धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

521 Posts • 3M views
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास 🔥 श्री संभाजीसुर्यहृदय श्लोक क्र. ३० 🔥🚩 आज धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा तिसावे रणधुरंदरांच्या चरणी अर्पण श्लोक क्र : ३० सिध्दी, फिरंगी, इंग्रज ठाके अवाढव्य औरंग | झुंज - झुंज अन झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत | मुजरा करतो तुम्हास राजे महाराष्ट्राच्या भूमीत ||३०|| #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
25 likes
23 shares
🚩*मृत्युंजय अमावास्या*🚩 🌹*म्हणजेच धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी*🌹 या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबांनी आजची संध्याकाळ निवडली होती, की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगुन मिरवून दाखवू. बहादुरगडावर ( मौजे पेडगाव , ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा , कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे #तख्तेकुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते , कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा , महाराजांचा व जिजाऊंचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला #हिंदू_राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी , तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले. बलिष्ठशरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने अवघी छावणी गर्जत होती. कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे. दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ' हलाल ' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!! स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो.....!!! #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
69 likes
67 shares
श्री तुळजाभवानी प्रसन्न ⛳ कशासाठीं आणि मरावें कसे मी?। विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी।। *लढूं पांग फेडावया मायभूचे।* आम्हीं मार्ग चालूं सईच्या सुताचे।। गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी भावार्थ :- जो जन्माला आला त्याला जगाव लागत मरावं लागत परंतु *राष्ट्र* म्हणून जगणं महत्वाचं असं आदरणीय गुरुजी आपल्याला सतत सांगत असतात आला आला प्राणी जन्मास आला,जगला जगला भोग भोगत जगला,थकला थकला भोग भोगोनी थकला,गेला गेला देह टाकुनी गेला असच ज्यांचं जगणं आणि मरण आहे ज्यांच्या जीवनाला दिशा दृष्टी नाही त्या जीवनाला अर्थ नाही त्या जीवनात राम नाही *मरावे परी किर्ती रूपे उरावे याच ज्वलंत उदाहरण आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिल आहे.* आपल्या आयुष्याला दिशा दृष्ठी नसेल तर त्या जगण्याला आणि मरण्याला अर्थ नाही ज्या भूमीवर जन्मा आलो त्या भूमीची शपथ मला मातृभूमीच्या कल्यानाहुनी जगण्याचा ना हक्क मला हो ज्या वेळी मातृभूमीच्या कल्यानाहुनी जगण्याचा ना हक्क मला हा भाव आपल्या अंतःकरणात तयार होईल त्याप्रमाणे आपण जगायला लागू तेव्हा आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल असच जीवन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जगले वेळ प्रसंगी मान अपमान गिळला अनंत मरणयातना भोगल्या परंतु औरंगायला शरण गेले नाहीत त्यांनी सदैव आपल्या देव देश धर्माचा आपल्या मातृभूमीचा विचार केला त्या संभाजी महाराज यांचे दिव्य जीवन आपन आचारलं पाहिजे त्यांच्या प्रमाणे आपण मातृभूचे पांग फेडण्यासाठी लढले पाहिजे जगले पाहिजे शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची तरुण पिढी निर्माण व्हावी म्हणून आपन झटल पाहिजे समाजा पर्यंत पोहचल पाहिजे समाजाला संभाजी महाराज यांच्या दाहक बलिदानची आठवण करून द्याला हवी हे काम आपण केल पाहिजे. भारतमाता आणि आपली आई एकच आहे हे जाणून मातृभूच्या राक्षणासाठी लढायला सदैव तत्पर रहायला हवं संभाजी महाराज यांच्या मार्गांवर चालायला हवं. #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
23 likes
22 shares