनणेत आले, त्यानंतर लढाईस तोंड फुटले ब्रिटीश फौजा कित्तूर वर चालून आल्या,
परंतु त्यांचा पराभव झाला संगोली रायान्णा या सेनापतीचे सहाय्याने ब्रिटिशाना तीनेच झुंजविले परंतु अखेर बैलहोंगल येथे तिला कैद करणेत आले व बैलहोंगल किल्ल्यातच तिला कैदेत ठेवणेत आले तेथेच तिचा मृत्यू झाला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१६६०
छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत.
येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे.
अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला.
इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला.
राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१६६०
( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )
शाहिस्त्या नगरमध्ये!
मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते.
महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१८०२
दौलतराव शिंदेंनी इंग्रजांचा तह स्विकारला नाही
इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१८१८
#इंग्रज_आणि_सिंहगड:-
नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला.
सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली.
ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१६६०
छत्रपती शिवाजी महाराजांनी खारेपाटण जिंकले.
प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत.
येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे.
अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला.
इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला.
राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला, त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१६६०
( फाल्गुन वद्य चतुर्थी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )
शाहिस्त्या नगरमध्ये!
मराठ्यांना संपवण्याच्या विचाराने निघालेला शाहिस्त्या नगरला पोहोचला व तेथे त्याने छावणी टाकली. त्याची छावणी म्हणजे एक शहरच होते.
महाराज त्यावेळी अफझल वधानंतर आदिलशाही मुलखात प्रचंड दरारा राखून होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१८०२
दौलतराव शिंदेंनी इंग्रजांचा तह स्विकारला नाही
इंग्रज वकील कॉलिन्स हा उज्जैन येथे २० फेब्रुवारी १८०२ रोजी पोहोचला आणि मे महिन्यापर्यंत कॉलिन्सचा मुक्काम उज्जैन येथे होता, बडोद्याच्या गायकवाड प्रमाणेच दौलतराव शिंदे यांवरही तैनाती फौजेचा तह करावा म्हणून दडपण वाढत होते, यावेळी कॉलिन्सने दौलतराव शिंदें समोर एक चार कलमी मसुदा मांडला होता पण दौलतरावाने कॉलींस च्या बोलण्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२०_फेब्रुवारी_१८१८
#इंग्रज_आणि_सिंहगड:-
नोव्हेंबर १८१७ मध्ये पुणे जिंकल्यावर इंग्रजांनी धडाधड मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला.
सिंहगड आणि आसपासच्या किल्ल्यांचा ताबा घ्यायची जबाबदारी ब्रीगेडीअर जनरल थिओडोर प्रिट्झलरवर सोपवण्यात आली.
ह्या कामगिरीसाठी मद्रास आणि मुंबई रेजिमेंटचे एकूण ४१०० सैनिक त्याला देण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१९_फेब्रुवारी_१६३०⚔
#समस्त_हिंदू_बांधवांच्या_दैवताचा_जन्मदिन
#श्री_शिवछत्रपती_महाराज_जन्मदिवस
#किल्ले_शिवनेरी,
(जुन्नर-पुणे), महाराष्ट्र. (तिथी प्रमाणे - फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ )🚩
शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी
राजमाता जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० साली
"बाळ शिवबा राजांचा जन्म झाला."
भीमाशंकराच्या जठात अन नाणेघाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उष्:काल झाला,
शिवरायांचा जन्म झाला,
पुत्र जिजाऊसाहेबांना झाला,
पुत्र शहाजीराजेंना झाला,
पुत्र सहयाद्रीला झाला,
पुत्र महाराष्ट्राला झाला,
पुत्र भारतवर्षाला झाला....!
१९ फेब्रुवारी १६३० रोजी एका मराठा वतनदाराच्या घरात शिवाजी नामक एक पुत्र जन्मला❤️
ही गोष्ट तत्कालीन कालखंडात खास नोंद व्हावी किंवा अगदीच कृष्ण रामासारखा अवतारी पुरुष जन्माला यावा इतकीही खास नाही🙌
पण ह्या देवमाणसाने अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात जो काही कर्तृत्ववान तेजस्वी आणि ओजस्वी असा इतिहास घडवला😍
त्या इतिहासाने आजही जनसामान्यात प्रेरणा निर्माण होते🚩
आजही त्यांचे नाव घेता अंगावर काटा उभा राहतो🚩
आजही त्याचा त्याग, निष्ठा अन् स्वातंत्र्यप्रेम पाहून
डोळ्यात अश्रू उभे राहतात🚩
आणि आजही त्याच्या गडकोटांची उंची पाहताना उर फुलतो🔥
छाती दोन इंच फुगते
🚩मुजरा राजं मुजरा 🚩
✍️
शिवछत्रपतींच्या जन्म तारखेवर वादविवाद होते परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१५७६
महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध:-
महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी
(हा दिल्ली चा एकेकाळ चा बादशाह शेरशाह सुरी चा वंशज) या अफगाणी मुस्लिम सेनानी कडे होते, तर बादशहा अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह
(जयपूर चा राजा, मिर्झाराजा जयसिंह चे आजोबा)
हे हिंदू राजा करत होते.
१८ फेब्रुवारी १५७६ साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढत होते.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१६५३
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाल भटास वर्षासन दिले.
( फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, शके १५७४, संवत्सर नंदन, शुक्रवार )
महाराजांनी गोपाळ भटांना वर्षासन नेमून दिले!
श्री क्षेत्र महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधर भट हे ' सुर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते ' होते.
आजच्या दिवशी महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून " स्वामींनी सुर्यानुष्ठाण करावे " ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१६६६
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१७५५
तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशव्यांनी करवीरकरांशीहि कारस्थान आरंभिले तेव्हां करवीरकर यांनी तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारात दिला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१८_फेब्रुवारी_१७५६
दिनांक १८ फेब्रुवारी १७५६ रोजी समशेर बहाद्दर यांनी
रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला.
उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहीमेत समशेर बहाद्दर सामील होते मात्र कोकणातील मोहीमेवर जाण्याकरीता उत्तरेकडील मोहीम सोडून समशेर बहाद्दर सन १७५५ च्या मे महिन्यात कोकण मोहीमेवर रवाना झाले.
कोकणातील मोहीमेनंतर समशेर बहाद्दर यांना पून्हा उत्तरेत राजपुताना मोहीमेवर पाठविण्यात आले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩













