🚩*या अठ्ठाविसाव्या श्लोकाचा अर्थ* :- 🚩
छत्रपती संभाजी महाराजांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी अतोनात हालअपेष्टा आणि असंख्य घाव सहन केले, परंतु त्यांनी आपला धर्म कधीही सोडला नाही. त्याचप्रमाणे, आपल्या शरीरावर किंवा मनावर कितीही आघात झाले, जीवनात कितीही भयाण संकटे आली, तरी आपण आपले धर्मरक्षणाचे व्रत कधीही त्यागू नये. संकटांना पाठ दाखवून पळून जाण्यापेक्षा धैर्याने त्यांना सामोरे गेले पाहिजे.
हा श्लोक आपल्याला प्रेरणा देतो की, शिव-शंभूंप्रमाणे आपणही धर्मरक्षण हेच आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. देव, देश आणि धर्माच्या कार्यात कितीही विघ्ने आली तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण लढले पाहिजे. याच अढळ निष्ठेचा जागर करण्यासाठी आपण सर्वांनी 'धर्मवीर बलिदान मास' या व्रताचे मनापासून पालन करणे आवश्यक आहे.
धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा
#धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज