Vaibhav Mhatre
585 views
1 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६५९ कोकणामध्ये शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी राजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६६६ औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज शिवाजीराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले. त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते. मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला. त्याचे नाव तेजसिंह कछवा. औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता. त्याचे नाव गाझीबेग तवझुक. महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते. शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_मार्च_१६७३ कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली, ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता☝️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩