Kalpataru's kreations
1.4K views
#दिनविशेष १ फेब्रुवारी १६८९ हा दिवस आपल्याला एक गोष्ट शिकवतो — स्वराज्य विश्वासघाताने पडत नाही, पण इतिहासाला धडा देतो.हे फक्त राजे नव्हते, ते धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी जगणारे योद्धा होते. संगमेश्वर येथे काही मोजक्या मावळ्यांसोबत असताना, गणोजी शिर्केच्या विश्वासघातामुळे मुघल सरदार मुक्करब खानाने महाराजांना पकडले. महाराजांकडे सैन्य कमी होते, पण धैर्य कमी नव्हते. ते शेवटपर्यंत लढले. औरंगजेबाने धर्म सोड, राज्य दे, माफी माग — असे आदेश दिले. पण संभाजी महाराजांनी एकच उत्तर दिलं — “शिवरायांचा मुलगा कधी झुकत नाही.” अत्यंत हालअपेष्टा, छळ, अपमान सहन करूनही महाराजांनी धर्म व स्वराज्य सोडलं नाही. *११ मार्च १६८९* रोजी ते हसत-हसत बलिदान देऊन अमर झाले... आज आपण जर स्वाभिमानाने जगत असू... तर त्यामागे धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान आहे.... हा इतिहास फक्त वाचायचा नाही... समजून घ्यायचा आणि पुढे सांगायचा असतो.... 🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩 जय धर्मवीर संभाजी महाराज.. #🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा 🚩 #1 फेब्रुवारी मराठा साम्राज्यातील काळा दिवस 🏴🏴 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏