🆔Official_Sagar 💞💤👑
640 views • 23 days ago
महाराज " आज्ञापत्र " या आपल्या राज्यघटनेत सांगतात की,
.
" दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून,पुढे बुरुज देऊन ,येता जाता मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे.किल्ल्यास एक दरवाजा एब थोरालाच आहे.याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजा तैशाच चोर दिंड्या करून ठेवाव्या.त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजेत तितक्या ठेऊन वरकड दरवाजे व दींड्या चिणून टाकाव्यात गडास यावयाचे मार्ग असतील , ते सुगम नसावे . सुगम असले तरी ते मोडून त्यावरी झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस जाता कठीण ऐसे मार्ग घालावे.या विरहित बलिकुबलीस चोर वाटा ठेवाव्या . त्या सर्वकाळ चालो देऊं नयेत . समयास तेच दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करून सामान सर्वदा नेत जावे "
- संदर्भ ( रायगड स्थळ दर्शन ) #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त
13 likes
7 shares