श्री तुळजाभवानी प्रसन्न ⛳
कशासाठीं आणि मरावें कसे मी?।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी।।
*लढूं पांग फेडावया मायभूचे।*
आम्हीं मार्ग चालूं सईच्या सुताचे।।
गुरुवर्य श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी
भावार्थ :- जो जन्माला आला त्याला जगाव लागत मरावं लागत परंतु *राष्ट्र* म्हणून जगणं महत्वाचं असं आदरणीय गुरुजी आपल्याला सतत सांगत असतात आला आला प्राणी जन्मास आला,जगला जगला भोग भोगत जगला,थकला थकला भोग भोगोनी थकला,गेला गेला देह टाकुनी गेला असच ज्यांचं जगणं आणि मरण आहे ज्यांच्या जीवनाला दिशा दृष्टी नाही त्या जीवनाला अर्थ नाही त्या जीवनात राम नाही *मरावे परी किर्ती रूपे उरावे याच ज्वलंत उदाहरण आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिल आहे.*
आपल्या आयुष्याला दिशा दृष्ठी नसेल तर त्या जगण्याला आणि मरण्याला अर्थ नाही ज्या भूमीवर जन्मा आलो त्या भूमीची शपथ मला मातृभूमीच्या कल्यानाहुनी जगण्याचा ना हक्क मला हो ज्या वेळी मातृभूमीच्या कल्यानाहुनी जगण्याचा ना हक्क मला हा भाव आपल्या अंतःकरणात तयार होईल त्याप्रमाणे आपण जगायला लागू तेव्हा आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल असच जीवन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जगले वेळ प्रसंगी मान अपमान गिळला अनंत मरणयातना भोगल्या परंतु औरंगायला शरण गेले नाहीत त्यांनी सदैव आपल्या देव देश धर्माचा आपल्या मातृभूमीचा विचार केला त्या संभाजी महाराज यांचे दिव्य जीवन आपन आचारलं पाहिजे त्यांच्या प्रमाणे आपण मातृभूचे पांग फेडण्यासाठी लढले पाहिजे जगले पाहिजे शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची तरुण पिढी निर्माण व्हावी म्हणून आपन झटल पाहिजे समाजा पर्यंत पोहचल पाहिजे समाजाला संभाजी महाराज यांच्या दाहक बलिदानची आठवण करून द्याला हवी हे काम आपण केल पाहिजे. भारतमाता आणि आपली आई एकच आहे हे जाणून मातृभूच्या राक्षणासाठी लढायला सदैव तत्पर रहायला हवं संभाजी महाराज यांच्या मार्गांवर चालायला हवं.
#धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज