मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
452 views
रायगडच्या शेतकऱ्यास "वालीच" नाही; ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर प्रतिनिधी अलिबाग बिनधास्त न्यूज नेटवर्क अलिबाग: रायगड जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे . त्यास निसर्गाचा लहरीपणा , , क्रुषी खात्याच्या मार्गदर्शनाचा अभाव , मजुरांचा तुटवडा , वाढते मजुरीचे दर ' ' महागडी कीटकनाशक औषधे तसेच शासनाचे दुर्लक्ष ही कारणे जाणवतात. चालू वर्षी पावसाचे आगमान वेळेपूर्वी ( मे महिन्यातच ) झाले . शिवा य तो भरपूर पडला. अतिव्रुष्टी, वादळी वारे , महापूर ही संकटे असूनही पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली म्हणून रायगडचा शेतकरी खूश होता , त्याने गौरी -गणपतीचा सणआनंदाने साजरा केला. शेतातील *कणसे* जोमदार भरल्यामुळे नवरात्रही उत्साहात साजरी केली . मोठ्या प्रमाणात धान्य घरात येईल म्हणून वर्षभरातील खार्चाचे नियोजन करीत होता (घर दुरुस्ती, लग्नकार्य , बैलजोडी खरेदी इ .)) . पण .कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास पर्जन्य व्रुष्टी झाली. सोसाट्याचे वारेही वाहू लागले , शेतात पाणीचपाणी झाले. परिपक्व कणसे शेतात झोपवली. पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. कणसे पाण्यात राहिल्यामुळे पेंढा कुजला. कणसातील भातही काळेठिक्कूर पडून कवडीमोलाचे झाले . *छाप्याचे* प्रमाणही वाढले. .काही ठिकाणी भाताला कोंब आले. शेतकरी धास्तावला.. लाणी - बांधणीचा हंगाम , मजुरांचा तुटवडा शिवाय अव्वाच्या सव्वा मजुरी यामुळे काहींनी शेती कापलीच नाही . अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पदरात गतवर्षाच्या तुलनेने ५० टक्केही धान्य पडले नाही . * भिजके भात *या सदराखाली धान्य खरेदी केंद्रावरही त्या भाताच्या खरेदीस नकार मिळत होता . या सँकटाला तोंड कसे द्यावे , , वर्षभराच्या "पोटगी" चा प्रश्न कसा सोडवावा ( कारण शासनमान्य धान्य दुकानात काहीनाच मोफत धान्य मिळते . ) शेतीची वर्षभरातील मशागत कशी करावयाची , हा यक्षप्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे . *शासनाचा नन्नाचा पाढा* कोजागिरी पौर्णिमेनंतर सतत पडलेला पाऊस नुकसानकारक ठरल्यामुळे शेतकरी हताश झाला. शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या आशेमुळे महसूल विभागाकडून शेतकरी असल्याचा अधिक्रुत परवाना मिळविला , क्रुषिअधिका-यासमक्ष "पंचनामे" केले गेले " , समजुतीसाठी " (?) "फोटो"सेशनही केले गेले . पंचनामे नुकसानग्रस्त शेताच्या फोटोसह . ग्राम पंचायत अधिकारीमार्फत क्रुषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचा *सोपकार "[केला गेला . तालुका क्रुषी कार्यालयात पंचनाम्याच्या कागदपत्रांचे ढीग साठले. "बिचारा" शेतकरी नुकसान भरपाईची वाट पाहू लागला. संबंधित कार्यालयाचे उँबरठे झिजवू लागला . पण व्यर्थ ! शासनाने रायगड च्या शेतकऱ्यास पाने पुसली *क्रुषी अधिका-यांची पाठ* शेतकरी शेती करतो. तोंती ' नेहमीच तोट्यात असते. म्हणून खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी तो फलोतूपादनाकडे वळला आहे . त्याने आंबा लागवडीस प्राधान्य दिले आंबा कलमाँची . चांगल्या प्रकारे निगा राखल्यामुळे ती कलमे बहरून मोहोर येऊ लागला . पण दुर्दैव असे की अलिकडे ३ -४ वर्षे भरपूर मोहोर येतो पण काही दिवसांनी तो करपतो . अगदी कोळसा होतो . (याबाबत क्रुषी विभागाकडून सःशोधन होणे गरजेचे आहे .) महागडी कीटकनाशक औषधे खरेदी करून फवारणी केली जाते . परंतु ३ - ४ वेळा फवारणी करूनही फळधारणा होत नाही . याबाबत शासनाचे क्रुषी खातेही गप्प आहे . ३ - ४ वेळा फवारणी करूनही फळधारणा होत नाही , याबाबत शेतकऱ्यास शास्त्रीय कारणे कळण्यासाठी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात भेटून **मी* चर्चा केली. तसेच शास्त्रीय कारणे शेतकऱ्यांना कळण्यासाठी शिबिर वाघोली (ता, आलिबाग) येथे आयोजित करण्याबाबत विनंती केली. लगेचच क्रुषी अधिक्षक म्हणाल्या " पुढील आठवड्यात शिबिर वाघोली येथे आयोजिले जाईल " . पण वर्ष उलटून गेले तरी शिबिराला *मुहुर्तच* मिळत नाही . * संकटग्रस्त शेतक-याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे हे जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिक्षक कार्यालयाचे काम आहे . . पण - - - - ? * *आंबा लागवडीला प्राधान्य* शेतीपूरक व्यवसाय म्हणून रायगडचा शेतकरी आंबा लागवडीकडे वळला आहे . तोंडली , कारळी , शिराळी , दुदी तसेच पाँढरा कांदा लागवडीकडेही तो झुकला आहे . फळ लागवड व भाजीपाला दूषित हवामानास बळी पडत आहे.आंबा पिकाचे फारच नुकसान होत आहे , साधारणतः नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये आंबा मोहोरताच शेतकरी आनंदित होतो . पण लगेचच तो करपतो. जपणुकीसाठी तो हजारो रुपये मूल्याची महागडी औषधे खरेदी करतो. मजूर (आदिवासी ) शोधतो. त्यांची महागडी मजुरी आदा करतो.चहा ,*पाणी* , नाष्टा इ. ची व्यवस्था करतो. आणि तीन -तीन फवारण्या करून घेतो. व जानेवारी - फेब्रुवारी मध्ये मोहोर करपलेला - ( अक्शरशं*कोळसा* झालेला ) मोहोर त्याच्या द्रुष्टीस पडतो . बिचा-या शेतकऱ्याचे हजारो रुपये पाण्यात जातात .काय वाटत असेल त्या शेतक-याला ? गेली तीन -चार वर्षे हा प्रकार घडतो आहे अनेकवेळा फवारणी करुनही *मोहोर* करपतो.यावर *तज्ञ* क्रुषी अधिका-यांकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी . गतवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यात *मी* जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी श्रीमती वंंदना शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात भेटलो. सर्व परिस्थिती विदित केल्यानंतर त्या क्रुषी अअधिकारी म्हणाल्या " ,*या बाबत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला मी *वाघोली* ( ता. अलिबाग) येथे येते .शिबिर आयोजित करून सर्व शंकंचे निरसन केले जाईल " . पण वर्ष उलटून गेले तरी त्या अधिका-यास *मुहूर्त* मिळालेला नाही . बदलत्या हवामानावर मात कशी करावी , .आधुनिक पद्धतीने भातशेती कशी करावी , फलोत्पादन कसे वाढावावे , तरुण मुले शेती व्यवसायाकडे कशी आकर्षित होतील , याबाबत जिल्हा अधिक्षक क्रुषी अधिकारी व त्यांचे सहकारी सदैव जाग्रुत राहिल्यास रायगडचा शेतकरी शेतीत नक्की क्रांती करील पण - - - - ?

More like this